शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

लोढांच्या फायद्यासाठी कोण काम करतंय हे वेगळ सांगायला नको - खासदार कपिल पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2017 16:59 IST

माझ्यावर मंगलप्रभात लोढा यांच्या गृहप्रकल्पाला फायदा होईल, असा मेट्रोचा मार्ग निश्चित केल्याचा आरोप केला जातो. उलटपक्षी कल्याणातून शिळफाटामार्गे जाणा-या मेट्रोच्या मार्गात पलावासारखा मोठा प्रकल्प येतो.

डोंबिवली: माझ्यावर मंगलप्रभात लोढा यांच्या गृहप्रकल्पाला फायदा होईल, असा मेट्रोचा मार्ग निश्चित केल्याचा आरोप केला जातो. उलटपक्षी कल्याणातून शिळफाटामार्गे जाणा-या मेट्रोच्या मार्गात पलावासारखा मोठा प्रकल्प येतो. यातूनच लोढांच्या फायद्यासाठी कोण काम करतंय हे स्पष्ट होत असल्याची अशी बोचरी टीका खासदार श्रीकांत शिंदेंचे नाव ने घेता भिवंडी मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांनी केली. एवढेच नव्हे तर ते पुढे म्हणाले की, कल्याण -डोंबिवलीत येणा-या मेट्रोचे श्रेय फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे.कल्याण-डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित दिलखुलास संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. कल्याणमध्ये शनिवारी हा उपक्रम संपन्न झाला. त्यावेळी खा. शिंदेंना त्यांनी टोला लगावला. आपल्या मतदारसंघात लोढा यांचा प्रकल्प नसल्याचे मी जबाबदारीने सांगतोय असेही पाटील म्हणाले. जर एखादे चांगले काम झाले तर आमच्यामुळे आणि वाईट गोष्ट झाली तर ती भाजपामुळे, हे कसल यांचे राजकारण? असा सवाल करीत सत्ताधारी म्हणून चांगल्याबरोबरच वाईट गोष्टींचीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे सांगत त्यांनी शिवसेनेवर टिका केली. याठिकाणी ज्याप्रकारचे राजकारण होते तसे अन्यत्र कुठेही केले जात नाही. शहराच्या विकासकामांमध्ये तरी राजकारण करू नये. त्यामूळे शहर विकासाचे अनेक चांगले प्रकल्प मागे पडल्याची खंत व्यक्त करीत आपण शिवसेनेबरोबर याबाबत कोणत्याही वेळी चचेर्साठी तयार आहोत असं खुले आवाहन पाटील यांनी केले.त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत सांगताना ते म्हणाले की ते आज जे आहेत ते त्यांच्या वडिलांमुळे. त्यांनी जे संस्कार केले त्यामूळेच आपण इथपर्यंतच प्रवास करू शकल्याचे ते आवर्जून म्हणाले. पाटील यांनी त्यांची कौटुंबिक जडण घडण, ग्रामपंचायत सदस्य ते खासदार पदापर्यंतचा प्रवास, मतदारसंघातील विकासकामे-नागरी प्रश्न, समस्या, नको तितक्या राजकारणामूळे ठाणे जिल्ह्याची झालेली पीछेहाट, भविष्यातील राजकीय प्रवास आदी महत्वाच्या विषयांवर मनमोकळेपणे मतं व्यक्त केली.

टॅग्स :Mangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाBJPभाजपा