जिल्ह्यातील २५ पाळणाघरे कागदावरच
By Admin | Updated: September 11, 2016 02:20 IST2016-09-11T02:20:43+5:302016-09-11T02:20:43+5:30
जिल्ह्यात आवश्यक त्या ठिकाणी सुमारे २५ पाळणाघरे सुरू करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाव्दारे २५ लाखांची तरतूद केलेली आहे.

जिल्ह्यातील २५ पाळणाघरे कागदावरच
ठाणे : जिल्ह्यात आवश्यक त्या ठिकाणी सुमारे २५ पाळणाघरे सुरू करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाव्दारे २५ लाखांची तरतूद केलेली आहे. मात्र, निष्काळजीपणातून अद्यापही या पाळणाघरांच्या कामास मुहूर्त सापडला नसल्याची वास्तव ऐकायला मिळत आहे.
महिला व बालकल्याण विभागाव्दारे पाळणाघर योजना हाती घेतली आहे. यासाठी अर्थ संकल्पीय तरतूद देखील केली आहे. पण त्यानुसार अद्यापही अंमलबजावणी केली नसल्याची बाब खासदारांच्या दक्षता समितीच्या बैठकीत
उघड झाली आहे. ही वेळ मारून नेण्यासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात येत असल्याचे महिला-बालकल्याण विभागाने या बैठकीत सांगितले.
शासकीय कार्यालयांसह ठिकठिकाणी कामाला जाणाऱ्या महिलांना पाळणा घरात बालके सुरक्षित ठेवणे शक्य होणार आहे. यामुळे बहुतांशी महिलांची ही समस्या दूर होणार आहे.