शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नोटाबंदी म्हणजे सामान्य जनतेचा खून, काँग्रेसचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 05:49 IST

मुजफ्फर हुसेन : भार्इंदर येथे काँग्रेसचे आंदोलन; जिल्ह्यातही ठिकठिकाणी आयोजन

मीरा रोड/भार्इंदर : नोटाबंदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात चुकीचा निर्णय होता. त्यामुळे सर्वसामान्यांचा नव्हे, तर अंबानी, अदानींचा फायदा झाला. देशाचा चौकीदारच चोर असून नोटाबंदी म्हणजे सामान्य जनतेचा एक प्रकारे खून होता, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी आमदार मुजफ्फर हुसेन यांनी भार्इंदर येथे नोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसने केलेल्या आंदोलनात केला.

नोटाबंदीच्या निषेधार्थ हुसेन यांच्या नेतृत्वाखाली भार्इंदर (पू.) काँग्रेस कार्यालयापासून गोडदेव नाक्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. शास्त्रोक्त पद्धतीने मोदी सरकारचे श्राद्ध यावेळी घालण्यात आले. जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, गटनेने जुबेर इनामदार, महिला जिल्हाध्यक्षा लीला पाटील, नगरसेवक राजीव मेहरा, नगरसेविका गीता परदेशी, सारा अक्रम, अ‍ॅड. शफिक खान, विकास म्हात्रे, अंकुश मालुसरे, राजकुमार मिश्रा, संदीप चौहान, प्रकाश नागणे आदी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. नोटाबंदीच्या दोन वर्षांनंतरही जनता, लहान उद्योजक, व्यापारी वाईट परिस्थितीमध्ये आहेत. रोजगार, व्यवसाय बुडाले. लोकांचे बळी गेले. त्यांची दिवाळी काळी ठरली. राफेल घोटाळा हजारो कोटींचा असून केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयालासुद्धा विमानाची किंमत सांगायला तयार नाही. चार वर्षे सत्ता असताना राम मंदिर बांधले नाही. आता निवडणूक आली की, मंदिराचा मुद्दा उभा करून सरकार तेढ वाढवत असल्याचा आरोप मुजफ्फर हुसेन यांनी यावेळी केला.शहापूरमध्ये काँग्रेसचे निषेध आंदोलनशहापूर : मोदी सरकारने देशात लागू केलेल्या नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाली असून या फसलेल्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी सोमवारी शहापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष तथा सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष महेश धानके यांच्या नेतृत्वाखाली निषेध करण्यात आला.या निर्णयामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले, तर हजारो लोक बेरोजगार झाले, तर जीडीपी दरसुद्धा कमी झाला, याचा जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आदेशाने शहापूर तालुका काँग्रेस कमिटीने तहसीलदार रवींद्र बावीस्कर यांना नोटाबंदीविरोधात निवेदन दिले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरcongressकाँग्रेसDemonetisationनिश्चलनीकरण