शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
4
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
5
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
6
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
7
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
8
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
9
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
10
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
11
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
12
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
13
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
14
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
15
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
16
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
17
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
18
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
19
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
20
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)

शंभर भूखंड अतिक्रमणमुक्त; प्रांत अधिकाऱ्यांचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:41 AM

उल्हासनगरमध्ये भूमाफियांमध्ये उडाली खळबळ

उल्हासनगर : शहरातील खुल्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये म्हणून प्रांत अधिकारी जगजितसिंग गिरासे यांनी एका वर्षात १०० पेक्षा भूखंड सरकारच्या ताब्यात आणले आहेत. सरकारी भावानुसार या भूखंडांची किमत २०० कोटीपेक्षा अधिक असली तरी बाजारभावानुसार या भूखंडांची किमत ५०० कोटीच्या वरती असल्याचे सांगण्यात आले. प्रांत अधिकाºयांच्या कारवाईने भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. कॅम्प नंबर तीन धर्मवाडी परिसरातील अशाच एका फलकावर काळे फासून संस्थेकडे जागेच्या कागदपत्राची मागणी केल्याची माहिती गिरासे यांनी दिली.उल्हासनगरमध्ये जागेच्या मालकी हक्काबाबतचा प्रश्न निर्माण झाला आहे. जागेच्या मालकी हक्काअभावी विकास ठप्प पडल्याचा आरोप सत्ताधाºयांबरोबरच विरोधकांनीही केला होता. महापौर पंचम कलानी यांनी सरकारकडे काही भूखंडाच्या मालकी हक्काबाबत मागणी केल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी आयडीआय कंपनीजवळील आरक्षित भूखंडासह बोटक्लब, इंदिरा गांधी भाजीमार्केट व व्हीटीसी ग्राऊंड अशा चार भूखंडाची मालकी हक्क महापालिकेला हस्तांतरीत केली. ओटी सेक्शन धर्मवाडी परिसरातील जागेवर एका संस्थेने नामफलक लावला होता. प्रांत अधिकारी कार्यालयाने जागेबाबत संस्थेकडे जागेच्या कागदपत्राची मागणी करून बोर्डाला काळे फासले आहे.महापालिकेच्या ७० ते ७५ टक्के आरक्षित भूखंडावर अतिक्रमण झाले असून भूखंडाच्या मालकी हक्काच्या वादामुळे पालिकेला कोणतीही कारवाई करता आली नाही. शहरात बनावट सनदेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्य सरकारने सनद देणे बंद केले. शहरातील खुल्या व मोकळे भूखंड सरकारकडे जमा करण्याचा विडा प्रांत कार्यालयाने उचलला आहे. एका वर्षात कोट्यवधी किंमतीच्या १०० पेक्षा जास्त खुल्या जागा व भूखंडावर राज्य सरकारचे नामफलक लाऊन जागा सरकार दरबारी जमा केल्याची माहिती गिरासे यांनी दिली. भविष्यात ही जागा महापालिकेच्या ताब्यात येणार असून शहर विकासाला हातभार लागणार आहे, असे गिरासे यांनी यावेळी सांगितले. पालिकेला येथील अतिक्रमण तातडीने पालिकेला हटवावी लागणार आहेत. किमान हे भूखंड मोकळा श्वास घेतील अशी प्रतिक्रीया येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.सनदेचा तिढा सुटता सुटेनाशहरातील खुल्या जागेवर १९६० पूर्वी कोणी ताबा दाखविला असल्यास त्या जागेला कागदपत्राच्या आधारे राज्य सरकार सनद म्हणजे मालकी हक्क देते. मात्र बोगस सनदेचा सुळसुळाट झाल्यावर सरकारने सनद देणे बंद केले. तरीही अनेक जागेची सनद भूमाफियांनी यापूर्वीच काढल्याचे उघड झाले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणulhasnagarउल्हासनगर