शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
2
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
3
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
4
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
5
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
6
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
7
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
8
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
9
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
10
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
11
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
12
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
13
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
14
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
15
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
16
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
17
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
18
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
19
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
20
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत

कल्याण-डोंबिवली पालिकेत आता ११८ प्रभाग, ‘आय’ वॉर्ड होणार बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:52 IST

बदलांमुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील, यासाठी महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावे वगळल्याची आणि नऊ गावे महापालिकेत राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनात नुकतीच केली. अधिसूचनेनंतर पुढील कार्यवाही सुरू होईल, असे स्पष्ट करत केडीएमसी प्रशासनाने सध्या तरी चुप्पी साधली असली तरी आता या बदलांमुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील, यासाठी महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.मागील पाच वर्षे सुरू असलेल्या २७ गावे वगळण्याच्या मागणीला अखेर मुहूर्त मिळाला. मात्र, २७ मधील १८ गावेच वगळली आणि नऊ गावे महापालिके त शहरीकरण झाल्याच्या मुद्द्यावर जैसे थे ठेवली. या मुद्द्यावर २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी लढा देणाऱ्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मात्र तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, त्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा लढा पुढेही सुरूच राहणार आहे.राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता केडीएमसीत किती प्रभाग असतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अधिसूचनेनंतरच पुढील कार्यवाही होईल, असे स्पष्ट करीत सरकारच्या निर्णयावर भाष्य करण्यास प्रशासनाने सध्या तरी नकार दिला आहे.गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते. यातील १२ प्रभाग ई वॉर्डमध्ये तर नऊ प्रभाग आय वॉर्डमध्ये होते; परंतु आता १८ गावे वगळल्याने नऊ प्रभागांचा आय वॉर्ड पूर्णपणे महापालिकेतून बाद होईल तर ई वॉर्डातील गावे महापालिकेत कायम राहिल्याने तो वॉर्ड महापालिकेत कायम राहील.केडीएमसीची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यानुसार १२ लाख ४७ हजार ३२७ असली तरी २७ गावांच्या समावेशामुळे ती १५ लाख १८ हजार ७६२ पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, १८ गावे आता वगळल्यामुळे तसेच नऊ गावे महापालिकेत राहिल्याने आता लोकसंख्या साडेतेरा लाखांपर्यंत राहील, असे जाणकारांचे मत आहे. महसुली हद्दीनुसार ही गावे वगळली आहेत; परंतु जी नऊ गावे महापालिकेत राहिली आहेत, त्यांचे आठ प्रभाग होतील.विशेष बाब म्हणजे जे आठ प्रभाग आहेत, त्यात वगळलेल्या गावांचेही काही भाग आहेत. १२ लाख लोकसंख्येला ११५ प्रभाग त्याप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्र आणि महापालिकेत राहिलेल्या गावातील लोकसंख्येचा आढावा घेता साधारण ११८ पर्यंत प्रभाग राहतील.निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीतकेडीएमसीत २७ गावांचा समावेश होण्यापूर्वी महापालिकेचे १०१ प्रभाग होते. जून २०१५ मध्ये गावांचा समावेश झाल्यावर प्रभागांची संख्या १२२ इतकी झाली होती. त्या तुलनेत चार प्रभाग कमी झाले असले तरी महापालिकेच्या मूळ १०१ प्रभागांच्या संख्येत मात्र सरकारच्या निर्णयामुळे वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाElectionनिवडणूक