शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धोकादायक इमारतींना पुन्हा केडीएमसीने पाठवल्या नोटिसा; स्ट्रक्चरल ऑडिटची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 00:16 IST

मागील पाच वर्षांपासून क्लस्टर विकास योजनेचे गाजर दाखविले जात आहे. अनेक धोकादायक इमारतींचे मालक व भोगवटाधारक यांनी इमारतीची देखभाल, दुरुस्ती योग्य वेळेत केलेली नाही.

कल्याण : महाड येथील इमारत दुर्घटनेनंतर कल्याण-डोंबिवली मनपाने ४७१ धोकादायक इमारतींना ३० दिवसांत स्ट्रक्चरल आॅडिट करून घेण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे या इमारतींमधील रहिवाशांनी इमारत धोकादायक ठरल्यास आता पावसाच्या तसेच कोरोनाकाळात जायचे कुठे, असा संतप्त सवाल केला आहे.

मनपा हद्दीतील ४७१ धोकादायक इमारतींपैकी २८४ इमारती या धोकादायक, तर १८७ इमारती या अतिधोकादायक आहेत. अशा इमारतींमधील रहिवाशांनी इमारतींचे मनपाच्या पॅनलवरील स्ट्रक्चरल आॅडिटरकडून आॅडिट करून घ्यावे. इमारतीमध्ये दोष असल्यास त्याची दुरुस्ती करावी. अन्यथा, इमारत रिक्त करावी, असे मनपाने नोटिशीत म्हटले आहे. डोंबिवलीतील दत्तनगरमधील दिलीप निवास ही धोकादायक इमारत असून, इमारतमालक अरुण भगत यांना मनपाने नोटीस बजावली आहे. मनपाने यापूर्वीही धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या होत्या. दरम्यान, धोकादायक इमारतींमधील भाडेकरू व मालकांकडे आता पैसा नाही. दुसरे घर खरेदीसाठी अथवा भाड्याने घेण्यासाठी भाडेकरूंकडे पैसा नाही. कोरोनामुळे आर्थिक संकटही ओढावल्याने हाती असलेला पैसाही संपला आहे, याकडे दत्तनगरमधील कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते महेश साळके यांनी लक्ष वेधले आहे.

मागील पाच वर्षांपासून क्लस्टर विकास योजनेचे गाजर दाखविले जात आहे. अनेक धोकादायक इमारतींचे मालक व भोगवटाधारक यांनी इमारतीची देखभाल, दुरुस्ती योग्य वेळेत केलेली नाही. त्यामुळे संबंधित मालकांच्या विरोधात किमान २५ हजार रुपये दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, मनपाचे त्याकडे दुर्लक्ष आहे, असे ते म्हणाले.पुनर्विकासाबाबत मनपा गंभीर नाही; पुनर्वसनाच्या मागणीकडे दुर्लक्षकल्याण : महाड इमारत दुर्घटनेनंतर केडीएमसी प्रशासनाने धोकादायक इमारतींना नोटिसा पाठवल्या आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी ठाकुर्ली येथील धोकादायक इमारती पडून नऊ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, आजही मनपा धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एखादी घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येते. त्याआधी उपाययोजना केल्या जात नाहीत, अशी टीका जणकारांनी के ली आहे. दुसरीकडे केडीएमसीने शहरी गरिबांसाठी केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेतून सात हजार घरे बांधली आहेत. त्यापैकी तीन हजार घरे ही पंतप्रधान आवास योजनेत रूपांतरित केली आहेत. मात्र, त्याची पुढील प्रक्रिया केलेली नाही. तर, दीड हजार घरांचे वाटप लाभार्थ्यांना केले आहे. उर्वरित घरांमध्ये धोकादायक इमारतींतील रहिवाशांचे पुनर्वसन करावे, या मागणीकडेही मनपाने वारंवार दुर्लक्ष केले आहे. त्याचबरोबर नवी घरकुल योजनाही जाहीर केलेली नाही. त्यासाठी साधे सर्वेक्षणही केले जात नाही. या सगळ्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून धोकादायक इमारती पाडण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे. याचा अर्थ धोकादायक इमारतींमधील रहिवाशांचा जीव वाचवण्याचे कारण देत त्यांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्ष करण्यात महापालिका धन्यता मानते, अशी टीका दत्तनगर येथील कार्यकर्ते सुनील नायक यांनीकेली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका