शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पदाधिकाऱ्यांनी बळकावली मोक्याची हॉटेल

By admin | Updated: February 3, 2017 03:14 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणाऱ्या निमंत्रित साहित्यिकांसाठी विविध हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला

- मुरलीधर भवार, डोंबिवलीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणाऱ्या निमंत्रित साहित्यिकांसाठी विविध हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला साहित्यिक डोंबिवलीत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, विविध हॉटेलमध्ये विचारणा केली असता साहित्यिक डोंबिवलीत दाखल झालेले नव्हते. मात्र, मोक्याची हॉटेल मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बळकावल्याचे दिसून आले. संमेलनाला जवळपास २०० साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यातील काही साहित्यिकांची रसिकांनी ‘साहित्यिक आपल्या घरी’ या उपक्रमांतर्गत राहण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन आयोजकांनी केले होते. त्याला ३० पेक्षा जास्त रसिकांचा प्रतिसाद मिळाला. आयोजकांनी सांगितले की, किमान १२० साहित्यिकांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. त्यासाठी आयोजकांनी हॉटेल सुयोग, विजयसागर, कुशाला आणि नंदी पॅलेस ही चार बडी हॉटेल्स बुक केली आहेत. त्यापैकी विजयसागर व कुशाला ही साहित्य संमेलनच्या पु.भा. भावे नगरीपासून बरीच दूर आहेत. तेथे चौकशी केली असता सायंकाळपर्यंत एकही साहित्यिक उतरलेले नाहीत. मात्र, आयोजकांनी रूम बुक केल्या आहेत, असे हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्ट केले. सुयोग व नंदीपॅलेस ही दोन्ही हॉटेल्स पु.भा. भावे साहित्यनगरीपासून तुलनेत जवळ आहेत. ‘सुयोग’मध्ये अखिल भारतीय महामंडळाच्या आठ सदस्यांचे सकाळी ११ वाजताच आगमन झाले. त्यांनी तेथे दुपारी विश्रांती घेतली, तर काही शहरात फेरफटका मारायला गेल्याची माहिती मिळाली. ‘नंदी पॅलेस’मध्ये महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी व अन्य तीन पदाधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. या दोन्ही हॉटेलमध्ये साहित्यिकांचे वास्तव्य नसल्याने मोक्याची सुयोग व नंदी पॅलेस ही हॉटेल्स महामंडळाच्या सदस्य मंडळींनी बळकावली आहेत.पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाच्या तुलनेत डोंबिवलीतील साहित्य संमेलनास साहित्यिकांची उपस्थिती कमीच दिसून येणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाचे आयोजन डी. वाय. पाटील विद्यापीठाने केले होते. त्या संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांसाठी आयोजकांनी गाड्यांची व्यवस्था करण्याबरोबरच चांगले मानधनही दिले होते. उपस्थिती कमी राहण्याची चिन्हेआगरी युथ फोरमने पाच कोटींचा निधी जमवण्याची भीष्मगर्जना केली होती. परंतु, नोटाबंदी व निवडणूक आचारसंहिता आड आली. त्यामुळे संमेलनाच्या खर्चास आपोआपच कात्री लागली. यायलाजायला गाडी नाही. मानधन मिळणार की नाही. स्वखुशीने मानधन परत केल्यास चांगले. जवळच्या साहित्यिकांनी मानधन घेऊ नये, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे साहित्यिकांची उपस्थिती कमीच असणार आहे.