शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

केडीएमटीला दिवसाला एक लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 03:38 IST

आर्थिक संकटात सापडलेल्या केडीएमटीला कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची तीव्र झळ बसत आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : आर्थिक संकटात सापडलेल्या केडीएमटीला कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीची तीव्र झळ बसत आहे. जुलैपासून परिवहनला दररोज एक लाख रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्यामुळे या सेवेची आर्थिक घडी बसण्याऐवजी आणखीच विस्कटत चालली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी केडीएमटी प्रशासनाने रस्ते सुरक्षा समितीला साकडे घातले आहे.मुंब्रा बायपास रस्त्याची दुरुस्ती सुरू असताना कल्याण-डोंबिवलीतील वाहतुकीवर त्याचा ताण वाढला होता. १० सप्टेंबरला हा रस्ता पुन्हा सुरू झाला. त्यानंतर वाहतूक कोंडीतून कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची सुटका होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, त्यानंतर कल्याणचा जुना पत्री पूल रेल्वे प्रशासनाने पाडल्याने या पुलाला समांतर असलेल्या नव्या पुलावरून वाहनांची ये-जा सुरू आहे. हा पूल अरुंद असल्यामुळे याठिकाणी सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. शीळच्या दिशेने पार मेट्रो मॉलपर्यंत वाहनांची रांग लागत असून कल्याणच्या दिशेने बैल बाजारपर्यंत वाहतूक कोंडी होती. या वाहतूक कोंडीमुळे कल्याण-पनवेलच्या बसफेºयांवर परिमाण होत आहे. तसेच नवी मुंबईच्या बस फेºयांना त्याचा फटका बसत असून पनवेलच्या चार फेºयांपैकी एक फेरी कमी होत आहे.कल्याण-बदलापूर मार्गावरील वालधुनी पूल, कल्याण-मुरबाड रोडवर शहाड पूल, कल्याण-भिवंडी मार्गावरील खाडी पुलावर वाहतूक कोंडी होत असून बसफेºया कमी होत आहेत. त्यामुळे परिवहनचे दिवसाचे उत्पन्न एक लाखाने कमी होऊ न चार लाख २५ हजार रुपयांवर घसरले आहे. जुलैपासून आतापर्यंत केडीएमटीला एक कोटी ८० लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी रस्ते सुरक्षा समितीकडे साकडे घातले होते. तसेच कल्याणचे आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांच्यासह डोंबिवलीच्या वाहतूक पोलीस निरीक्षकांपुढेही हा विषय मांडण्यात आला होता. कल्याणच्या उड्डाण पुलावरही वाहतूक कोंडी होत असून डोंबिवलीतील अरुंद रस्त्यावर रिक्षाचालकांचे अतिक्रमण होत आहे. तेथे बस वळविताना चालकाला कसरत करावी लागते. परिवहनसोबत आरटीओ व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस लवकर बैठक घेणार आहेत, अशी माहिती परिवहनचे व्यवस्थापक मारुती खोडके यांनी दिली.निविदेला प्रतिसाद नाहीसध्या परिवहनकडे चालक-वाहक नसल्याने केवळ ७० बस रस्त्यावर धावत आहेत. परिवहनच्या ताफ्यातील जादा बस रस्त्यावर उतरविण्यासाठी व त्यातून उत्पन्नवाढीसाठी ७५ वाहक व १०० चालक भरतीसाठी निविदा मागविली होती. त्यासाठी आतापर्यंत सहा वेळा निविदा मागवून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.देखभाल-दुरुस्तीची निविदा काढून कंत्राटदाराने चालक-वाहक पुरविण्यासंदर्भात परिवहन व्यवस्थापनाचा विचारविनिमय सुरू आहे.नोव्हेंबरचा पगार मिळणार :परिवहनला आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्यामुळे चालक-वाहकांचे महिन्याचे पगार थकतात. नोव्हेंबरच्या पगाराची रक्कम महापालिकेने दिली असून दीड कोटीचा धनादेश परिवहनला मिळाला आहे. त्यातून लवकर कामगारांचे पगार केले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याण