शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

"रेल्वे ट्रॅकजवळील एकाही झोपडपट्टीधारकावर अन्याय होणार नाही, रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 17:46 IST

Ashwini Vaishnaw : अश्विनी वैष्णव हे शुक्रवारी ठाण्यात ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते.

ठाणे - रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडपटीवासियांमध्ये काहीजण भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपल्याला आदर करावा लागणार आहे. परंतु राज्य शासनाचे काम असते पुनर्वसनाचे असते, त्यानुसार राज्य शासन आणि रेल्वे यांच्यात समन्वय साधून येथील रहिवाशांचे योग्य ते पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले.

वैष्णव हे शुक्रवारी ठाण्यात ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात हजेरी लावली. यावेळी भाजपाचे सर्व नगरसेवक त्याठिकाणी उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रत्येक नगरसेवकाची हजेरी घेतली. तसेच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिले. दरम्यान यावेळी आगामी निवडणुकीत काही जण एसी रेल्वेच्या भाडय़ाचा मुद्दा लावून धरतील. मात्र त्यांना खडसावून सांगा की याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करीत असून एसी रेल्वेचे भाडे माफक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार भाडे कमीच असेल असे सर्वाना सांगा. 

रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या झोपडय़ा हटविण्याचे आदेश सर्वोच्य न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार त्यांचा सन्मान राखला पाहिजे. मात्र या मुद्यावरुनही काही जण तुमच्या मनात भ्रम निर्माण करू शकतात. परंतु त्यांना सांगा रेल्वे यावर तोडगा काढत आहे. बाधीत होणाऱ्यांसाठी राज्य शासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यानुसार राज्य शासन आमि रेल्वे यांच्यात समन्वय साधून एकाही झोडपट्टीधारकाला बेघर होऊ देणार नसून यावर लवकरच तोडगा काढला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ठाणे स्टेशन ऐतिहासिक स्थानक आहे याठिकाणाहून पहिली ट्रेन धावली होती, त्यामुळे हे स्थानक ऐतिहासिक असून त्याचा हेरीटेज दर्जा राखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आदेश दिले आहेत. तसेच याचा विकासही वर्ल्र्ड क्लास करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. 

येत्या काळात ठाणे स्थानकाचा विकास केला जाणार असून याचे श्रेय ठाणे शहर भाजपचेच आहे, त्यामुळे हे श्रेय तुम्हीच घ्या, ठाणेकरांना आणि इतरांनाही सांगा, शिवाय या स्थानकाचा कायापलाट करण्यासाठी तुमच्या काही सुचना असतील, काही बदल करायचे सांगायचे असतील तर तशा सुचना जरुर कळावा असेही त्यांनी सांगितले. एकूणच मागील काही दिवसांपासून झोडपट्टींचा विषय असेल, एसी रेल्वेच्या भाडय़ाचा विषय असेल किंवा ठाणो स्थानकाचा विकास असेल या सर्वच मुद्यांना रेल्वे मंत्र्यांनी हात घालून एक प्रकारे आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकत याचे श्रेय भाजपवाल्यांचेच असल्याचे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवthaneठाणेrailwayरेल्वेBJPभाजपा