शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

करवसुली चांगली असलेली गावे केडीएमसीत, भाजप, मनसे नेत्यांना दिला राजकीय धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 1:29 AM

कल्याण पश्चिमेच्या दिशेने महापालिका क्षेत्राला लागून असलेली नऊ गावे महापालिकेतच ठेवली आहेत.

- मुरलीधर भवारकल्याण  - केडीएमसीतील २७ गावांपैकी १८ गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय शनिवारी सरकारने विधिमंडळात जाहीर केला. तर, उर्वरित नऊ गावे ही महापालिकेत राहणार आहेत. कल्याण पश्चिमेच्या दिशेने महापालिका क्षेत्राला लागून असलेली नऊ गावे महापालिकेतच ठेवली आहेत. ज्या गावातून महापालिकेला कराचे उत्पन्न मिळाले तीच गावे महापालिकेत ठेवण्याचे ‘अर्थकारण’ यामागे आहे.भाजप नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी महापालिकेत राहण्याचा आग्रह धरला होता. मात्र, त्यांचे पिसवली गाव नगरपालिकेत समाविष्ट केले आहे. त्याच वेळी मनसे आ. राजू पाटील यांनी सर्व गावे नगरपालिकेत समाविष्ट करण्याची मागणी केली असताना त्यांचे काटई हे गाव महापालिकेत समाविष्ट केले आहे. केडीएमसीच्या निवडणुकीत संभाव्य भाजप-मनसे युतीला शह देण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.१८ गावांची नगरपालिका जाहीर करताना महापालिका हद्दीलगतची नऊ गावे भौगोलिक सलगतेच्या दृष्टिकोनातून महापालिका हद्दीत कायम ठेवली आहेत. त्यात आजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, घारीवली, संदप, उसरघर, भोपर, काटई व देसलेपाडा आहे. तर उर्वरित घेसर, हेदुटणे, उंब्रोली, द्वारली, भाल, माणेरे, आशाळे, वसार, नांदिवली, आडीवली, ढोकळी, दावडी, निळजे, कोळे, माणगाव, पिसवली, सोनारपाडा, चिंचपाडा या गावांची स्वतंत्र नगरपालिका होणार आहे.स्वतंत्र नगरपालिकेकरिता संघर्ष करणाऱ्या समितीला सरकार हरकती सूचना मागवून सगळ्याच २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करणार अशी अपेक्षा होती. त्यामुळे संघर्ष समितीला मागणी मंजूर करवून घेण्यात संपूर्ण यश आलेले नाही.संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे म्हणाले की, सरकारच्या निर्णयाविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी समितीने रविवारी सकाळी वार्तालाप ठेवला आहे.ग्रोथ सेंटरचा गावे वगळण्याशी संबंध नाहीकल्याण ग्रोथ सेंटरमध्ये भोपर, संदप, उसरघर, घेसर, निळजे, काटई, माणगाव, कोळे, हेदुटणे आणि घारीवली या दहा गावांचा समावेश आहे. त्यापैकी भोपर, संदप, उसरघर, काटई आणि घारीवली ही गावे महापालिकेत ठेवली आहेत. घेसर, निळजे, माणगाव, कोळे, हेदुटणे ही पाच गावे स्वतंत्र नगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे