शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

भराव केलेल्यांना लाखो रुपये दंडाच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 1:02 AM

भराव करण्यासाठी माती, दगड फुकट मिळतात, म्हणून भराव करून घेत असाल, तर सावधान!

मीरा रोड : भराव करण्यासाठी माती, दगड फुकट मिळतात, म्हणून भराव करून घेत असाल, तर सावधान! कारण, बेकायदा मातीभराव केल्याप्रकरणी महसूल विभागाने विकासक, मालकांना गौण खनिजाच्या लाखो रुपये दंडाच्या नोटिसा बजावल्या आहेत. दंड न भरल्यास जमीन सरकारजमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर, रात्रीअपरात्री हे भरावमाफिया आमच्या जागेत भराव करतात, असे सांगत काही शेतकऱ्यांनी पालिका, पोलीस व महसूल विभागाने या भरावमाफियांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.रस्त्याच्या कडेला, कांदळवन, पाणथळ, सीआरझेड क्षेत्रासह अगदी सरकारी व खाजगी मोकळ्या जागांमध्ये भराव करतात. बहुतांश जमीनमालक, शेतकरी, विकासकही फुकटचा भराव करून मिळत असल्याने तेही आपल्या जागेत भराव करून घेत प्लॉट तयार करून घेतात. शहरात काही भरावमाफिया सक्रिय असून मिळेल तिकडे गाड्या रिकाम्या करतात. २० ते २५ फुटांपर्यंत भराव केले जातात.भराव रोखण्यासाठी पालिकेने पथके नेमली असली, तरी ही पथके काहीच कारवाई करत नाहीत. पोलीसही माफियांना सांभाळण्याचे काम करतात. महसूल विभागाचे तलाठी व मंडळ अधिकारी मनुष्यबळाची कमतरता व अन्य कामांसाठी ठाण्यात असल्याचे कारण पुढे करतात. परंतु, भराव केल्याप्रकरणी आता महसूल विभागाने संबंधितांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केल्याने त्यातील दंडाची रक्कम पाहून सामान्य शेतकºयांचे डोळे पांढरे झाले आहेत.महसूल विभागास गौण खनिजभराव दंडाची रक्कम न भरल्यास जमीन सरकारजमा करण्याची कार्यवाही प्रस्तावित केली आहे. दुसरीकडे जमिनीत आपल्या सहमतीशिवाय भराव करणाºया माफियांपासून संरक्षण करण्याची मोठी जबाबदारी शेतकरी, जमीनमालकांवर आली आहे.नवघर येथील सुहास पाटील म्हणाले की, आमच्या जमिनीत रात्रीअपरात्री माफियांनी भराव केला आहे. आता सरकारने भरावापोटी ७१ लाखांचा दंड भरण्याची नोटीस दिली आहे. चूक नसताना शेतकºयांनी इतके पैसे भरायचे कशाला, असा सवाल त्यांनी केला. मोर्वा गावातील कुंदन भोईर यांनीही आम्ही भराव केला नसताना दंडाची नोटीस आल्याचे म्हटले आहे. तर, गोडदेव गावातील सचिन घरत म्हणाले की, आमच्या जागेत बळजबरीने भराव केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सतत करूनही कारवाई केली जात नाही.>भरावमाफियांना अद्दल घडवूभरावमाफियांना रोखण्याची जबाबदारी शेतकरी, जमीनमालकाची आहे. पण, रात्री गौण खनिजवाहतुकीला बंदी असताना तसेच दिवसाही अशा वाहनांसह भराव करणाºयांवर पोलीस, पालिका व महसूल विभागाने कारवाई केली पाहिजे. ते जर कारवाई करणार नसतील, तर भरावमाफियांना शेतकरी अद्दल घडवतील व त्याची जबाबदारी या सर्व यंत्रणांची असेल, असा इशारा आगरी एकता समाजचे प्रशांत म्हात्रे यांनी दिला आहे. जागेवर भराव झालेला आहे, हे सत्य आहे. स्वत:च्या जमिनीचे संरक्षण स्वत:च केले पाहिजे. कारण, भराव हा स्वत:च्या फायद्यासाठी करून घेतला जातो. त्यामुळे दंड हा लागणारच, असे एका अधिकाºयाने सांगितले.