शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

ठाणे जिल्ह्यात अपघातांबरोबर बळी आणि जखमींचीही संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:52 IST

दरवर्षी १० टक्क्यांनी अपघात कमी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत.

ठाणे : दरवर्षी १० टक्क्यांनी अपघात कमी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यानुसार, राज्यातील सर्वच यंत्रणा कामाला लागल्या असून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अपघातांचे प्रमाण हे तब्बल २१ टक्क्यांनी कमी झाले असून, त्यामुळे बळींचे प्रमाण २६, तर जखमींचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले आहे. शहरी भागात हे प्रमाण १२ टक्क्यांनी कमी झाले आहे. अपघातात बळींची टक्केवारी १३ आणि जखमींची २० टक्क्यांनी कमी झाल्याचे राज्याच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.राज्यातील रस्ते अपघातांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने सर्वच यंत्रणांना फटकारले आहे. त्यानुसार, सर्वच यंत्रणा रस्ते अपघात रोखण्यासाठी कामाला लागल्या. २०१८ पासून राज्यातील ३४ जिल्हे आणि नऊ शहरे अशा ४३ ठिकाणी एकूण ३५ हजार ७१७ अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामध्ये १३ हजार २६१ जणांचा अपघातात मृत्यू झाला, तर ३१ हजार ३६५ जण जखमी झाले होते. २०१८ च्या तुलनेत २०१९ साली हे प्रमाण आठ टक्क्यांनी कमी झाले. २०१९ मध्ये ३२ हजार ८७६ अपघात झाले असून त्यामध्ये १२ हजार ५६५ जण मृत्युमुखी तर २८ हजार ८९८ जण जखमी झाले आहेत.ठाणे शहरात २०१८ साली ९९० अपघात झाले असून त्यामध्ये २४९ जणांचा मृत्यू, तर ९९८ जण जखमी झाले होते. २०१९ हे प्रमाण कमी झाले. या वर्षात ८७४ अपघातांमध्ये २१७ जणांचा बळी गेला असून ७९४ जण जखमी झाले. टक्केवारीनुसार अपघातांचे प्रमाण १२ टक्क्यांनी कमी झाले. बळींचे प्रमाण १३ आणि जखमींचे प्रमाणही २० टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसत आहे. ठाणे ग्रामीण भागात हे प्रमाण २१ टक्क्यांनी कमी झाले आहे. ग्रामीण भागात २०१८ मध्ये ८९८ अपघात झाले होते. त्यामध्ये ३०१ जणांचा मृत्यू, तर ६४२ जण जखमी झाले होते. २०१९ मध्ये ७११ अपघात झाले. त्यामध्ये २२२ जणांचा बळी गेला असून ५७६ जण जखमी झाले आहेत.>ब्लॅक स्पॉटकडे यंत्रणांनी केले लक्ष केंद्रितजिल्ह्यात सद्य:स्थितीत असलेल्या १०८ ब्लॅक स्पॉटवर लक्ष केंद्रित करत, ११ यंत्रणांनी त्या स्पॉटवर सुचवलेल्या छोट्यामोठ्या दुरुस्तीची अंमलबजावणी केली आहे.परिणामस्वरुप, एक वर्षात अपघातांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वाहतूक शाखा आणि आरटीओ विभाग प्रयत्न करत आहे.अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवी गायकवाड यांनी केले आहे.