शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अधिकाऱ्यांनी अन्न, औषधांचा दर्जा, मुदत, स्वच्छतेची नियमितपणे तपासणी करण्याची गरज!

By सुरेश लोखंडे | Updated: July 31, 2023 21:33 IST

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा करण्यात आला सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: थेट जनतेच्या जीविताशी संबंध असलेला अन्न व औषध प्रशासन विभाग फार महत्त्वाचा आहे. शासनाच्या या अत्यंत महत्त्वाच्या विभागातील अधिकाऱ्यांनी जबाबदारीने कर्तव्य बजावण्याची गरज आहे. त्यांनी अन्न व औषध औषधे याचा दर्जा, मुदत, स्वच्छता आदी बाबींची नियमितपणे तपासणी करावी. दूध व त्या व्यवसायाशी संबंधित स्वच्छतेबाबत अधिक लक्ष देणे गरजेचे आहे आदी जाणीव अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी ठाण्यातील कोकण विभागीय आढावा बैठकीत अधिकार्यांना करून देत त्यांची कान उघाडणी केली.

अन्न व औषध प्रशासन या महत्त्वाच्या विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायम सजग राहून जबाबदारीने काम करण्याची गरज आत्राम यांनी      ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात सोमवारी घेतलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाची कोकण विभागीय आढावा बैठकीत सांगितले. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यासह सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख, सहआयुक्त (औषधे) दुष्यंत भामरे, विभागातील सर्व सहाय्यक आयुक्त व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी मंत्री  आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या बैठकीत सहआयुक्त शसुरेश देशमुख व दुष्यंत भामरे यांनी विभागातील पदांची सद्य:स्थिती, गेल्या सहा महिन्यातील कामकाजाची, केलेल्या कारवायांची माहिती या बैठकीत दिली. कोकण विभागातील अन्न व औषध प्रशासन (अन्न) या विभागात एकूण १४१ अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून त्यापैकी ६९ पदे कार्यरत. तर ७२ पदे रिक्त आहेत, कर्मचाऱ्यांची ४१ पदे मंजूर असून त्यापैकी १७ कार्यरत तर २४ पदे रिक्त आहेत. वर्ग चारची २० पदे मंजूर असून त्यापैकी सहा कार्यरत तर १४ पदे रिक्त आहेत आणि कंत्राटी कर्मचारी २१८ पदे मंजूर असून त्यापैकी १०३ पदे कार्यरत तर ११५ पदे रिक्त असल्याची माहिती श देशमुख यांनी दिली. 

ठाणे जिल्ह्यात परवानाधारकांची संख्या २२ हजार ८२१ आहेत.  तर नोंदणीधारकांची संख्या ८७ हजार  सहा अशी एकूण मिळून एक लाख लाख ९ हजार ८२७ आहे. त्यांच्याकडून एक कोटी १४ लाख २७ हजार ४०० रुपये इतके शुल्क जमा झाले आहे. याप्रमाणेच संपूर्ण कोकण विभागात परवानाधारकांची संख्या ३७१ व नोंदणीधारकांची संख्या एक लाख ६८ हजार १०८ असे एकूण दोन लाख पाच हजार १६९ आहे. त्यांच्याकडून एक कोटी ६८ लाख २७ हजार २०० रुपये शुल्क जमा करण्यात आले आहे.

याचबरोबर औषधे विभागाची माहिती देताना सहआयुक्त (औषधे) शदुष्यंत भामरे यांनी सांगितले की, कोकण विभागात औषधे या विभागातील अधिकाऱ्यांची एकूण १५ पदे मंजूर असून त्यापैकी ११ पदे कार्यरत आहेत तर तीन पदे रिक्त आहेत. कर्मचाऱ्यांची ४३ पदे मंजूर आहेत, त्यापैकी १५ पदे कार्यरत व २८ पदे रिक्त आहेत. कोकण विभागातील एकूण १७३ ॲलोपॅथिक औषधी उत्पादक जागतिक आरोग्य संघटनेच्या धोरणानुसार निकष पाळत असल्यामुळे ते डब्ल्यूएच जीएमटी प्रमाणपत्रधारक आहेत. या विभागात सात हजार ५८ घाऊक औषध विक्रेते असून एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत १७८ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३८ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, १६ परवाने निलंबित करण्यात आले तर आठ परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती भामरे यांनी दिली.

उत्कृष्ठ अधिकारी - कर्मचाऱ्यांचा सन्मान

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या ईट राईट चँलेंज स्पर्धेत मीरा-भाईंदर, वाशी नवी मुंबई व ठाणे या या शहरांनी अन्न सुरक्षा मध्ये उच्च गुणांकन मिळविल्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते व अन्न सुरक्षा आयुक्त.अभिमन्यू काळे  यांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासनातील सहाय्यक आयुक्त दिगंबर भोगावडे, परमेश्वर सिंगरवाड, व्यंकटेश वेदपाठक तसेच अन्न सुरक्षा अधिकारी उत्तरेश्वर बडे,अरविंद खडके, डॉ.राम मुंडे, संतोष शिरोशिया यांचा गौरव करण्यात आला.

टॅग्स :thaneठाणे