शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

मीरा-भार्इंदरमध्ये मध्यरात्रीही फटाक्यांचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 03:29 IST

मीरा - भार्इंदरमध्ये दिवाळीचे तीन दिवस मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत सर्रास फटाके फोडले गेले. विशेष म्हणजे, पालिकेत भाजपाची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांचे आवाहनसुद्धा फटाक्यांच्या धुरात विरून गेले आहे.

मीरा रोड / भार्इंदर : दिवाळीत रात्री ८ ते १० दरम्यान फटाके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली वेळ तसेच राज्याचे गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  फटाके फोडू नका’, ‘प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा’, असे आवाहन केले असताना मीरा - भार्इंदरमध्ये मात्र, दिवाळीचे तीन दिवस मध्यरात्रीनंतर दीड वाजेपर्यंत सर्रास फटाके फोडले गेले. विशेष म्हणजे, पालिकेत भाजपाची सत्ता असताना मुख्यमंत्र्यांचे आवाहनसुद्धा फटाक्यांच्या धुरात विरून गेले आहे.फटाक्यांमुळे आवाज तसेच फटाक्यांच्या धुराचा विविध प्रकारे होणारा त्रास पाहता बहुसंख्य नागरिकांमध्येही फटाके फोडण्यावरूननाराजी आहे. रु ग्ण, लहान मुले, वृद्ध यांना तर फटाके जाचकच ठरले आहेत. यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत ८ ते १० वाजेपर्यंत फटाके फोडण्यास अटीशर्तींनुसार मंजुरी दिली आहे. तर दुसरीकडे स्वत: मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांसह शासनाने देखील फटाके फोडू नका असे आवाहन करत प्रदूषणमुक्त दिवाळीचे धोरण अवलंबले आहे.मात्र, मीरा-भार्इंदर महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता असूनही महापालिकेने शासनाचे धोरण न राबवता शहरात रस्ते, पालिकेचे उद्यान, मैदान येथे सर्रास फटाके विक्रीच्या परवानग्या दिल्या आहेत. पालिकेने फटाके विक्र ी तसेच फोडण्यासाठी असे उघड प्रोत्साहन दिले असतानाच दुसरीकडे पोलिसांनीसुद्धा फटाके फोडण्यासाठी मोकळे रान दिले. मंगळवारपासून शहरात मध्यरात्री एक ते दीड वाजेपर्यंत सर्रास ध्वनी आणि वायुप्रदूषण करणारे फटाके फोडले जात आहेत. वास्तविक, रात्री १० वाजेपर्यंतच वेळ असताना बिनधास्त फटाके फोडताना दिसत आहेत. लोकांनी पोलिसांना तक्रारी करूनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा अनुभव भार्इंदर, काशिमीरा,नया नगर पोलीस ठाण्यांकडून आला. भार्इंदर व नया नगर पोलीस ठाण्याचा तर नंतर फोनच घेतला जात नव्हता.पोलीस महासंचालक व ठाणे ग्रामीणच्या कंट्रोल रूममध्ये तक्रारी करूनसुद्धा पोलिसांकडून कार्यवाहीच झाली नाही. त्यामुळे दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्न सुनील भगत व अन्य नागरिकांना पडला आहे.आम्ही फटाक्यांच्या पूर्णपणेविरोधातच आहोत. कारणआवाज व धुराचा ज्येष्ठ, रु ग्ण, लहानमुलं यांना खूपच त्रास होतो. मुख्यमंत्रीयांनी फटाके न फोडण्याच्या केलेल्याआवाहनानुसार शहरात भाजपासुद्धाजनजागृती करेल. पोलीस आणिपालिका प्रशासनाची जबाबदारी आहेचपण त्याचबरोबर सुशिक्षित आणिजागरूक नागरिकांनीसुद्धा फटाकेफोडणे टाळले पाहिजे. सर्वोच्चन्यायालयाने दिलेल्या वेळेचे पालनकेले पाहिजे.- हेमंत म्हात्रे, जिल्हाध्यक्ष, भाजपासर्वोच्च न्यायालयानेदिलेले आदेश आणिमुख्यमंत्र्यांनी केलेले आवाहन याचेपालन सर्वांनीच केले पाहिजे. कारणलोकांचे आरोग्य व पर्यावरणसंरक्षणासाठी हे गरजेचे आहे .पोलीस आणि पालिकेची जबाबदारीआहे. यात वाद किंवा मतभेदअसण्याचे कारण नाही. आजदिल्लीची जी घातक स्थिती झालीआहे त्याचा आपण आतापासूनचगांभीर्याने विचार केला पाहिजे.- सुरेश खंडेलवाल,विधि व नियोजन समिती सभापतीमीरा-भार्इंदरमध्ये फटाकेविक्रे त्यांवर गुन्हा दाखलकरण्याची कार्यवाही सुरू आहे .फटाके फोडण्याची ठिकाणे व्यापकअसली तरी पोलीस आलेल्यातक्रारीनुसार घटनास्थळी गेले असताफटाके वाजवणारे पळून जात वापोलिसांची गाडी लांबूनच पाहून तेफटाके फोडणे बंद करत. पोलीसठाण्यांनी फोन का घेतले नाहीतयाची चौकशी सुरू आहे.- युवराज कलकुटगे,पोलीस उपनिरीक्षक व जनसंपर्कअधिकारी, ठाणे ग्रामीण

टॅग्स :thaneठाणेfire crackerफटाके