शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

कल्याण-डोंबिवली पालिकेत आता ११८ प्रभाग, ‘आय’ वॉर्ड होणार बाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 00:52 IST

बदलांमुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील, यासाठी महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

- प्रशांत मानेकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांपैकी १८ गावे वगळल्याची आणि नऊ गावे महापालिकेत राहतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशनात नुकतीच केली. अधिसूचनेनंतर पुढील कार्यवाही सुरू होईल, असे स्पष्ट करत केडीएमसी प्रशासनाने सध्या तरी चुप्पी साधली असली तरी आता या बदलांमुळे महापालिका साधारण ११६ ते ११८ प्रभागांची राहील, यासाठी महापालिका हद्दीतील लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा ठरेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.मागील पाच वर्षे सुरू असलेल्या २७ गावे वगळण्याच्या मागणीला अखेर मुहूर्त मिळाला. मात्र, २७ मधील १८ गावेच वगळली आणि नऊ गावे महापालिके त शहरीकरण झाल्याच्या मुद्द्यावर जैसे थे ठेवली. या मुद्द्यावर २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी लढा देणाऱ्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने मात्र तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका झालीच पाहिजे, त्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेचा लढा पुढेही सुरूच राहणार आहे.राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता केडीएमसीत किती प्रभाग असतील, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अधिसूचनेनंतरच पुढील कार्यवाही होईल, असे स्पष्ट करीत सरकारच्या निर्णयावर भाष्य करण्यास प्रशासनाने सध्या तरी नकार दिला आहे.गावे वगळण्यापूर्वी महापालिकेत २७ गावांचे एकूण २१ प्रभाग होते. यातील १२ प्रभाग ई वॉर्डमध्ये तर नऊ प्रभाग आय वॉर्डमध्ये होते; परंतु आता १८ गावे वगळल्याने नऊ प्रभागांचा आय वॉर्ड पूर्णपणे महापालिकेतून बाद होईल तर ई वॉर्डातील गावे महापालिकेत कायम राहिल्याने तो वॉर्ड महापालिकेत कायम राहील.केडीएमसीची निवडणूक २०११ च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्यानुसार १२ लाख ४७ हजार ३२७ असली तरी २७ गावांच्या समावेशामुळे ती १५ लाख १८ हजार ७६२ पर्यंत पोहोचली होती. दरम्यान, १८ गावे आता वगळल्यामुळे तसेच नऊ गावे महापालिकेत राहिल्याने आता लोकसंख्या साडेतेरा लाखांपर्यंत राहील, असे जाणकारांचे मत आहे. महसुली हद्दीनुसार ही गावे वगळली आहेत; परंतु जी नऊ गावे महापालिकेत राहिली आहेत, त्यांचे आठ प्रभाग होतील.विशेष बाब म्हणजे जे आठ प्रभाग आहेत, त्यात वगळलेल्या गावांचेही काही भाग आहेत. १२ लाख लोकसंख्येला ११५ प्रभाग त्याप्रमाणे महापालिका कार्यक्षेत्र आणि महापालिकेत राहिलेल्या गावातील लोकसंख्येचा आढावा घेता साधारण ११८ पर्यंत प्रभाग राहतील.निवडणुकीसाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीतकेडीएमसीत २७ गावांचा समावेश होण्यापूर्वी महापालिकेचे १०१ प्रभाग होते. जून २०१५ मध्ये गावांचा समावेश झाल्यावर प्रभागांची संख्या १२२ इतकी झाली होती. त्या तुलनेत चार प्रभाग कमी झाले असले तरी महापालिकेच्या मूळ १०१ प्रभागांच्या संख्येत मात्र सरकारच्या निर्णयामुळे वाढ झाली आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाElectionनिवडणूक