शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एक, केडीएमसीत दोन रुग्ण; एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३५

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 00:57 IST

खबरदारी म्हणून कळव्यातील हॉस्पिटल सील

ठाणे / कल्याण : कळव्यातील साईबाबानगर परिसरात आढळलेल्या ५९ वर्षीय कोरोना रुग्णाने प्राथमिक उपचार कळव्यातील एका खासगी रुग्णालयात घेतल्याने महाापालिकेने ते रुग्णालयच सील केले आहे. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना तेथेच क्वारंटाइन केले असून नेमके किती जण आहेत याची माहिती मिळू शकलेली नाही. दुसरीकडे, ठाण्यात शुक्रवारी आणखी तीनरुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे ठाण्यातील रुग्णांची संख्या ही १६ वर गेली आहे.

दरम्यान, कल्याण-डोंबिवली क्षेत्रात दोन नवे रुग्ण सापडल्याने येथील संख्या २१ झाली आहे. या दोन्ही शहरांतील रुग्णांची संख्या ३७ झाली आहे. मुंब्रा येथील अमृतनगर भागातील ४७ वर्षीय, तसेच ठाण्यातील धोबीआळी येथील ५७ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती राहत असलेली इमारत पालिकेने क्वारंटाइन केली आहे.

गुरुवारी पुन्हा एकदा दोन रुग्णांची भर पडली आहे. काजूवाडी परिसरात एका खासगी दवाखाना असलेल्या वैद्यकीय सेवा देणाºयालाच कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या संपर्कातील रुग्णांचा शोध सुरूआहे. दुसरीकडे कळव्यातील साईबाबानगरमध्ये ज्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली आहे, त्याने जवळच्याच एका खासगी रुग्णालयातच प्राथमिक उपचार घेतले होते. ३० आणि ३१ मार्चला तो याच रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये आला होता, अशी माहिती प्रशासनाने दिली.

खबरदारी म्हणून प्रशासनाने ते रुग्णालय सील केले आहे. कळव्यातील हे सर्वात जुने रुग्णालय असून या ठिकाणी ओपीडीसाठी मोठी गर्दी होते. आता या रु ग्णांच्या संपर्कात आलेले ओपीडीमधील इतर रु ग्ण, तसेच ज्या डॉक्टरांनी या रु ग्णाला तपासले आहे त्यांच्याही संपर्कात आलेले इतर रु ग्ण या सर्वांचा शोध घेण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.

ठाण्यात गुरुवारी एक वैद्यकीय अधिकारी आणि एका वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर शुक्रवारी यात आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. लोढा पॅरेडाइज परिसरात राहणाºया एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या रु ग्णावर मुंबईच्या एका खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण-डोंबिवलीत २१ रुग्ण; हळदी समारंभात लागण

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत शुक्रवारी कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या २१ झाली आहे. दरम्यान, गुरुवारी पाच नवे रुग्ण आढळले होते. दिवसेंदिवस रुग्णांचीसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोन रुग्णांपैकी एक जण कल्याण पश्चिमेतील तर, दुसरा डोंबिवली पूर्वेतील आहे. गुरुवारच्या पाच रुग्णांपैकी चार रुग्ण डोंबिवली पूर्वेतील तर, एक जण कल्याण पूर्वेतील आहे. चार रुग्णांपैकी तीन रुग्ण हे डोंबिवलीतील हळदी व लग्न सभारंभात हजेरी लावणाऱ्यांच्या संपर्कातील आहेत. एक रुग्ण हा कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने त्याला लागण झाली आहे.

कल्याणमध्ये सगळ्यात प्रथम सापडलेले कोरोनाबाधित रुग्ण व त्यांचे दोन कुटुंबीय बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात पुनर्तपासणीअंती घरी सोडलेल्या रुग्णांची संख्या चार आहे. महापालिकेने डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालय हे आयसोलेशन रुग्णालय म्हणून घोषित केले आहे. महापालिकेतील कोरोना संशयित रुग्णांना तेथे दाखल करणार आहे.

नवी मुंबईमध्ये एकाच दिवशी वाढले नऊ रुग्ण

नवी मुंबई : नवी मुुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून गुरुवारी एकाच दिवशी नऊ रुग्ण आढळले असून एकूण आकडा २२ झाला आहे. वाशीमध्ये सर्वाधिक रुग्ण असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणाºया शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश होऊ लागला आहे. गुरुवारी एकाच दिवशी ९ रुग्ण आढळले असून यात सात रुग्ण वाशीमधील एकाच कुटुंबामधील असून उरलेले दोन नेरूळमधील आहेत. नेरूळमध्येही एकाच कुटुंबामधील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या परिवारातील अजून एकाचा अहवाल अद्याप आलेला नाही.

फिलिपाइन्सवरून आलेल्या काही नागरिकांनी वाशीमधील धार्मिक स्थळामध्ये मुक्काम केला होता. त्यामधील एकाला कोरोनाची लागण झाल्याचे १४ मार्चला निदर्शनास आले. त्या व्यक्तीमुळे आठ जणांना लागण झाली होती. शहरातील २२ रुग्णांपैकी १५ जण वाशीमधील आहेत. पाच नेरूळ व सीवूडमधून असून उर्वरित कोपरखैरणे व ऐरोलीमधील आहेत.

आतापर्यंत सापडलेल्या रुग्णांनी पंधरा दिवसांमध्ये कुठे प्रवास केला, त्यांच्या सान्निध्यात कोण आले याची माहिती घेऊन संबंधितांचेही क्वारंटाइन केले जात आहे. रुग्ण आढळलेल्या सर्व इमारती सील केल्या असून त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. या परिसरातील ५०० घरांचे नियमित सर्वेक्षण करण्यासही सुरुवात केली आहे.एपीएमसीत व्यवहार सुरळीत

एमपीएमसीतील व्यवहार गुरुवारीही सुरळीत सुरू होते. येथील पाच मार्केटमध्ये ४५५ वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी आला आहे. यामध्ये भाजी मार्केटमध्ये ११५, कांदा मध्ये ४७, फळ मार्केटमध्ये २५९, मसाला मार्केटमध्ये ३४ वाहनांची आवक झाली आहे. भाजीपाल्याची १९४ वाहने एपीएमसीमध्ये न येता थेट मुंबईमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती बाजारसमिती प्रशासनाने दिली.

अफवांचा पाऊस

नऊ रुग्ण आढळल्यानंतर समाज माध्यमांवरून अफवांचा पाऊस पडू लागला होता. पोलीस आयुक्तांच्या नावाने नागरिकांना घाबरविण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पुढील सूचना मिळेपर्यंत असोसिएशनचा गेट सकाळी दहा ते सायंकाळी ६ पर्यंत बंद करण्यात येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई