शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात अपघातांबरोबर बळी आणि जखमींचीही संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:52 IST

दरवर्षी १० टक्क्यांनी अपघात कमी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.

ठाणे : दरवर्षी १० टक्क्यांनी अपघात कमी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्वच यंत्रणा कामाला लागल्या असून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण हे तब्बल २१ टक्क्यांनी कमी झाले असून, त्यामुळे बळींचे प्रमाण २६, तर जखमींचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले आहे. शहरी भागात हे प्रमाण १२ टक्क्यांनी कमी झाले आहे. अपघातात बळींची टक्केवारी १३ आणि जखमींची २० टक्क्यांनी कमी झाल्याचे राज्याच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.राज्यातील रस्ते अपघातांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यानुसार, सर्वच यंत्रणा रस्ते अपघात रोखण्यासाठी कामाला लागल्या. २०१८ पासून राज्यातील ३४ जिल्हे आणि नऊ शहरे अशा ४३ ठिकाणी एकूण ३५ हजार ७१७ अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामध्ये १३ हजार २६१ जणांचा अपघातात मृत्यू झाला, तर ३१ हजार ३६५ जण जखमी झाले होते. २०१८ च्या तुलनेत २०१९ साली हे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी झाले. २०१९ मध्ये ३२ हजार ८७६ अपघात झाले असून त्यामध्ये १२ हजार ५६५ जण मृत्युमुखी तर २८ हजार ८९८ जण जखमी झाले आहेत.ठाणे शहरात २०१८ साली ९९० अपघात झाले असून त्यामध्ये २४९ जणांचा मृत्यू, तर ९९८ जण जखमी झाले होते. २०१९ हे प्रमाण कमी झाले. या वर्षात ८७४ अपघातांमध्ये २१७ जणांचा बळी गेला असून ७९४ जण जखमी झाले. टक्केवारीनुसार अपघातांचे प्रमाण १२ टक्क्यांनी कमी झाले. बळींचे प्रमाण १३ आणि जखमींचे प्रमाणही २० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसत आहे. ठाणे ग्रामीण भागात हे प्रमाण २१ टक्क्यांनी कमी झाले आहे. ग्रामीण भागात २०१८ मध्ये ८९८ अपघात झाले होते. त्यामध्ये ३०१ जणांचा मृत्यू, तर ६४२ जण जखमी झाले होते. २०१९ मध्ये ७११ अपघात झाले. त्यामध्ये २२२ जणांचा बळी गेला असून ५७६ जण जखमी झाले आहेत.>ब्लॅक स्पॉटकडे यंत्रणांनी केले लक्ष केंद्रितजिल्ह्यात सद्य:स्थितीत असलेल्या १०८ ब्लॅक स्पॉटवर लक्ष केंद्रित करत, ११ यंत्रणांनी त्या स्पॉटवर सुचवलेल्या छोट्यामोठ्या दुरुस्तीची अंमलबजावणी केली आहे.परिणामस्वरुप, एक वर्षात अपघातांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वाहतूक शाखा आणि आरटीओ विभाग प्रयत्न करत आहे.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांनी केले आहे.