शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
3
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
4
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
5
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
6
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
7
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
8
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
9
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
10
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
11
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
12
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
13
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
14
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
15
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
16
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
17
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
18
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
19
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
20
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 

संविधानाच्या कमतरतेमुळे नव्हे;  उपेक्षेमुळे देशातील प्रश्न वाढले!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 6:10 AM

आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी, धर्मवादी, व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी कायदे होते, ते आधी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.

ठाणे : आपल्या देशातील प्रश्न हे संविधानातील कमतरतेमुळे नाहीत, तर संविधानाच्या उपेक्षेमुळे आहेत, असे ठाम प्रतिपादन विविध सामाजिक चळवळींचे अग्रणी नेते प्रा. सुभाष वारे यांनी ठाण्यात केले. संविधानाचे महत्त्व पटवून घ्यायचे असेल, तर संविधान नव्हते तेव्हा समाजात कसे जातीयवादी, लिंगवादी, धर्मवादी, व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी कायदे होते, ते आधी समजून घेतले पाहिजे, असेही त्यांनी सूचित केले.समता विचार प्रसारक संस्था व कोपरी संघर्ष समिती आयोजित सावित्रीबाई फुले व्याख्यानमालिकेमध्ये बोलताना वारे म्हणाले की, संविधानाने भारतातील सर्व जातीधर्मांच्या स्त्रीपुरुषांना सन्मानाची आणि विकासाची हमी दिली आहे. आपले संविधान एक थेंबही रक्त न सांडता झालेली क्रांती आहे. कारण, आपल्या संविधानाने २१ वर्षांवरील सर्व स्त्रीपुरुषांना मतदानाचा अधिकार दिला आहे, ज्यासाठी इंग्लंड, अमेरिकेसारख्या लोकशाहीवादी पुढारलेल्या देशातील स्त्रियांनासुद्धा किती वर्षे लढा द्यावा लागला होता. संविधान न वाचता त्याबद्दल बरेच गैरसमज पसरले आहेत. संविधान ही डोक्यावर घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही, तर ती डोक्यात घेऊन समजण्याची गोष्ट आहे. संविधानात फक्त राखीव जागा नाहीत, तर अजूनही बरेच काही आहे. शेतकºयांच्या मालाला भाव कसा मिळेल आणि त्यांच्या आत्महत्या कशा थांबतील, याचे उत्तरही संविधानाच्या योग्य अंमलबजावणीत आहे. संविधानाचे कायदे गरिबांच्या बाजूचे आहे, म्हणून गरीब खूश आहेत आणि त्याच कायद्यांची अंमलबजावणी होत नाही, म्हणून श्रीमंत खूश आहेत. आज संविधान बदलण्याची भाषा चालते आहे, कायद्याने संविधान बदलू शकता, पण त्यातील मूलभूत अधिकारांची मुख्य चौकट कुणीही बदलू शकत नाही. पण, असे असले तरीही फक्त संसद, फक्त कायदा, फक्त न्यायालय नागरिकांना मूलभूत अधिकाराची हमी देऊ शकत नाही. ती हमी फक्त नागरिकांची सामूहिक सद्सद्विवेक बुद्धीच देऊ शकते. म्हणून, संविधान अभ्यासून, समजून घेतले पाहिजे. संविधान फक्त घराबाहेरील समाजासाठी  नाही, तर घरासाठीही संविधान लागू आहे, असे मत त्यांनी मांडले.  अध्यक्ष डॉ. संजय मंगला गोपाळ म्हणाले की, आज संविधानवादी समाज निर्माण करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कोपरी संघर्ष समितीचे विनोद मोरे होते. संस्थेचे सहखजिनदार सुनील दिवेकर यांनी प्रस्तावना, तर समितीचे राजेश गाडे यांनी आभार व्यक्त केले.

टॅग्स :thaneठाणे