शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

जिल्ह्यातील रोहयोच्या कामांचा निर्णय आता पालघरमधूनच

By admin | Updated: July 9, 2015 23:26 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा निर्मितीनंतरही ठाण्यात मारावे लागणारे हेलपाटे बंद होणार असून पालघरमध्येच

पंकज रोडेकर/हितेन नाईकठाणे /पालघररोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी पालघर जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा निर्मितीनंतरही ठाण्यात मारावे लागणारे हेलपाटे बंद होणार असून पालघरमध्येच या योजनेचा कक्ष लवकर सुरू होणार आहे. यासाठी राज्य शासनाने १० पदांना मंजुरी दिली आहे. यात ठाण्यातील ५ पदे पालघरात वर्ग करून उर्वरित पाच पदे नव्याने भरण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे ३१ जुलै २०१४ रोजी विभाजन झाले. त्या वेळी १ आॅगस्ट २०१४ पासून पालघर, वसई, डहाणू, तलासरी,जव्हार, वाडा, मोखाडा आणि विक्रमगड या तालुक्यांचा समावेश करून पालघर जिल्हा निर्माण क रण्यात आला आहे. त्याचे मुख्यालय पालघर येथे ठेवले आहे. जिल्हानिर्मितीला जवळपास एक वर्ष पूर्ण होत असतानाही रोजगार हमी योजना कक्ष जिल्ह्यात नसल्याने नागरिकांना या कामासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. याचदरम्यान, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीसाठी पदसंख्या निश्चित केली आहे. त्यानुसार, नवनिर्मित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामधील रोजगार हमी योजना कक्षाच्या पदनिर्मितीस शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार, ठाण्यातील ५ आणि पालघरातील नवीन पाच अशा १० पदांचा समावेश आहे. पालघरमध्ये या कक्षासाठी उपजिल्हाधिकारी, कनिष्ठ अभियंता (सा.बां.वि.), सहायक लेखाधिकारी, अव्वल कारकून, लिपीक-टंकलेखक या नव्या पदांसह उपअभियंता (जलसंपदा विभाग), नायब तहसीलदार, लघु टंकलेखक, वाहनचालक आणि शिपाई अशी मंजूर पदे आहेत. या योजनेच्या कामासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना कार्यालयप्रमुख म्हणून घोषित केले आहे.तसेच त्यांना आस्थापनाविषयी बाबी हाताळण्यासाठी ‘आहरण व संवितरण अधिकारी’ म्हणून घोषित केले आहे.