शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

गणरायांच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 23:54 IST

अंतर्गत रस्त्यांची तात्पुरती डागडुजी निरर्थक : पावसाचा डांबरीकरणाला खोडा

डोंबिवली : गणेशोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होत असताना या पार्श्वभूमीवर खड्डेमय रस्त्यांची तात्पुरती केलेली डागडुजी निरर्थक ठरली आहे. खड्ड्यांच्या भोवताली मारलेले पॅच पुन्हा उखडल्याने खड्डेमय स्थिती निर्माण झाली. त्याचबरोबर कामाच्या गुणवत्तेचीही पोलखोल झाली आहे. यात शुक्रवारपासून पावसानेही हजेरी लावल्याने डांबरीकरणाच्या कामांनाही खोडा बसल्याने यंदाही गणरायांच्या आगमनाच्या वाटेत खड्ड्यांचे विघ्न कायम आहे.

बहुतांश रस्त्यांमधील खड्डे डांबरीकरणाने भरल्याचा दावा केडीएमसीकडून केला जात आहे. मात्र, अनेक भागांत आजही खड्ड्यांमुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. याप्रकरणी शनिवारी मनसेतर्फे डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून खड्डेरत्न पुरस्कार देण्यात आला होता. त्यात आता ज्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या जागी डांबरीकरणाचे पॅच मारले होते. तेही आता पूर्णपणे उखडले गेले आहेत. दोन दिवसांच्या पडलेल्या पावसाने डांबर वाहून गेल्याने पुन्हा खड्डे निर्माण झाल्याचे चित्र ठाकुर्लीतील म्हसोबा चौक ते पंचायत बावडीदरम्यान प्रामुख्याने दिसून येते. कोपर उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना बंदी घातल्याने म्हसोबा चौक ते पंचायत बावडी या मार्गानेच कल्याणमार्गे तसेच चोळगाव मार्गाने येणाऱ्या त्या वाहनांची वाहतूक होत आहे.खड्ड्यांमुळे वाहतूक मंदावून या ठिकाणी सद्य:स्थितीला कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती शहरात अन्य ठिकाणीही पाहायला मिळत आहे. खड्ड्यांच्या अवतीभोवती मारलेल्या पॅचच्या ठिकाणी डांबर निघू लागल्याने दुचाकी घसरण्याचाही धोका निर्माण झाला आहे. पश्चिमेकडील बावनचाळीतील काँक्रिटीकरणाच्या रस्त्याला लागून असलेल्या डांबराच्या रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. पश्चिमेला ज्या ठिकाणी गणपती मंदिराचा पादचारी पूल उतरतो, तिथेही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. दुसरीकडे पावसाचे आगमन झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. त्यामुळे डांबरीकरणाच्या कामांनाही ब्रेक लागल्याचे दिसत आहे. आधीच खड्डेमय रस्ते, त्यात तात्पुरती डागडुजी केलेले रस्त्यांवरील डांबरही निघून पुन्हा खड्डे निर्माण झाल्याचे चित्र कल्याण पश्चिम आणि पूर्व भागातही बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे. खडी बाहेर निघाल्याने वाहनांच्या टायरमुळे उडून तिच्यामुळे दुखापत होण्याचीही भीती पादचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. रविवारीही पावसाची रिपरिप सुरूच राहिल्याने खड्डेमय स्थिती ‘जैसे थे’च राहण्याची चिन्हे आहेत.डांबर टाकताना त्यातील तापमान योग्य पाहिजे, डांबराच्या जाडीचा थर समप्रमाणात असणे आवश्यक आहे. डांबराचा नमुना तपासणे महत्त्वाचे आहे. जेथे काम सुरू आहे, तिथे फिल्ड लॅब असणे बंधनकारक आहे, याकडे पुरते दुर्लक्ष झालेले आहे.‘हे’ खड्डे कधी बुजविणार?एकीकडे केडीएमसीने आपल्या अखत्यारीतील बहुतांश खड्डे डांबराने भरल्याचा दावा केला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाला घरडा सर्कल ते टाटानाका या त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील खड्डे भरायला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.खंबाळपाडा, न्यू कल्याण रोड म्हणून ओळखल्या जाणाºया या रस्त्याच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहातील चौक परिसराची खड्ड्यांनी पुरती चाळण केली आहे. पुढे विकासनाका परिसरातही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खंबाळपाडा रोडनजीकच चोळेगाव तलाव असून या ठिकाणी विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींना आणले जाते.गणरायांचे आगमन खड्ड्यांतून होत असताना विसर्जनापूर्वी तरी हे खड्डे बुजतील का, असा सवाल गणेशभक्तांकडून उपस्थित केला जात आहे. खंबाळपाडा ते म्हसोबा चौकात जाणाºया ९० फूट रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य असून खोलवर गेलेल्या खड्ड्यांतून मार्ग काढताना जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत.कोपर उड्डाणपुलावरही खड्डेकमकुवत झाल्याने अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद केलेला डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणाºया कोपर उड्डाणपुलावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.या पुलावरून सध्या अवजड वाहने वगळता अन्य वाहनांची वाहतूक सुरू आहे. पूल कमकुवत झाल्याने त्यावरील वजन कमी करण्यासाठी त्यावरील तीन ते चार इंच डांबराचा थर कमी केला आहे.आता पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावसाचे पाणीही साचत असल्याने खड्ड्यांची खोली समजून येत नसल्यामुळे येथून वाहन नेताना चालकांना कसरतच करावी लागत आहे. 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाdombivaliडोंबिवली