शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

"रेल्वे ट्रॅकजवळील एकाही झोपडपट्टीधारकावर अन्याय होणार नाही, रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:46 IST

Ashwini Vaishnaw : अश्विनी वैष्णव हे शुक्रवारी ठाण्यात ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते.

ठाणे - रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडपटीवासियांमध्ये काहीजण भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपल्याला आदर करावा लागणार आहे. परंतु राज्य शासनाचे काम असते पुनर्वसनाचे असते, त्यानुसार राज्य शासन आणि रेल्वे यांच्यात समन्वय साधून येथील रहिवाशांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले.

वैष्णव हे शुक्रवारी ठाण्यात ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात हजेरी लावली. यावेळी भाजपाचे सर्व नगरसेवक त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्येक नगरसेवकाची हजेरी घेतली. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिले. दरम्यान यावेळी आगामी निवडणुकीत काही जण एसी रेल्वेच्या भाडय़ाचा मुद्दा लावून धरतील. मात्र त्यांना खडसावून सांगा की याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करीत असून एसी रेल्वेचे भाडे माफक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार भाडे कमीच असेल असे सर्वाना सांगा. 

रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडय़ा हटविण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार त्यांचा सन्मान राखला पाहिजे. मात्र या मुद्यावरुनही काही जण तुमच्या मनात भ्रम निर्माण करू शकतात. परंतु त्यांना सांगा रेल्वे यावर तोडगा काढत आहे. बाधीत होणाऱ्यांसाठी राज्य शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यानुसार राज्य शासन आमि रेल्वे यांच्यात समन्वय साधून एकाही झोडपट्टीधारकाला बेघर होऊ देणार नसून यावर लवकरच तोडगा काढला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे स्टेशन ऐतिहासिक स्थानक आहे याठिकाणाहून पहिली ट्रेन धावली होती, त्यामुळे हे स्थानक ऐतिहासिक असून त्याचा हेरीटेज दर्जा राखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले आहेत. तसेच याचा विकासही वर्ल्र्ड क्लास करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. 

येत्या काळात ठाणे स्थानकाचा विकास केला जाणार असून याचे श्रेय ठाणे शहर भाजपचेच आहे, त्यामुळे हे श्रेय तुम्हीच घ्या, ठाणेकरांना आणि इतरांनाही सांगा, शिवाय या स्थानकाचा कायापलाट करण्यासाठी तुमच्या काही सुचना असतील, काही बदल करायचे सांगायचे असतील तर तशा सुचना जरुर कळावा असेही त्यांनी सांगितले. एकूणच मागील काही दिवसांपासून झोडपट्टींचा विषय असेल, एसी रेल्वेच्या भाडय़ाचा विषय असेल किंवा ठाणो स्थानकाचा विकास असेल या सर्वच मुद्यांना रेल्वे मंत्र्यांनी हात घालून एक प्रकारे आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकत याचे श्रेय भाजपवाल्यांचेच असल्याचे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवthaneठाणेrailwayरेल्वेBJPभाजपा