शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

"रेल्वे ट्रॅकजवळील एकाही झोपडपट्टीधारकावर अन्याय होणार नाही, रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:46 IST

Ashwini Vaishnaw : अश्विनी वैष्णव हे शुक्रवारी ठाण्यात ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते.

ठाणे - रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडपटीवासियांमध्ये काहीजण भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपल्याला आदर करावा लागणार आहे. परंतु राज्य शासनाचे काम असते पुनर्वसनाचे असते, त्यानुसार राज्य शासन आणि रेल्वे यांच्यात समन्वय साधून येथील रहिवाशांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले.

वैष्णव हे शुक्रवारी ठाण्यात ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात हजेरी लावली. यावेळी भाजपाचे सर्व नगरसेवक त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्येक नगरसेवकाची हजेरी घेतली. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिले. दरम्यान यावेळी आगामी निवडणुकीत काही जण एसी रेल्वेच्या भाडय़ाचा मुद्दा लावून धरतील. मात्र त्यांना खडसावून सांगा की याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करीत असून एसी रेल्वेचे भाडे माफक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार भाडे कमीच असेल असे सर्वाना सांगा. 

रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडय़ा हटविण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार त्यांचा सन्मान राखला पाहिजे. मात्र या मुद्यावरुनही काही जण तुमच्या मनात भ्रम निर्माण करू शकतात. परंतु त्यांना सांगा रेल्वे यावर तोडगा काढत आहे. बाधीत होणाऱ्यांसाठी राज्य शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यानुसार राज्य शासन आमि रेल्वे यांच्यात समन्वय साधून एकाही झोडपट्टीधारकाला बेघर होऊ देणार नसून यावर लवकरच तोडगा काढला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे स्टेशन ऐतिहासिक स्थानक आहे याठिकाणाहून पहिली ट्रेन धावली होती, त्यामुळे हे स्थानक ऐतिहासिक असून त्याचा हेरीटेज दर्जा राखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले आहेत. तसेच याचा विकासही वर्ल्र्ड क्लास करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. 

येत्या काळात ठाणे स्थानकाचा विकास केला जाणार असून याचे श्रेय ठाणे शहर भाजपचेच आहे, त्यामुळे हे श्रेय तुम्हीच घ्या, ठाणेकरांना आणि इतरांनाही सांगा, शिवाय या स्थानकाचा कायापलाट करण्यासाठी तुमच्या काही सुचना असतील, काही बदल करायचे सांगायचे असतील तर तशा सुचना जरुर कळावा असेही त्यांनी सांगितले. एकूणच मागील काही दिवसांपासून झोडपट्टींचा विषय असेल, एसी रेल्वेच्या भाडय़ाचा विषय असेल किंवा ठाणो स्थानकाचा विकास असेल या सर्वच मुद्यांना रेल्वे मंत्र्यांनी हात घालून एक प्रकारे आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकत याचे श्रेय भाजपवाल्यांचेच असल्याचे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवthaneठाणेrailwayरेल्वेBJPभाजपा