शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
3
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
4
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
5
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
6
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
7
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
8
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
9
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
10
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
11
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
12
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
13
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
14
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
15
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
16
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
17
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
18
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
19
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
20
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप

पदाधिकाऱ्यांनी बळकावली मोक्याची हॉटेल

By admin | Updated: February 3, 2017 03:14 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणाऱ्या निमंत्रित साहित्यिकांसाठी विविध हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला

- मुरलीधर भवार, डोंबिवलीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला येणाऱ्या निमंत्रित साहित्यिकांसाठी विविध हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला साहित्यिक डोंबिवलीत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, विविध हॉटेलमध्ये विचारणा केली असता साहित्यिक डोंबिवलीत दाखल झालेले नव्हते. मात्र, मोक्याची हॉटेल मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बळकावल्याचे दिसून आले. संमेलनाला जवळपास २०० साहित्यिकांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यातील काही साहित्यिकांची रसिकांनी ‘साहित्यिक आपल्या घरी’ या उपक्रमांतर्गत राहण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन आयोजकांनी केले होते. त्याला ३० पेक्षा जास्त रसिकांचा प्रतिसाद मिळाला. आयोजकांनी सांगितले की, किमान १२० साहित्यिकांची हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. त्यासाठी आयोजकांनी हॉटेल सुयोग, विजयसागर, कुशाला आणि नंदी पॅलेस ही चार बडी हॉटेल्स बुक केली आहेत. त्यापैकी विजयसागर व कुशाला ही साहित्य संमेलनच्या पु.भा. भावे नगरीपासून बरीच दूर आहेत. तेथे चौकशी केली असता सायंकाळपर्यंत एकही साहित्यिक उतरलेले नाहीत. मात्र, आयोजकांनी रूम बुक केल्या आहेत, असे हॉटेल व्यवस्थापनाने स्पष्ट केले. सुयोग व नंदीपॅलेस ही दोन्ही हॉटेल्स पु.भा. भावे साहित्यनगरीपासून तुलनेत जवळ आहेत. ‘सुयोग’मध्ये अखिल भारतीय महामंडळाच्या आठ सदस्यांचे सकाळी ११ वाजताच आगमन झाले. त्यांनी तेथे दुपारी विश्रांती घेतली, तर काही शहरात फेरफटका मारायला गेल्याची माहिती मिळाली. ‘नंदी पॅलेस’मध्ये महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी व अन्य तीन पदाधिकाऱ्यांचे वास्तव्य आहे. या दोन्ही हॉटेलमध्ये साहित्यिकांचे वास्तव्य नसल्याने मोक्याची सुयोग व नंदी पॅलेस ही हॉटेल्स महामंडळाच्या सदस्य मंडळींनी बळकावली आहेत.पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाच्या तुलनेत डोंबिवलीतील साहित्य संमेलनास साहित्यिकांची उपस्थिती कमीच दिसून येणार आहे. पिंपरी-चिंचवडच्या संमेलनाचे आयोजन डी. वाय. पाटील विद्यापीठाने केले होते. त्या संमेलनाला येणाऱ्या साहित्यिकांसाठी आयोजकांनी गाड्यांची व्यवस्था करण्याबरोबरच चांगले मानधनही दिले होते. उपस्थिती कमी राहण्याची चिन्हेआगरी युथ फोरमने पाच कोटींचा निधी जमवण्याची भीष्मगर्जना केली होती. परंतु, नोटाबंदी व निवडणूक आचारसंहिता आड आली. त्यामुळे संमेलनाच्या खर्चास आपोआपच कात्री लागली. यायलाजायला गाडी नाही. मानधन मिळणार की नाही. स्वखुशीने मानधन परत केल्यास चांगले. जवळच्या साहित्यिकांनी मानधन घेऊ नये, अशा अपेक्षा व्यक्त होत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे साहित्यिकांची उपस्थिती कमीच असणार आहे.