शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

एनएमएमटीचा ५० कोटींचा डेपो धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:45 IST

एनएमएमटीने २००१ मध्ये एमआयडीसीकडून महापेमध्ये बसडेपो घेतला. महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या डेपोचा १६ वर्षांमध्ये योग्य वापर प्रशासनाला करता आलेला नाही. जवळपास ५० कोटींपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेला हा डेपो धूळ खात पडून आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : एनएमएमटीने २००१ मध्ये एमआयडीसीकडून महापेमध्ये बसडेपो घेतला. महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या डेपोचा १६ वर्षांमध्ये योग्य वापर प्रशासनाला करता आलेला नाही. जवळपास ५० कोटींपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेला हा डेपो धूळ खात पडून आहे. डेपोला लागून व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असून महापालिका परिवहन उपक्रमाने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचा तोटा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मागील काही वर्षांमध्ये बसेसची स्वच्छता व फेºयांमध्ये सुधारणा झाली असली तरी त्याचा उत्पन्नवाढीवर फारसा उपयोग झालेला नाही. तिकिटांपेक्षा इतर स्रोत वाढविण्याकडे प्रशासनाने फारसे लक्ष दिलेले नाही. शहरातील डेपोचा योग्यपद्धतीने वापर केला जात नसून त्यामध्ये महापे बसडेपोचा समावेश आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये २ लाखपेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. कामगारांसाठी वाहतुकीची फारशी साधने नाहीत. यामुळे एनएमएमटी, केडीएमटीच्या बसेसच्या माध्यमातून कामगारांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू केली आहे. एमआयडीसी परिसरामध्ये मध्यवर्ती डेपो असावा यासाठी पालिका प्रशासनाने पाठपुरावा करून महापे पोलीस चौकीजवळ विस्तीर्ण भूखंड एमआयडीसीकडून मिळविला आहे.भूखंडावर प्रशासकीय कामासाठी दोन मजली इमारत उभारण्यात आली असून भूखंडाच्या दुसºया टोकावरही एका वास्तूचे बांधकाम केले आहे. भूखंडावर निवारा शेडही उभारले असून यासाठी लाखोंचा खर्च केला आहे. काही दिवस येथे बसेस थांबविल्या जात होत्या, पण नंतर डेपोचा वापर पूर्णपणे थांबविण्यात आला आहे.महापे डेपोमध्ये २००८ च्या दरम्यान घंटागाडीच्या ठेकेदाराने गॅरेज सुरू केले होते. कचरा वाहतूक करणारी वाहने डेपोत उभी करण्यात येत होती. त्यांची दुरूस्तीसाठी कंटेनर केबिनमध्ये गॅरेज सुरू केले होते. यानंतर बाजूच्या गॅरेज चालकांनीही त्यांच्याकडे दुरूस्तीसाठी आलेली वाहने तेथे उभी करण्यास सुरवात केली होती. प्रसारमाध्यमांनी वारंवार आवाज उठविल्यानंतर डेपोतील अतिक्रमण थांबविण्यात आले असून तेथे सुरक्षा रक्षक नेमण्यात आला आहे. पण सद्यस्थितीमध्ये डेपोतील इमारतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे.महापे डेपोची अवस्था अत्यंत बिकट आहे. एमआयडीसीमधील या डेपोचा योग्य वापर करण्यात यावा यासाठी परिवहन समितीच्या बैठकीमध्ये आवाज उठविला जाईल. अशाप्रकारे कोणतीही मालमत्ता धूळ खात पडता कामा नये अशी आग्रही भूमिका आम्ही मांडणार असून वेळ पडल्यास आंदोलन केले जाईल.- समीर बागवान,परिवहन सदस्य,शिवसेना