शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

जिल्ह्यातील रोहयोच्या कामांचा निर्णय आता पालघरमधूनच

By admin | Updated: July 9, 2015 23:26 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा निर्मितीनंतरही ठाण्यात मारावे लागणारे हेलपाटे बंद होणार असून पालघरमध्येच

पंकज रोडेकर/हितेन नाईकठाणे /पालघररोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा निर्मितीनंतरही ठाण्यात मारावे लागणारे हेलपाटे बंद होणार असून पालघरमध्येच या योजनेचा कक्ष लवकर सुरू होणार आहे. यासाठी राज्य शासनाने १० पदांना मंजुरी दिली आहे. यात ठाण्यातील ५ पदे पालघरात वर्ग करून उर्वरित पाच पदे नव्याने भरण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे ३१ जुलै २०१४ रोजी विभाजन झाले. त्या वेळी १ आॅगस्ट २०१४ पासून पालघर, वसई, डहाणू, तलासरी,जव्हार, वाडा, मोखाडा आणि विक्रमगड या तालुक्यांचा समावेश करून पालघर जिल्हा निर्माण क रण्यात आला आहे. त्याचे मुख्यालय पालघर येथे ठेवले आहे. जिल्हानिर्मितीला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असतानाही रोजगार हमी योजना कक्ष जिल्ह्यात नसल्याने नागरिकांना या कामासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. याचदरम्यान, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी पदसंख्या निश्चित केली आहे. त्यानुसार, नवनिर्मित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोजगार हमी योजना कक्षाच्या पदनिर्मितीस शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार, ठाण्यातील ५ आणि पालघरातील नवीन पाच अशा १० पदांचा समावेश आहे. पालघरमध्ये या कक्षासाठी उपजिल्हाधिकारी, कनिष्ठ अभियंता (सा.बां.वि.), सहायक लेखाधिकारी, अव्वल कारकून, लिपीक-टंकलेखक या नव्या पदांसह उपअभियंता (जलसंपदा विभाग), नायब तहसीलदार, लघु टंकलेखक, वाहनचालक आणि शिपाई अशी मंजूर पदे आहेत. या योजनेच्या कामासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना कार्यालयप्रमुख म्हणून घोषित केले आहे.तसेच त्यांना आस्थापनाविषयी बाबी हाताळण्यासाठी ‘आहरण व संवितरण अधिकारी’ म्हणून घोषित केले आहे.