शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

शीळ-कल्याणफाटा येथील प्रस्तावित दोन पुलांना ७६ बांधकामांचा अडसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 00:25 IST

३१ इमारती, ४५ शेड्सचा समावेश : वीज, जलवाहिन्यांसाठी वनविभागाची हवी परवानगी

नारायण जाधवठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील अत्यंत गजबजलेल्या जंक्शनपैकी एक असलेल्या शीळ-कल्याणफाटा येथील प्रस्तावित दोन उड्डाणपूल आणि भुयारीमार्गाच्या खर्चात तब्बल सव्वाशे कोटी रुपयांची वाढ झाली असतानाच आता त्याच्या मार्गात येणाऱ्या ३१ इमारती आणि ४५ शेड्स तोडण्याचे मोठे आव्हान ठाणे महापालिकेला पेलावे लागणार आहे.

याशिवाय, या मार्गाच्या विस्तारीकरणासह हे दोन उड्डाणपूल आणि भुयारीमार्गासाठी परिसरातील महावितरणच्या उच्चदाब वीजवाहिन्या स्थलांतरित, तर एमआयडीसीची ३.५ किमीची १८०० मिमी व्यासाची जलवाहिनी दोन मीटर भूमिगत करावी लागणार आहे. या दोन्ही वाहिन्या वनविभागाच्या जागेवर असून त्या स्थलांतरित करण्यासाठी वा भूमिगत करण्यासाठी वनविभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएला थेट दिल्लीचे दरवाजे ठोठावे लागणार आहेत.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनमुळे या प्रकल्पाच्या आराखड्यात पुन्हा बदल करावा लागल्याने त्याचा पूर्वीचा २८६ कोटींचा खर्च आता ४१० कोटी एक लाख ९४ हजारांवर गेला आहे. अशातच एमएमआरडीएच्या अहवालानुसार आता या ३१ इमारती व ४५ शेड्स तोडण्याचे नवे आव्हान ठाणे महापालिकेला पेलावे लागणार आहे.वाहतुकीचे करावे लागणार नियोजनठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह पनवेल या चार महानगरांचा होणारा विकास आणि डोंबिवली, तळोजा, ठाणे-बेलापूर एमआयडीसीसह जेएनपीटी बंदरातून मुंबई-अहमदाबाद, नाशिक कडे जाणारी कंटेनरची अवजड वाहतूक या परिसरातून येजा करते. यामुळे शीळफाटा उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू झाल्यानंतर ही वाहतूक कोणत्या मार्गे वळवावी, याचे नियोजन वाहतूक पोलिसांना करावे लागणार आहे. सध्या शीळ-महापे-कल्याण-भिवंडी आणि ठाणे-बेलापूर हे दोनच पर्यायी मार्ग आहेत. आधीच या मार्गांवर मोठी वर्दळ असल्याने वाहतूक नियोजनाचेही आव्हान राहणार आहे.पुनर्वसनाचा खर्च करणार कोण?गेल्या काही वर्षांत ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीसह पनवेल या महानगरांचा विस्तार झपाट्याने झाला आहे. या परिसरात काही खासगी विकासकांच्या टाउनशिपही येऊ घातल्या आहेत. यामुळे शीळफाटा परिसरास व्यापारी दृष्टीने मोठे महत्त्व आहे. यामुळे येथील जागांना सोन्याचा भाव आला असून या इमारती आणि शेड तोडून तेथील रहिवासी आणि व्यापाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी कोट्यवधी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प एमएमआरडीएचा असून बांधकामे मात्र ठाणे महापालिकेला तोडावी लागणार आहेत. यामुळे पुनर्वसनाचा खर्च कोणी करायचा, यावरून या दोन्ही संस्थांत जुंपण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाmmrdaएमएमआरडीए