शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

धोकादायक इमारतींना पुन्हा केडीएमसीने पाठवल्या नोटिसा; स्ट्रक्चरल ऑडिटची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:16 IST

मागील पाच वर्षांपासून क्लस्टर विकास योजनेचे गाजर दाखविले जात आहे. अनेक धोकादायक इमारतींचे मालक व भोगवटाधारक यांनी इमारतीची देखभाल, दुरुस्ती योग्य वेळेत केलेली नाही.

कल्याण : महाड येथील इमारत दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवली मनपाने ४७१ धोकादायक इमारतींना ३० दिवसांत स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी इमारत धोकादायक ठरल्यास आता पावसाच्या तसेच कोरोनाकाळात जायचे कुठे, असा संतप्त सवाल केला आहे.

मनपा हद्दीतील ४७१ धोकादायक इमारतींपैकी २८४ इमारती या धोकादायक, तर १८७ इमारती या अतिधोकादायक आहेत. अशा इमारतींमधील रहिवाशांनी इमारतींचे मनपाच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल आॅडिटरकडून आॅडिट करून घ्यावे. इमारतीमध्ये दोष असल्यास त्याची दुरुस्ती करावी. अन्यथा, इमारत रिक्त करावी, असे मनपाने नोटिशीत म्हटले आहे. डोंबिवलीतील दत्तनगरमधील दिलीप निवास ही धोकादायक इमारत असून, इमारतमालक अरुण भगत यांना मनपाने नोटीस बजावली आहे. मनपाने यापूर्वीही धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. दरम्यान, धोकादायक इमारतींमधील भाडेकरू व मालकांकडे आता पैसा नाही. दुसरे घर खरेदीसाठी अथवा भाड्याने घेण्यासाठी भाडेकरूंकडे पैसा नाही. कोरोनामुळे आर्थिक संकटही ओढावल्याने हाती असलेला पैसाही संपला आहे, याकडे दत्तनगरमधील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते महेश साळके यांनी लक्ष वेधले आहे.

मागील पाच वर्षांपासून क्लस्टर विकास योजनेचे गाजर दाखविले जात आहे. अनेक धोकादायक इमारतींचे मालक व भोगवटाधारक यांनी इमारतीची देखभाल, दुरुस्ती योग्य वेळेत केलेली नाही. त्यामुळे संबंधित मालकांच्या विरोधात किमान २५ हजार रुपये दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, मनपाचे त्याकडे दुर्लक्ष आहे, असे ते म्हणाले.पुनर्विकासाबाबत मनपा गंभीर नाही; पुनर्वसनाच्या मागणीकडे दुर्लक्षकल्याण : महाड इमारत दुर्घटनेनंतर केडीएमसी प्रशासनाने धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी ठाकुर्ली येथील धोकादायक इमारती पडून नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, आजही मनपा धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येते. त्याआधी उपाययोजना केल्या जात नाहीत, अशी टीका जणकारांनी के ली आहे. दुसरीकडे केडीएमसीने शहरी गरिबांसाठी केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेतून सात हजार घरे बांधली आहेत. त्यापैकी तीन हजार घरे ही पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित केली आहेत. मात्र, त्याची पुढील प्रक्रिया केलेली नाही. तर, दीड हजार घरांचे वाटप लाभार्थ्यांना केले आहे. उर्वरित घरांमध्ये धोकादायक इमारतींतील रहिवाशांचे पुनर्वसन करावे, या मागणीकडेही मनपाने वारंवार दुर्लक्ष केले आहे. त्याचबरोबर नवी घरकुल योजनाही जाहीर केलेली नाही. त्यासाठी साधे सर्वेक्षणही केले जात नाही. या सगळ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून धोकादायक इमारती पाडण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे. याचा अर्थ धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा जीव वाचवण्याचे कारण देत त्यांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करण्यात महापालिका धन्यता मानते, अशी टीका दत्तनगर येथील कार्यकर्ते सुनील नायक यांनीकेली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका