शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

ओबीसी ,एसटी आणि एसएसी ही वर्गवारी रद्द करुन स्वतंत्र आयोग नेण्यात यावा, गोर अभ्यासक आरजूनिया भुकिया यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 20:31 IST

भारतीय संविधानातील तरतूदीनुसार घटक राज्यात ओबीसी, एसटी, एससी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी रद्द करुन त्यासाठी एकच आयोग नेण्यात यावा अशी मागणी गोरसमाजाचे अभ्यासक आरजुनिया सितीया भुकिया यांनी केली आहे.

 डोंबिवली - भारतीय संविधानातील तरतूदीनुसार घटक राज्यात ओबीसी, एसटी, एससी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ही वर्गवारी रद्द करुन त्यासाठी एकच आयोग नेण्यात यावा अशी मागणी गोरसमाजाचे अभ्यासक आरजुनिया सितीया भुकिया यांनी केली आहे.आॅल इंडिया बंजारा सेवा संघ, भारत यांच्यातर्फे पाचव्या अखिल भारतीय गोरबंजारा साहित्य संमेलनाचे येथील सावित्रीबाई फुले नाटयगृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी भुकिया बोलत होते. या संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात विचारवेध ,बंजारा गीतमाला, ओबीसी आरक्षण विभाजन महाचर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. गणेश चव्हाण, संमेलन स्वागताध्यक्ष शंकर पवार,विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड, एआयबीएसएसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजू नाईक, नागपूर महाविद्यालयातील प्रिन्सीपल डॉ. गणेश चव्हाण, संतोष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.भुकिया म्हणाले, बंजारा भाषेला कोणत्याही वर्गवारीत न टाकता त्यासाठी एक स्वतंत्र आयोग नेमला जावा. त्यासाठी भारत सरकाराच्या भाषा विभागाकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. २०१६ मध्ये नरेंद्र मोदींना भेटून त्यांच्याकडे मसूदा सुपुर्द केला आहे, असे सांगितले.शंकर पवार यांनी सांगितले, बंजारा समाजाचे चांगले साहित्य निर्माण झाले पाहिजे. या समाजात एकी दिसून आली पाहिजे. त्यासाठी सामाजिक, राजकीय आणि आर्थिक संघटनेने एकत्र येऊन काम केले पाहिजे. समाजातील नेतेमंडळीनी पुढाकार घेऊन गरजू मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली पाहिजे.राजू नाईक म्हणाले, बंजारा समाजाचा जागतिक स्तरावर कोणताही धर्म नाही. या समाजाला जागतिक स्तरावर धर्म म्हणून स्वतंत्र स्थान मिळाले पाहिजे. राजकारणात लोकसभेप्रमाणे राज्यसभेत बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व मिळालेले नाही. बंजारा समाजाचे साहित्य इंग्रजी भाषेतून निर्माण झाले पाहिजे. व त्याला जागतिक दर्जाचा वाचक निर्माण झाला पाहिजे, असे सांगितले.प्रत्येक राज्याच्या अभ्यासक्रमात गोर बंजारा भाषेचा समावेश असावा - डॉ. गणेश चव्हाणविद्यार्थ्यांना गोर बंजारा भाषेचे ज्ञान असावे त्यासाठी प्रत्येक राज्याच्या अभ्यासक्रमात गोर बंजारा बोलीभाषेचा समावेश असावा. केवळ बोलीभाषेचाच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहास ही तरूणपिढीला समजला पाहिजे. याकरिता त्यांचा ही समावेश अभ्यासक्रमात केला पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या चौथ्या सत्रात ओबीसी आरक्षण विभाजन महाचर्चा यावर बोलताना हरिभाऊ राठोड यांनी बंजारा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करावे असे मत मांडल्यामुळे त्यांना प्रेक्षकांमधून कोणीच बोलू दिले नाही. त्यांना स्वतंत्र स्थान पाहिजे आहे. संमेलनातील महत्वाचे ठराव- गोर बंजारा बोलीभाषेला संविधानाच्या आठव्या सूचीमध्ये भाषेला दर्जा मिळण्यात यावा- महापुरूषांच्या विचारधारेचे साहित्य निर्मितीसाठी शासनाने मदत करावी.- समाजामधील वाढती हुंडा पध्दतीसाठी शासनाचे विविध कार्यक्रम व योजना राबविण्यात यावे- गोर बंजारा बोलीभाषेला मौखिक साहित्य निर्माण करणाºया साहित्यीकांना मानधन व प्रवासभत्ता मंजूर करण्यात यावा.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे