शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सरपंच निवडीनंतरच ठरणार ग्रामपंचायतींचे खरे ‘सत्ता’धारी, आघाडी, भाजपचे दावे सारखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 09:08 IST

आजच्या मतमोजणीत बलाढ्य उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. शहापूर तालुक्यातील चेरपाेली ग्रामपंचायतीतून सहाव्यावेळी निवडणूक लढविणारे माजी उपसरपंच विठ्ठल भेरे व दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे भाचे धीरज झुगर यांना पराभवाचा सामना करावा लागला.

ठाणेजिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांतील १४३ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल साेमवारी जाहीर झाले. राज्यात शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असल्याने ग्रामपंचायतींत बाजी काेण मारणार याची उत्सुकता लागली हाेती. दाेन्ही पक्षांनी या निवडणुकीत वर्चस्व राखण्यासाठी कंबर कसली हाेती. त्यामुळे ग्रामपंचायतींचे निकाल लागताच या पक्षांनी आम्हीच सर्वाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे. मात्र, सरपंच पदाच्या निवडणुकीनंतरच आता सत्ताधारी काेण याचा फैसला हाेणार आहे.

आजच्या मतमोजणीत बलाढ्य उमेदवारांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे. शहापूर तालुक्यातील चेरपाेली ग्रामपंचायतीतून सहाव्यावेळी निवडणूक लढविणारे माजी उपसरपंच विठ्ठल भेरे व दुसऱ्यांदा निवडणूक लढविणारे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांचे भाचे धीरज झुगर यांना पराभवाचा सामना करावा लागला. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड पट्ट्यात भाजपचे तर बदलापूर ग्रामीण भागात शिवसेनेने वर्चस्व निर्माण केले आहे. मुरबाड तालुक्यात महाविकास आघाडीने ३८ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे तर भाजपने ३७ ग्रामपंचायत ताब्यात घेतल्याचे सांगितले. तालुक्यातील तब्बल २० ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व मिळविले आहे, तर १४ ठिकाणी भाजपने सत्ता बाजी मारली आहे. राष्ट्रवादीने तीन ठिकाणी तर श्रमजीवी संघटनेला दाेन ठिकाणी यश मिळाले आहे. तर भाजपच्या खासदारांनी ३० ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवल्याचा दावा केला आहे.

मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीने ३८ जागांवर दावा केला असून, भाजपने ३७ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्याचे सांगितले. तालुक्यात १२६ पैकी ४४ ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या होत्या. दोन्ही बाजूंकडून सारखाच दावा केल्याने खरे वास्तव सरपंच निवडीनंतर स्पष्ट होणार आहे.ग्रामपंचायत निवडणूक म्हटली की, भाऊबंदकीत वादविवाद होतात. त्यासाठी भाजपचे आमदार किसन कथोरे, तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव तर शिवसेनेचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, विधानसभा संघटक मधुकर घुडे, तालुकाप्रमुख कांतीलाल कंटे या नेत्यांनी निवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, हट्टी कार्यकर्त्यांनी नेत्यांचा आदेश न मानता निवडणुका लढवल्या. खरे तर निवडणूकपूर्व बिनविरोध करण्याचे नाटक करायचे आणि निवडून आल्यानंतर आपल्याच पक्षाचा दावा करायचा. तसे या निवडणुकीतही बघण्यास मिळाले आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव यांनी ३७ ग्रामपंचायती जिंकल्याचा दावा केला, तर शिवसेनेकडून जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी महाविकास आघाडीने ३१ ग्रामपंचायतींवर बहुमत मिळवल्याचे सांगितले. मात्र, सरंपच निवडणुकीनंतर कोणाकडे किती ग्रामपंचायत हे स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकthaneठाणे