शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

सोसायट्यांची पुन्हा करणार कचराकोंडी; ४२५ सोसायट्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 02:08 IST

ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे.

ठाणे : प्रतीदीन १०० किलोग्रॅम पेक्षा जास्तकचऱ्याची निर्मिती करणाऱ्या, तसेच ज्या सोसायटी ५ हजार स्केअरमीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, अशा आस्थापनांची कचराकोंडी करण्याचा निर्णय आता महापालिकेने घेतला आहे. मागील वर्षी राजकीय हस्तक्षेपामुळे हा प्रश्न वर्षभर लांबणीवर पडला होता. मात्र, आता पालिकेने स्वच्छ सर्व्हेक्षणाच्या अनुषगांने कचरा विल्हेवाटीचे हत्यार पुन्हा बाहेर काढले आहे. यानुसार येत्या १५ दिवसांत तत्काळ कचरा विल्हेवाटीचा प्रश्न या सोसायट्यांनी मार्गी लावावा अन्यथा त्यांची कचराकोंडी केली जाईल, असा इशाराच नोटिसींद्वारे दिला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला सुमारे ७५० मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. परंतु, पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळू शकलेले नाही. केवळ ठाणे महापालिकाच नव्हे तर देशातील इतर महापालिकांचीदेखील हीच ओरड असल्याने यावर काहीतरी उपाय करावेत यासाठी एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय दिला आहे. त्यानुसार केंद्र सरकारने यासंदर्भात दोन वर्षापूर्वी एक आध्यादेश काढून ज्या सोसायटी अथवा आस्थापनांकडून प्रतीदीन १०० किलोग्रॅम पेक्षा जास्त कचरा निर्मिती होते.

तसेच ज्या सोसायटी ५ हजार स्केअरमीटरच्या क्षेत्रात वसल्या आहेत, त्यांनी त्यांच्या कचºयाचे वर्गीकरण करून त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावावी, असे स्पष्ट केले आहे. यानुसार ठाणे महापालिकेने सर्व्हे करून तब्बल ४२५ हून अधिक सोसायटी, हॉटेल, मॉल, रुग्णालय आदींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात हा विषय गाजला होता. त्यावेळेस महासभेतही यावर सदस्यानी आवाज उठविला होता. त्यानंतर सोसायटीधारकांना ऑक्टोबरपर्यंतची मुदतही दिली होती. परंतु, त्यावेळेस झालेल्या राजकीय हस्तक्षेपामुळे हे प्रकरण बासणात गुंडाळण्यात आले होते.

या मोहिमांचे काय झाले?

मध्यतंरी कचºयाची विल्हेवाट न लावल्यास पालिकेने संबधींताविरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असेही सांगितले होते. तसेच शुन्य कचरा मोहीम सुू केली जाईल, असेही स्पष्ट केले होते. शिवाय ज्या सोसायटी कचºयाची विल्हेवाट लावून खत तयार करतील त्यांच्या खताचे ब्रँडिंग करून बाजार उपलब्ध करून देण्याची हमी दिली होती. परंतु, या मोहिमा कागदापलिकडे पुढे सरकलेल्या नाहीत.

१५ दिवसांची मुदत 

आता वर्षभरानंतर पालिकेच्या घनकचरा विभागाने पुन्हा हे हत्यार बाहेर काढले असून अशा सोसायटी आणि इतर आस्थापनांना नोटीस बजावण्याची मोहीम सुरू केली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून या नोटिसा बजावण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. येत्या १५ दिवसांत या आस्थापनांनी कचºयाची विल्हेवाट लावली नाही तर त्यांची कचराकोंडी केली जाईल, असा तातडीचा इशारा यामध्ये दिला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानthaneठाणेMaharashtraमहाराष्ट्र