शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
4
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
5
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
6
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
7
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
8
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
9
...तरच महिलांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, महाराष्ट्र सरकारने नियम बदलले
10
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
11
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
12
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
13
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
14
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
15
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
16
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
17
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
19
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
20
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली

भारत हा देश बुद्ध-गांधींचा आहे; तो गोळवलकरांचा होणार नाही - आ. आव्हाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 18:26 IST

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण तापलेले असतानाच महाराष्ट्रातील पहिले आंदोलन ठाणे शहरात झाले.

ठाणे : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभर वातावरण तापलेले असतानाच महाराष्ट्रातील पहिले आंदोलन ठाणे शहरात झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत या कायद्याच्या प्रती जाळल्या. तसेच मोदी- शहा हे हिटलरच्या वाटेवर असल्याचा आरोप करीत हिटलरच्याही प्रतिमेचे दहन करण्यात आले.दरम्यान, या विधेयकाबाबत भाजपकडून सांगण्यात आले की,“ पाकिस्तानी हिंदूंची संख्या घटत गेली आहे”  त्यांच्या या वाक्याचा अर्थ काय समजायचा? ही मुस्लीम धर्मीयांना धमकी आहे काय?  या देशाने बुद्ध आणि गांधी यांची अहिंसा आणि शांतता स्वीकारली आहे. द्वेष आणि हिंसा ही मूल्ये भारताने कधीच स्वीकारली नाहीत. त्यामुळेच भारत प्रगतीकडे वाटचाल करू शकला तर पाकिस्तान रसातळाला गेला. तुमची ही वाक्ये आता भारताला रसातळाला नेणारी आहेत. पण भारत हा बुद्ध आणि गांधींचा आहे. तो कधीच गोळवलकरांचा होणार नाही,  अशी टीका यावेळी आ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. मोदी सरकारने राक्षसी बहुमताच्या जोरावर लोकसभेमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेतले आहे. या विधेयकामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच धर्माच्या आधारे नागरिकत्व ठरवण्यात येणार आहे. त्याचा निषेध ईशान्येकडील राज्यांमध्ये केला जात असतानाच उत्तर आणि दक्षिण भारतामधील पहिले आंदोलन ठाणे शहरात झाले. मोदी सरकार मुर्दाबाद, धर्मांध सरकार हाय-हाय, अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले की, 31 डिसेंबर 2014 पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या गैर मुस्लिम नागरिकांना यामुळे नागरिकत्व मिळणार आहे. यात फक्त मुस्लिमांना वगळण्यात आले आहे.  1985 च्या आसाम कायद्यानुसार 1971 च्या नंतर आलेल्या सर्व नागरिकांना बेकायदेशीर ठरवले आहे. त्यात कोणत्याही धर्माचा उल्लेख नाही. पण, भाजप सरकार फक्त मुस्लिमांना वगळून इतरांना नागरिकत्व देऊ पाहत आहे. त्याची सुरुवात एनआरसी कायद्याद्वारे झाली होती. भारताचे 5 वे राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद  यांच्या कुटुंबीयांनाच एनआरसी यादीतून वगळण्यात आले होते. देश दुभंगण्याचे राजकारण गेली सहा वर्षे सुरू आहे. त्याच्या अंतिम चरणामध्ये देश आला आहे.या देशात अस्वस्थता निर्माण करायची; त्या माध्यमातून देशाची आर्थिक नाडी जी बंद व्हायला आली आहे.  त्यावर पांघरुन घालायचे काम होत आहे. या विधेयकाद्वारे या देशामध्ये देशामध्ये धार्मिक आधारावर देशाची मानसिकता बदलवण्याचे काम केंद्र सरकारने सुरु केले आहे. इशान्य भारतामधील धरणांमुळे किवा युद्धामुळे जे लोक निर्वासीत झाले होते. त्यांना आता भारताचे नागरिकत्व नाकारण्यात येत आहे. जर या कायद्यामुळे लोक आनंदी होणार असतील तर ईशान्य भारतामध्ये संघर्ष का पेटला आहे? या देशाची तुलना पाकशी करताय? या देशाचा पाकिस्तान करायचा आहे का?  धार्मिक विभाजन केल्यास देशाची आर्थिक स्थिती बिघडते, हे पाकिस्तानचे उदाहरण असतानाही “ पाकिस्तानात हिंदूंचा टक्का घसरत आहे, असे सांगून येथील मुस्लीमांना धमकावले जात आहे.  भारताने बुद्ध आणि गांधींची अहिंसा आणि शांतता स्वीकारली आहे.तर भाजप पाकिस्तानची द्वेष आणि हिंसा ही मुल्ये स्वीाकारत आहे. म्हणून हे विधेयक भारताच्या इतिहासाला दुंभगणारे आहे, असे आमचे मत आहे.  स्वामी विवेकानंदांनी भारत सर्वांना सामावून घेणारा देश आहे, असे म्हटले होते. तर, गोळवलकरांनी, मुस्लीम, शीख, इसाई यांना नागरिकत्व देऊ नका; दिलेच तर दुय्यम नागरिकत्व द्या; मतदानाचा अधिकार नाकारा. म्हणून 1950 साली आरएसएसने आणि जनसंघाने संविधानाला विरोध केला. संविधान झाल्यानंतर जी उठाठेव केली जात आहे; ती बाबासाहेबांच्या संविधानाला हात घालण्याचा प्रकार आहे. आज मुस्लीम आहेत; उद्या दलित, ओबीसी, आदिवासीहीही टार्गेट आहेत; त्यामुळे हा देश सावरायचा असेल तर सर्वांनीच या विधेयकाला विरोध करायला हवा.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड