शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

ठाणे जिल्ह्यात अपघातांबरोबर बळी आणि जखमींचीही संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:52 IST

दरवर्षी १० टक्क्यांनी अपघात कमी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.

ठाणे : दरवर्षी १० टक्क्यांनी अपघात कमी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्वच यंत्रणा कामाला लागल्या असून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण हे तब्बल २१ टक्क्यांनी कमी झाले असून, त्यामुळे बळींचे प्रमाण २६, तर जखमींचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले आहे. शहरी भागात हे प्रमाण १२ टक्क्यांनी कमी झाले आहे. अपघातात बळींची टक्केवारी १३ आणि जखमींची २० टक्क्यांनी कमी झाल्याचे राज्याच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.राज्यातील रस्ते अपघातांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यानुसार, सर्वच यंत्रणा रस्ते अपघात रोखण्यासाठी कामाला लागल्या. २०१८ पासून राज्यातील ३४ जिल्हे आणि नऊ शहरे अशा ४३ ठिकाणी एकूण ३५ हजार ७१७ अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामध्ये १३ हजार २६१ जणांचा अपघातात मृत्यू झाला, तर ३१ हजार ३६५ जण जखमी झाले होते. २०१८ च्या तुलनेत २०१९ साली हे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी झाले. २०१९ मध्ये ३२ हजार ८७६ अपघात झाले असून त्यामध्ये १२ हजार ५६५ जण मृत्युमुखी तर २८ हजार ८९८ जण जखमी झाले आहेत.ठाणे शहरात २०१८ साली ९९० अपघात झाले असून त्यामध्ये २४९ जणांचा मृत्यू, तर ९९८ जण जखमी झाले होते. २०१९ हे प्रमाण कमी झाले. या वर्षात ८७४ अपघातांमध्ये २१७ जणांचा बळी गेला असून ७९४ जण जखमी झाले. टक्केवारीनुसार अपघातांचे प्रमाण १२ टक्क्यांनी कमी झाले. बळींचे प्रमाण १३ आणि जखमींचे प्रमाणही २० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसत आहे. ठाणे ग्रामीण भागात हे प्रमाण २१ टक्क्यांनी कमी झाले आहे. ग्रामीण भागात २०१८ मध्ये ८९८ अपघात झाले होते. त्यामध्ये ३०१ जणांचा मृत्यू, तर ६४२ जण जखमी झाले होते. २०१९ मध्ये ७११ अपघात झाले. त्यामध्ये २२२ जणांचा बळी गेला असून ५७६ जण जखमी झाले आहेत.>ब्लॅक स्पॉटकडे यंत्रणांनी केले लक्ष केंद्रितजिल्ह्यात सद्य:स्थितीत असलेल्या १०८ ब्लॅक स्पॉटवर लक्ष केंद्रित करत, ११ यंत्रणांनी त्या स्पॉटवर सुचवलेल्या छोट्यामोठ्या दुरुस्तीची अंमलबजावणी केली आहे.परिणामस्वरुप, एक वर्षात अपघातांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वाहतूक शाखा आणि आरटीओ विभाग प्रयत्न करत आहे.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांनी केले आहे.