शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

जिल्ह्याची रुग्णसंख्या हजाराखाली, कोरोनाबाबत दीड महिन्यानंतर दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 3:09 AM

कोरोनाबाबत दीड महिन्यानंतर दिलासा : मंगळवारी झाली ९४८ रुग्णांची नोंद

ठाणे : रोज तेराशे ते दीड हजारावर संख्येने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मंगळवारी ठाणे जिल्ह्यात तब्बल चारशे ते पाचशेने घट झाली. मंगळवारी जिल्ह्यात ९४८ रुणांसह ३५ मृत्यूंची नोंद झाली. यामुळे जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ९१ हजार १०२ झाली असून, मृतांची संख्या दोन हजार ५१६ वर गेली आहे.

ठाणे मनपा क्षेत्रात कोरोनाचे २१२ रुग्ण नव्याने आढळल्याने शहरात २० हजार १५१ कोरोनाच्या रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. तर आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे ६६५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. केडीएमसी हद्दीत १५४ रुग्णांची वाढ झाली. तर, आठ जणांच्या मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २० हजार ६१ रुग्ण बाधित झाले आहेत.नवी मुंबई महापालिकेत २५३ रुग्णांची तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत बाधितांची संख्या १६, ६७९ झाली असून, मृतांची संख्या ४३७ वर गेली आहे. उल्हासनगर महापालिका परिसरात मंगळवारी तीन जणांचा मृत्यू झाला असून ४४ नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत मृतांची संख्या १३१ तर ६,९८८ बाधित रुग्णांची नोंद झाली. भिवंडी महापालिका क्षेत्रात १४ बाधित आढळले. तर तीन मृत्यूची नोंद करण्यात आली असून यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ६८५ झाली असून, मृतांची संख्या २०८ झाली आहे. मीरा भार्इंदरमध्ये ८८ रुग्णांसह एका मृत्यूची नोंद करण्यात आली. या शहरात आता बाधितांची संख्या आठ हजार ८२४ झाली तर मृतांची संख्या २८८ झाली.अंबरनाथमध्ये दोघांचा मृत्यू : अंबरनाथमध्य १२ रुग्णांसह दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या ३,९४९ झाली तर मृतांची संख्या १५८ वर गेली आहे. बदलापूरमध्ये ६१ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या २,८०६ झाली आहे. या शहरात एकही मृत्यू झालेला नाही. येथे यापूर्वीची मृत्यूची संख्या ४८ आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ११० रुग्णांची वाढ झाली. यामुळे बाधितांची संख्या सहा हजार ९५९ आणि मृतांची संख्या १७२ झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेcorona virusकोरोना वायरस बातम्या