शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या ९० हजार पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 01:15 IST

सोमवारी १,३२८ नवे रुग्ण सापडले : आरोग्य विभागाने दिली माहिती

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार ३२८ नव्या रुग्णांची सोमवारी वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ९० हजार १५४ वर गेली. तर, ३४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या दोन हजार ४८१ झाली.

ठामपा हद्दीत कोरोनाचे २६७ रुग्ण सोमवारी नव्याने आढळले. यामुळे रुग्णसंख्या १९ हजार ९३९ झाली, असून चौघांच्या मृत्यूने सोमवारपर्यंत ६५७ मृत्यूंची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ३७४ नव्या रुग्णांची वाढ झाली, तर १० जणांचा मृत्यू झाला. यामुळे रुग्णसंख्या २० हजार ९०७ झाली आहे. उल्हासनगरात चार जणांचा मृत्यू झाला असून ५९ नवे रुग्ण आढळले. यामुळे आतापर्यंत मृतांची संख्या १४२ झाली असून सहा हजार ९४४ बाधितांची संख्या झाली आहे. भिवंडीला २२ रुग्ण नव्याने आढळले, तर तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. येथे आतापर्यंत बाधित तीन हजार ६७१ तर मृत्यूंचा आकडा २०५ झाला आहे. मीरा-भार्इंदरला १२९ नव्या रुग्णांची भर पडली असून तिघांचा मृत्यू झाल्याने बाधितांची संख्या आठ हजार ७३७ तर मृतांची २८७ झाली.

अंबरनाथमध्ये ५५ जण आढळले. चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. आता बाधित तीन हजार ९३७ तर मृत्यू १५६ झाले. बदलापूरमध्ये ६४ रुग्ण सापडल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ७४४ झाली असून शहरात चार दिवसांपासून एकही मृत्यू नाही. त्यामुळे मृत्यूंची संख्या ४८ कायम आहे. ग्रामीण भागात ४८ नवे रुग्ण सापडले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. यामुळे बाधितांचा आकडा सहा हजार ८४० तर मृत्युसंख्या १६५ झाली आहे. 

टॅग्स :thaneठाणे