शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

25 वर्षांपासून सरपंच नाही; भिवंडीतील पहारे गावच्या ग्रामविकासकामांना खीळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 18:56 IST

नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरूनच  प्रवास करावा लागत आहे तर पिण्याच्या पाण्याची टाकी 25 वर्षांपासून पडीक अवस्थेत आहे.

नितीन पंडित

भिवंडी-  भिवंडी तालुक्यातील पहारे गावात तब्बल गेल्या 25 वर्षांपासून सरपंच नसल्याने ग्रामपंचायत क्षेत्रातील विकासकामांना खीळ बसली असून गावाची दयनीय अवस्था झाली आहे. गावात एकही आदिवासी नसताना देखील 1995 मध्ये निवडणूक यंत्रणेकडून पहारे गावाला आदिवासी सरपंचपदाचे आरक्षण टाकण्यात आले आहे. मात्र या गावात एकही आदिवासी नसल्याने सरपंचाची खुर्ची आजही  रिकामीच आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेशी वेळच्यावेळी समन्वय साधला जात नसल्याने गावातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याने रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना जीव मुठीत धरूनच  प्रवास करावा लागत आहे तर पिण्याच्या पाण्याची टाकी 25 वर्षांपासून पडिक अवस्थेत आहे.गावात पाण्याची समस्या असल्याने नाईलाजाने ग्रामस्थांना बोअरवेलचे विकत पाणी घेऊन आपली गरज भागवावी लागत आहे.10 वर्षांपूर्वीची जिल्हा परिषदेची शाळा पडक्या अवस्थेत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे विजेचे खांब वाकलेले आहेत  वीजतारा तुटलेल्या अवस्थेत आहेत.गावात पथदिवे व रोडच्या कडेची गटारे सुद्धा नाहीत अशा विविध नागरी समस्या असल्याने आदिवासी सरपंच पदाचे आरक्षण हटवावे अशी मागणी ग्रामस्थांकडून  करण्यात आली आहे.

आमच्या पहारे गावाला सरपंच नसल्याने ग्रामसेवक काम पाहतात मात्र त्यांच्याकडे दोन गावांची कामे असल्याने ते 15 दिवसांनी किंवा  महिन्याने देखील येतात त्यामुळे गावाची विकासकामे होत नाही. गावची सर्वच कामे पूर्णपणे ठप्प असल्याने गावची प्रगती होत नाही त्यासाठी शासनाने आरक्षण हटवणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया पहारे गावचे पोलीस पाटील भरत भोईर यांनी दिली आहे.

तर आमच्या गावच्या रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडल्याने जीव मुठीत घेऊनच वाहने चालवावी लागत आहेत. महत्वाची बाब म्हणजे 25 वर्षापूर्वी पाण्याची टाकी बांधली मात्र आजपर्यंत या टाकीत पाणीच आलेले नाही त्यामुळे गावकऱ्यांना पिण्यासाठी बोअरवेलचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.आमच्या गावात आदिवासी नसताना आरक्षण लादून आमच्यावर शासनाने अन्याय केला आहे त्यामुळे  शासनाने  आरक्षण हटवून आमच्या गावाला न्याय द्यावा ही कळकळीची विनंती शासनाला करतो अशी प्रतिक्रिया पहारे येथील माजी सरपंच पुंडलिक पाटील यांनी दिली आहे.