शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

रस्ता रूंदीकरणातील व्यापा-यांत होतोय दुजाभाव, दुरूस्तीबाबत निर्णय बदलल्याचा सेनेचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 03:26 IST

भार्इंदर कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणात गाळे, दुकाने तुटलेल्या काही व्यापा-यांनी दुरूस्तीच्या नावाखाली नव्याने बांधकामे केली. त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले, पण आता जे व्यापारी दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत

उल्हासनगर : भार्इंदर कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणात गाळे, दुकाने तुटलेल्या काही व्यापा-यांनी दुरूस्तीच्या नावाखाली नव्याने बांधकामे केली. त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले, पण आता जे व्यापारी दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना परवानगी नाकारली जात असल्याने या दुजाभावामागे नेमकी कोणती राजकीय गणिते आहेत, असा प्रश्न व्यापा-यांना पडला आहे. या प्रश्नावर महासभेत लक्षवेधी मांडून दुरूस्तीबाबत वेगवेगळा निर्णय घेतला जात असल्याचा आक्षेप शिवसेनेने नोंदवला आहे. शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत या विषयावर लक्षवेधी सूचना मांडल्याने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची कोंडी झाली आहे.उल्हासनगरमधून जाणा-या कल्याण-अंबरनाथ महामार्गाचे रूंदीकरण अनेक वर्षे रखडले होते. तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे आणि उपायुक्त नितीन कापडणीस यांनी प्रभाग अधिकारी, पोलीस उपायुक्त, राजकीय नेते यांना विश्वासात घेऊन १५ दिवसात हे रूंदीकरण पार पाडले. त्यात एक हजारापेक्षा जास्त व्यापाºयांचे काही प्रमाणात नुसकान झाले, तर २६५ व्यापाºयांची दुकाने पूर्णत: गेली. पूर्ण दुकाने तुटलेल्यांना कॅम्प नं-३ येथील इंदिरा गांधी भाजी मार्केंटमध्ये २०० चौरस फुटाचे दुकान बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसा ठराव महासभेत एकमताने मंजूर झाला. ज्या व्यापाºयांचे गाळे-दुकाने अंशत: तुटली होती, त्यांना तत्कालीन पालिका आयुक्तांनी दुरूस्तीची तोंडी परवानगी दिली.रस्ता रूंदीकरणात तुटलेल्या बांधकामांच्या दुरूस्तीच्या नावाखाली बहुमजली अवैध बांधकामे उभी राहिल्याने एकच बोभाटा झाला. पालिका अधिकारी, व्यापारी व भूमाफिया यांच्या साटेलोट्यातून ही बांधकामे उभी राहिल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली. त्यामुळे तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी सरसकट सर्वच व्यापाºयांना नोटिसा देऊन कागदपत्रे सादर करण्यास बजावले. तोवर कापडणीस आणि नंतर आयुक्त हिरे यांची बदली झाल्याने कारवाई रखडली. विनापरवाना उभ्या राहिलेल्या बांधकामात कोट्यवधींच्या उलाढालीचे आणि जिल्हास्तरीय नेत्यांचे नाव प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चर्चेत आले. पुढे पालिकेला राजेंद्र निंबाळकर यांच्या रूपाने आयएएस दर्जाचे आयुक्त मिळाल्यावर त्यांनी अंबरनाथ-कल्याण रस्ता रूंदीकरण नावाखाली उभ्या राहिलेल्या बांधकामावर कारवाईचे संकेत देऊन थोडी कारवाई केली. व्यापाºयांनी विस्थापितांचे शहर म्हणून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. आयुक्तांनी पाडकाम आवरते घेतले. ज्यांना राजकीय आशीर्वाद होता त्यांनी बहुमजली बांधकामे केली. पण रूंदीकरणाचा ज्यांना खरोखरीच फटका बसला, त्यांनी दुरूस्तीच्या नावाखाली बांधकाम सुरू करताच पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. रूंदीकरणाचा फटका बसलेल्या व्यापाºयांत दुजाभाव का? असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख आणि नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी विचारला आणि महासभेत लक्षवेधी सूचना आणली.>रूंदीकरणाच्या नावे अवैध बांधकामेरस्ता रूंदीकरणात बाधित झालेल्या व्यापाºयांना बांधकामे करू द्या, अर्धवट बांधकामे पूर्ण करू द्या, अशी मागणी व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने यापूर्वी आयुक्तांकडे केली, तेव्हा कायदा व नियमानुसारच परवानगी देण्याची भूमिका निंबाळकर यांनी घेतली. असे असेल तर मग रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली शेकडो बहुमजली अवैध बांधकामे उभी राहिलीच कशी? असा प्रश्न आता नगरसेवक विचारत आहेत.शो रूम जैसे थेरस्ता रूंदीकरणाचा अजिबात फटका न बसलेल्या काही शो रूमने दरम्यानच्या काळात सुसंधी साधत बहुमजली बांधकामे उभे केली. तक्रारी आल्यानंतर पालिकेने कागदावर कारवाई केली. न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतरही, बांधकामे उभी राहिली, ती तशीच आहेत. त्यांच्यावर पालिकेने हातोडा चालवलेला नाही.प्रभाग अधिकाºयांचे दुर्लक्षरूंदीकरणाच्या नावाखाली शेकडो अवैध बांधकामे झाल्याची माहिती तत्कालीन प्रभाग अधिकाºयांना होती. पण यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याने विनापरवाना बांधकामे तोडली नाहीत. त्यांना नोटीस देण्यापलिकडे काही कारवाई नाही.