शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

सरपंच निवडीनंतरच ठरणार ग्रामपंचायतींचे खरे ‘सत्ता’धारी, आघाडी, भाजपचे दावे सारखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 09:08 IST

आजच्या मतमोजणीत बलाढ्य उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. शहापूर तालुक्यातील चेरपाेली ग्रामपंचायतीतून सहाव्यावेळी निवडणूक लढविणारे माजी उपसरपंच विठ्ठल भेरे व दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे भाचे धीरज झुगर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

ठाणेजिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांतील १४३ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल साेमवारी जाहीर झाले. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असल्याने ग्रामपंचायतींत बाजी काेण मारणार याची उत्सुकता लागली हाेती. दाेन्ही पक्षांनी या निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी कंबर कसली हाेती. त्यामुळे ग्रामपंचायतींचे निकाल लागताच या पक्षांनी आम्हीच सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र, सरपंच पदाच्या निवडणुकीनंतरच आता सत्ताधारी काेण याचा फैसला हाेणार आहे.

आजच्या मतमोजणीत बलाढ्य उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. शहापूर तालुक्यातील चेरपाेली ग्रामपंचायतीतून सहाव्यावेळी निवडणूक लढविणारे माजी उपसरपंच विठ्ठल भेरे व दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे भाचे धीरज झुगर यांना पराभवाचा सामना करावा लागला. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यात भाजपचे तर बदलापूर ग्रामीण भागात शिवसेनेने वर्चस्व निर्माण केले आहे. मुरबाड तालुक्यात महाविकास आघाडीने ३८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे तर भाजपने ३७ ग्रामपंचायत ताब्यात घेतल्याचे सांगितले. तालुक्यातील तब्बल २० ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले आहे, तर १४ ठिकाणी भाजपने सत्ता बाजी मारली आहे. राष्ट्रवादीने तीन ठिकाणी तर श्रमजीवी संघटनेला दाेन ठिकाणी यश मिळाले आहे. तर भाजपच्या खासदारांनी ३० ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे.

मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने ३८ जागांवर दावा केला असून, भाजपने ३७ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचे सांगितले. तालुक्यात १२६ पैकी ४४ ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या होत्या. दोन्ही बाजूंकडून सारखाच दावा केल्याने खरे वास्तव सरपंच निवडीनंतर स्पष्ट होणार आहे.ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की, भाऊबंदकीत वादविवाद होतात. त्यासाठी भाजपचे आमदार किसन कथोरे, तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव तर शिवसेनेचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, विधानसभा संघटक मधुकर घुडे, तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे या नेत्यांनी निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हट्टी कार्यकर्त्यांनी नेत्यांचा आदेश न मानता निवडणुका लढवल्या. खरे तर निवडणूकपूर्व बिनविरोध करण्याचे नाटक करायचे आणि निवडून आल्यानंतर आपल्याच पक्षाचा दावा करायचा. तसे या निवडणुकीतही बघण्यास मिळाले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव यांनी ३७ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला, तर शिवसेनेकडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी महाविकास आघाडीने ३१ ग्रामपंचायतींवर बहुमत मिळवल्याचे सांगितले. मात्र, सरंपच निवडणुकीनंतर कोणाकडे किती ग्रामपंचायत हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकthaneठाणे