शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
2
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
3
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
4
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
5
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
6
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
7
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
8
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
9
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
10
Wipro च्या नव्या सीईओंना किती वेतन मिळणार माहितीये? त्यात येतील दोन प्रायव्हेट जेट!
11
नाशिकमध्ये ठाकरे गटात बंड होणार! एक नेता दीड वर्षापासून तयारी करतोय, अर्ज घेतला
12
किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार
13
बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण
14
काँग्रेसमध्ये राज्यात ऐक्याचे चित्र, एकमेकांच्या पाडापाडीला फाटा; आपापले सुभे सांभाळण्यावर भर
15
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
16
महाराष्ट्र दिनानिमित्त नरेंद्र मोदींचं मराठमोळं ट्विट; "परंपरा, प्रगती आणि एकता..."
17
वातावरण टाइट ! साखर पेरणी की जातीचा मुद्दा ? 'शेट्टी-सरुडकर-माने' यांच्यामध्येच फाइट
18
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
19
Mutual Fund मधील इन्सायडर ट्रेडिंग काय आहे माहितीये? ज्यावर SEBIनं उचलली कठोर पावलं, जाणून घ्या
20
मुंबईत आगळा सामना! मुलाविरुद्ध प्रचार करणार वडील;रवींद्र वायकरांसाठी गजानन कीर्तिकर उतरणार मुलगा अमोलविरोधात प्रचारात

खुलेआम धिंडवडे, पण दाखल गुन्हे कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 2:29 AM

मीरा-भाईंदरमध्ये २००९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आचारसंहिता भंगाचे दोन दखलपात्र व दोन अदखलपात्र गुन्हे दाखल झाले होते.

- धीरज परबमीरा-भाईंदरमध्ये २००९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी आचारसंहिता भंगाचे दोन दखलपात्र व दोन अदखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीतसुद्धा दोन दखलपात्र व पाच अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाचे तब्बल ११ गुन्हे दाखल झाले होते. याशिवाय, दोन अदखलपात्र गुन्हे दाखल होते. पण, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन दखलपात्र आणि दोन अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे २०१७ च्या महापालिका निवडणुकीत एकही गुन्हा दाखल झालेला नाही.२०१७ च्या महापालिका निवडणुकीत एकही गुन्हा दाखल झाला नसला, तरी आचारसंहितेचा भंग झालाच नाही, असे मानण्याचे कारण नाही. कारण, अनेक तक्रारी होऊनसुद्धा गुन्हा दाखल करण्यास टाळटाळ करण्यात आली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शांती पार्कमधील सभा ही संपूर्ण रस्ता बंद करून घेण्यात आली होती. पण, तक्रारी होऊनसुद्धा कारवाई काहीच झाली नव्हती. २०१२ च्या महापालिका निवडणुकीत तत्कालीन नगरसेवक आणि स्थानिक भाजपाची धुरा हाती असलेले नरेंद्र मेहता यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला होता. पालिकेचे प्रभाग अधिकारी असलेले स्वप्नील सावंत यांच्या तक्रारीवरून सीडीप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या सीडीद्वारे गुजराती, मारवाडी, जैन मतदारांनी आपणास मतदान करावे, म्हणून त्यात जनावरांच्या हत्या करताना दाखवले होते. त्या हत्यांच्या चित्रणाचा हवाला देऊन पुढे मेहता हे मतदारांना आवाहन करताना दिसत होते. न्यायालयाने या प्रकरणातून मेहतांना दोषमुक्त केले होते. अगदी, २०१७ च्या पालिका निवडणूक काळात धार्मिक द्वेष वाढवून मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी धर्मगुरूंचा वापर, अनेक पत्रके आणि क्लिप सर्रास वाटल्या गेल्या; पण एकही गुन्हा दाखल केला गेला नाही.आचारसंहिता भंगाबाबत तक्रारी केल्या, तरी त्याचा अहवाल पाठवणारे वा कारवाई करणारे हे स्थानिक अधिकारीच असतात. त्यांचे राजकारण्यांशी लागेबांधे असल्याने तक्रारी करूनसुद्धा गुन्हा दाखल केला जात नाही. खोटे, दिशाभूल करणारे अहवाल दिले जातात. जास्तच दबाव असला, तर कारवाई होते. अन्यथा, कितीही तक्रारी केल्या तरी यंत्रणेस फरक पडत नाही. दाखल गुन्ह्यांमध्येसुद्धा पुढे तपास आणि न्यायालयात आरोप सिद्ध करण्यासाठी यंत्रणेकडूनच गांभीर्य दाखवले जात नाही.मीरा-भार्इंदरमध्ये आचारसंहिता भंगाच्या तक्रारी मोठ्या संख्येने येत असल्या, तरी गुन्हे मात्र नाममात्रच दाखल होत आले आहेत. त्यातही दाखल गुन्ह्यांमध्ये शिक्षा आजवर कुणालाच झाली नसून, आरोपी सहीसलामत सुटून मोकळे होत आहेत. त्यामुळे आचारसंहितेचे कायदे, गुन्हे दाखल करणारे फिर्यादी अधिकारी आणि तपास यंत्रणा यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारवाईच होत नसती, तर लोकशाहीच्या या उत्सवात गैरप्रकार करणाऱ्यांना जरब बसणारच कशी, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक