शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कल्याण-डोंबिवली पालिकेत आता ११८ प्रभाग, ‘आय’ वॉर्ड होणार बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:51 AM

बदलांमुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील, यासाठी महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावे वगळल्याची आणि नऊ गावे महापालिकेत राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनात नुकतीच केली. अधिसूचनेनंतर पुढील कार्यवाही सुरू होईल, असे स्पष्ट करत केडीएमसी प्रशासनाने सध्या तरी चुप्पी साधली असली तरी आता या बदलांमुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील, यासाठी महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.मागील पाच वर्षे सुरू असलेल्या २७ गावे वगळण्याच्या मागणीला अखेर मुहूर्त मिळाला. मात्र, २७ मधील १८ गावेच वगळली आणि नऊ गावे महापालिके त शहरीकरण झाल्याच्या मुद्द्यावर जैसे थे ठेवली. या मुद्द्यावर २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी लढा देणाऱ्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मात्र तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, त्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा लढा पुढेही सुरूच राहणार आहे.राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता केडीएमसीत किती प्रभाग असतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अधिसूचनेनंतरच पुढील कार्यवाही होईल, असे स्पष्ट करीत सरकारच्या निर्णयावर भाष्य करण्यास प्रशासनाने सध्या तरी नकार दिला आहे.गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते. यातील १२ प्रभाग ई वॉर्डमध्ये तर नऊ प्रभाग आय वॉर्डमध्ये होते; परंतु आता १८ गावे वगळल्याने नऊ प्रभागांचा आय वॉर्ड पूर्णपणे महापालिकेतून बाद होईल तर ई वॉर्डातील गावे महापालिकेत कायम राहिल्याने तो वॉर्ड महापालिकेत कायम राहील.केडीएमसीची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यानुसार १२ लाख ४७ हजार ३२७ असली तरी २७ गावांच्या समावेशामुळे ती १५ लाख १८ हजार ७६२ पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, १८ गावे आता वगळल्यामुळे तसेच नऊ गावे महापालिकेत राहिल्याने आता लोकसंख्या साडेतेरा लाखांपर्यंत राहील, असे जाणकारांचे मत आहे. महसुली हद्दीनुसार ही गावे वगळली आहेत; परंतु जी नऊ गावे महापालिकेत राहिली आहेत, त्यांचे आठ प्रभाग होतील.विशेष बाब म्हणजे जे आठ प्रभाग आहेत, त्यात वगळलेल्या गावांचेही काही भाग आहेत. १२ लाख लोकसंख्येला ११५ प्रभाग त्याप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्र आणि महापालिकेत राहिलेल्या गावातील लोकसंख्येचा आढावा घेता साधारण ११८ पर्यंत प्रभाग राहतील.निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीतकेडीएमसीत २७ गावांचा समावेश होण्यापूर्वी महापालिकेचे १०१ प्रभाग होते. जून २०१५ मध्ये गावांचा समावेश झाल्यावर प्रभागांची संख्या १२२ इतकी झाली होती. त्या तुलनेत चार प्रभाग कमी झाले असले तरी महापालिकेच्या मूळ १०१ प्रभागांच्या संख्येत मात्र सरकारच्या निर्णयामुळे वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाElectionनिवडणूक