शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
2
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
3
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
4
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
5
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
6
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
7
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
8
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
9
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
10
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
11
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
12
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
13
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
14
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
15
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
16
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
17
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता रूंदीकरणातील व्यापा-यांत होतोय दुजाभाव, दुरूस्तीबाबत निर्णय बदलल्याचा सेनेचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 03:26 IST

भार्इंदर कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणात गाळे, दुकाने तुटलेल्या काही व्यापा-यांनी दुरूस्तीच्या नावाखाली नव्याने बांधकामे केली. त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले, पण आता जे व्यापारी दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत

उल्हासनगर : भार्इंदर कल्याण-अंबरनाथ रस्ता रूंदीकरणात गाळे, दुकाने तुटलेल्या काही व्यापा-यांनी दुरूस्तीच्या नावाखाली नव्याने बांधकामे केली. त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले, पण आता जे व्यापारी दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना परवानगी नाकारली जात असल्याने या दुजाभावामागे नेमकी कोणती राजकीय गणिते आहेत, असा प्रश्न व्यापा-यांना पडला आहे. या प्रश्नावर महासभेत लक्षवेधी मांडून दुरूस्तीबाबत वेगवेगळा निर्णय घेतला जात असल्याचा आक्षेप शिवसेनेने नोंदवला आहे. शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी नुकत्याच झालेल्या महासभेत या विषयावर लक्षवेधी सूचना मांडल्याने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची कोंडी झाली आहे.उल्हासनगरमधून जाणा-या कल्याण-अंबरनाथ महामार्गाचे रूंदीकरण अनेक वर्षे रखडले होते. तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे आणि उपायुक्त नितीन कापडणीस यांनी प्रभाग अधिकारी, पोलीस उपायुक्त, राजकीय नेते यांना विश्वासात घेऊन १५ दिवसात हे रूंदीकरण पार पाडले. त्यात एक हजारापेक्षा जास्त व्यापाºयांचे काही प्रमाणात नुसकान झाले, तर २६५ व्यापाºयांची दुकाने पूर्णत: गेली. पूर्ण दुकाने तुटलेल्यांना कॅम्प नं-३ येथील इंदिरा गांधी भाजी मार्केंटमध्ये २०० चौरस फुटाचे दुकान बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले. तसा ठराव महासभेत एकमताने मंजूर झाला. ज्या व्यापाºयांचे गाळे-दुकाने अंशत: तुटली होती, त्यांना तत्कालीन पालिका आयुक्तांनी दुरूस्तीची तोंडी परवानगी दिली.रस्ता रूंदीकरणात तुटलेल्या बांधकामांच्या दुरूस्तीच्या नावाखाली बहुमजली अवैध बांधकामे उभी राहिल्याने एकच बोभाटा झाला. पालिका अधिकारी, व्यापारी व भूमाफिया यांच्या साटेलोट्यातून ही बांधकामे उभी राहिल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली. त्यामुळे तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी सरसकट सर्वच व्यापाºयांना नोटिसा देऊन कागदपत्रे सादर करण्यास बजावले. तोवर कापडणीस आणि नंतर आयुक्त हिरे यांची बदली झाल्याने कारवाई रखडली. विनापरवाना उभ्या राहिलेल्या बांधकामात कोट्यवधींच्या उलाढालीचे आणि जिल्हास्तरीय नेत्यांचे नाव प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चर्चेत आले. पुढे पालिकेला राजेंद्र निंबाळकर यांच्या रूपाने आयएएस दर्जाचे आयुक्त मिळाल्यावर त्यांनी अंबरनाथ-कल्याण रस्ता रूंदीकरण नावाखाली उभ्या राहिलेल्या बांधकामावर कारवाईचे संकेत देऊन थोडी कारवाई केली. व्यापाºयांनी विस्थापितांचे शहर म्हणून मुख्यमंत्र्यांना साकडे घातले. आयुक्तांनी पाडकाम आवरते घेतले. ज्यांना राजकीय आशीर्वाद होता त्यांनी बहुमजली बांधकामे केली. पण रूंदीकरणाचा ज्यांना खरोखरीच फटका बसला, त्यांनी दुरूस्तीच्या नावाखाली बांधकाम सुरू करताच पालिकेने कारवाईचा बडगा उगारला. रूंदीकरणाचा फटका बसलेल्या व्यापाºयांत दुजाभाव का? असा प्रश्न शिवसेनेचे शहरप्रमुख आणि नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी विचारला आणि महासभेत लक्षवेधी सूचना आणली.>रूंदीकरणाच्या नावे अवैध बांधकामेरस्ता रूंदीकरणात बाधित झालेल्या व्यापाºयांना बांधकामे करू द्या, अर्धवट बांधकामे पूर्ण करू द्या, अशी मागणी व्यापाºयांच्या शिष्टमंडळाने यापूर्वी आयुक्तांकडे केली, तेव्हा कायदा व नियमानुसारच परवानगी देण्याची भूमिका निंबाळकर यांनी घेतली. असे असेल तर मग रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली शेकडो बहुमजली अवैध बांधकामे उभी राहिलीच कशी? असा प्रश्न आता नगरसेवक विचारत आहेत.शो रूम जैसे थेरस्ता रूंदीकरणाचा अजिबात फटका न बसलेल्या काही शो रूमने दरम्यानच्या काळात सुसंधी साधत बहुमजली बांधकामे उभे केली. तक्रारी आल्यानंतर पालिकेने कागदावर कारवाई केली. न्यायालयाच्या स्थगिती आदेशानंतरही, बांधकामे उभी राहिली, ती तशीच आहेत. त्यांच्यावर पालिकेने हातोडा चालवलेला नाही.प्रभाग अधिकाºयांचे दुर्लक्षरूंदीकरणाच्या नावाखाली शेकडो अवैध बांधकामे झाल्याची माहिती तत्कालीन प्रभाग अधिकाºयांना होती. पण यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याने विनापरवाना बांधकामे तोडली नाहीत. त्यांना नोटीस देण्यापलिकडे काही कारवाई नाही.