शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

केडीएमटीला दिवसाला एक लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:38 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या केडीएमटीला कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची तीव्र झळ बसत आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : आर्थिक संकटात सापडलेल्या केडीएमटीला कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची तीव्र झळ बसत आहे. जुलैपासून परिवहनला दररोज एक लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्यामुळे या सेवेची आर्थिक घडी बसण्याऐवजी आणखीच विस्कटत चालली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी केडीएमटी प्रशासनाने रस्ते सुरक्षा समितीला साकडे घातले आहे.मुंब्रा बायपास रस्त्याची दुरुस्ती सुरू असताना कल्याण-डोंबिवलीतील वाहतुकीवर त्याचा ताण वाढला होता. १० सप्टेंबरला हा रस्ता पुन्हा सुरू झाला. त्यानंतर वाहतूक कोंडीतून कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची सुटका होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, त्यानंतर कल्याणचा जुना पत्री पूल रेल्वे प्रशासनाने पाडल्याने या पुलाला समांतर असलेल्या नव्या पुलावरून वाहनांची ये-जा सुरू आहे. हा पूल अरुंद असल्यामुळे याठिकाणी सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. शीळच्या दिशेने पार मेट्रो मॉलपर्यंत वाहनांची रांग लागत असून कल्याणच्या दिशेने बैल बाजारपर्यंत वाहतूक कोंडी होती. या वाहतूक कोंडीमुळे कल्याण-पनवेलच्या बसफेºयांवर परिमाण होत आहे. तसेच नवी मुंबईच्या बस फेºयांना त्याचा फटका बसत असून पनवेलच्या चार फेºयांपैकी एक फेरी कमी होत आहे.कल्याण-बदलापूर मार्गावरील वालधुनी पूल, कल्याण-मुरबाड रोडवर शहाड पूल, कल्याण-भिवंडी मार्गावरील खाडी पुलावर वाहतूक कोंडी होत असून बसफेºया कमी होत आहेत. त्यामुळे परिवहनचे दिवसाचे उत्पन्न एक लाखाने कमी होऊ न चार लाख २५ हजार रुपयांवर घसरले आहे. जुलैपासून आतापर्यंत केडीएमटीला एक कोटी ८० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीकडे साकडे घातले होते. तसेच कल्याणचे आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांच्यासह डोंबिवलीच्या वाहतूक पोलीस निरीक्षकांपुढेही हा विषय मांडण्यात आला होता. कल्याणच्या उड्डाण पुलावरही वाहतूक कोंडी होत असून डोंबिवलीतील अरुंद रस्त्यावर रिक्षाचालकांचे अतिक्रमण होत आहे. तेथे बस वळविताना चालकाला कसरत करावी लागते. परिवहनसोबत आरटीओ व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस लवकर बैठक घेणार आहेत, अशी माहिती परिवहनचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिली.निविदेला प्रतिसाद नाहीसध्या परिवहनकडे चालक-वाहक नसल्याने केवळ ७० बस रस्त्यावर धावत आहेत. परिवहनच्या ताफ्यातील जादा बस रस्त्यावर उतरविण्यासाठी व त्यातून उत्पन्नवाढीसाठी ७५ वाहक व १०० चालक भरतीसाठी निविदा मागविली होती. त्यासाठी आतापर्यंत सहा वेळा निविदा मागवून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.देखभाल-दुरुस्तीची निविदा काढून कंत्राटदाराने चालक-वाहक पुरविण्यासंदर्भात परिवहन व्यवस्थापनाचा विचारविनिमय सुरू आहे.नोव्हेंबरचा पगार मिळणार :परिवहनला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्यामुळे चालक-वाहकांचे महिन्याचे पगार थकतात. नोव्हेंबरच्या पगाराची रक्कम महापालिकेने दिली असून दीड कोटीचा धनादेश परिवहनला मिळाला आहे. त्यातून लवकर कामगारांचे पगार केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण