शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

‘ओखी’ मुळे शहरे ओकीबोकी , ठाण्यात २०१० नंतरचा पावसाचा विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 1:13 AM

ओखी वादळाच्या तडाख्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे मंगळवारी दुसºया दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले.

ठाणे : ओखी वादळाच्या तडाख्यामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे मंगळवारी दुसºया दिवशी ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. आधीच हिवाळ््यातील गारवा आणि त्यात पावसामुळे रहिवासी आणखीनच गारठून गेले. या वादळामुळे अनेक शाळा बंद राहिल्या. पावसाने वाहतूकही मंदावली आणि सर्व शहरे काही काळ ओकीबोकी झाली.ठाण्यात २०१० नंतरच्या दुसºया क्रमांकाच्या पावसाची नोंद या ओखीमुळे झाली. २०१० मध्ये ठाण्यात ३७५७ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर यंदा आतापर्यंत ३६२४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.ओखीमुळे ठाण्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. रात्री आणि पहाटे पावसाचा जोर काहीसा वाढलेला दिसून आला. त्यामुले ठाणे शहरात १४ मिमी पावसाची नोंद झाली. रात्री ठाणे आपत्ती विभागाकडे १२ तक्रारी आल्या असून त्यात आगीच्या दोन, शॉर्टसर्किटची एक, वृक्ष पडल्याची एक, फांद्या पडल्याच्या दोन आणि इतर सहा अशा तक्रारी आल्या आहेत. मात्र यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. परंतु, दुपारी १२.४३ ला ४.३५ मीटरची भरती असल्याने खाडीला उधाण आले होते. कोपरीत खाडीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याचे दिसून आले. ओखी वादळामुळे जिल्ह्यातील इतर महापालिका आणि नगरपालिकांना ठाणे महापालिकेने पत्र पाठवून या काळात होणाºया घटनांची माहिती तत्काळ ठाणे आपत्ती विभागाला देण्यास सुचवले होते. जेणे करून धोका टाळण्यासाठी मदत होईल, असे त्यात म्हटले होते. तसेच, सतर्कतेच्या सुचनादेखील देण्यात आल्या.भाजीपाला लागवडीला, अन्य पिकांना या पावसाचा फटका बसल्याचे शेतकºयांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात पावसाने सुधारणा झाली. मात्र त्याची ताजी आकडेवारी उपलब्ध झाली नाही.प्रचाराला पहिल्याच दिवशी पावसाने दिला फटकाजिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील लढतीचे अतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारपासून प्रचार सुरू होईल, अशी स्थिती होती, पण ओखी चक्रीवादळाने बदललेल्या हवामानाने त्यावर पाणी पडले. प्रचाराच्या नियोजनाची धूळधाण उडाली. कार्यकर्तेच गोळा होऊ न शकल्याने उमेदवारांना स्वत:च फिरून जमेल तेवढा प्रचार करावा लागल्याची माहिती पाचही तालुक्यांतून हाती आली आहे. ओखी चक्रीवादळामुळे शाळांना सुटी देण्यात आली. तरीही काही शाळा पूर्ण किंवा अर्धा दिवस सुरू असल्याने कुटुंबे घरात अडकून पडली. सोमवार संध्याकाळपासून सुरू असलेला पाऊस मंगळवारीही दिवसभर अधूनमधून पडत होता. त्यामुळे शेती, पिकांवर लक्ष ठेवण्यात शेतकरी गुंतून गेले. भाजीपाल्याचे पीक घेणाºयांना या पावसाने तडाखा दिला. त्याच्यासह अन्य पिकांबाबत अंदाज घेण्याचे शेतकºयांचे काम दिवसभर सुरू होते.त्यामुळे ज्यांच्यासाठी प्रचार करायचा तेच जागेवर नसल्याने उमेदवारांचा विरस झाला. त्यातही अनेकांचे कार्यकर्तेच जमले नाहीत. खास करून महिला घरात, पावसामुळे कामात अडकून पडल्याने त्याही बाहेर पडल्या नाहीत. त्याचा फटका प्रचाराला बसला. 

टॅग्स :Ockhi Cycloneओखी चक्रीवादळ