शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

सोसायट्यांची पुन्हा करणार कचराकोंडी; ४२५ सोसायट्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 02:08 IST

ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे.

ठाणे : प्रतीदीन १०० किलोग्रॅम पेक्षा जास्तकचऱ्याची निर्मिती करणाऱ्या, तसेच ज्या सोसायटी ५ हजार स्केअरमीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, अशा आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय आता महापालिकेने घेतला आहे. मागील वर्षी राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षभर लांबणीवर पडला होता. मात्र, आता पालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या अनुषगांने कचरा विल्हेवाटीचे हत्यार पुन्हा बाहेर काढले आहे. यानुसार येत्या १५ दिवसांत तत्काळ कचरा विल्हेवाटीचा प्रश्न या सोसायट्यांनी मार्गी लावावा अन्यथा त्यांची कचराकोंडी केली जाईल, असा इशाराच नोटिसींद्वारे दिला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. परंतु, पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळू शकलेले नाही. केवळ ठाणे महापालिकाच नव्हे तर देशातील इतर महापालिकांचीदेखील हीच ओरड असल्याने यावर काहीतरी उपाय करावेत यासाठी एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय दिला आहे. त्यानुसार केंद्र सरकारने यासंदर्भात दोन वर्षापूर्वी एक आध्यादेश काढून ज्या सोसायटी अथवा आस्थापनांकडून प्रतीदीन १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त कचरा निर्मिती होते.

तसेच ज्या सोसायटी ५ हजार स्केअरमीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी त्यांच्या कचºयाचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे. यानुसार ठाणे महापालिकेने सर्व्हे करून तब्बल ४२५ हून अधिक सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा विषय गाजला होता. त्यावेळेस महासभेतही यावर सदस्यानी आवाज उठविला होता. त्यानंतर सोसायटीधारकांना ऑक्टोबरपर्यंतची मुदतही दिली होती. परंतु, त्यावेळेस झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण बासणात गुंडाळण्यात आले होते.

या मोहिमांचे काय झाले?

मध्यतंरी कचºयाची विल्हेवाट न लावल्यास पालिकेने संबधींताविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असेही सांगितले होते. तसेच शुन्य कचरा मोहीम सुू केली जाईल, असेही स्पष्ट केले होते. शिवाय ज्या सोसायटी कचºयाची विल्हेवाट लावून खत तयार करतील त्यांच्या खताचे ब्रँडिंग करून बाजार उपलब्ध करून देण्याची हमी दिली होती. परंतु, या मोहिमा कागदापलिकडे पुढे सरकलेल्या नाहीत.

१५ दिवसांची मुदत 

आता वर्षभरानंतर पालिकेच्या घनकचरा विभागाने पुन्हा हे हत्यार बाहेर काढले असून अशा सोसायटी आणि इतर आस्थापनांना नोटीस बजावण्याची मोहीम सुरू केली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून या नोटिसा बजावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या १५ दिवसांत या आस्थापनांनी कचºयाची विल्हेवाट लावली नाही तर त्यांची कचराकोंडी केली जाईल, असा तातडीचा इशारा यामध्ये दिला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र