शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
2
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
3
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
5
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
6
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
7
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
8
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
9
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
10
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
11
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
12
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
13
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
14
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
15
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसेतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
16
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
18
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
19
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
20
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याचे नऊ कोटी जमा; कृषी विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 06:37 IST

या रकमेसह जिल्ह्यातील १६ हजार १३१ पात्र शेतकºयांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ होत आहे.

सुरेश लोखंडे

ठाणे : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १३ हजार ७९० शेतकºयांनी भातपिकांचा विमा काढलेला आहे. त्यापोटी त्यांच्या बँक खात्यात तीन दिवसांपूर्वी नऊ कोटी १२ लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याने संबंधितांमध्ये आनंदोत्सव होत असून, यामुळे त्यांना बºयापैकी आर्थिक पाठबळ मिळाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अंकुश माने यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यातील शेतकरी या ना त्या कारणांखाली चर्चेत आहेत. अतिपावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पूरस्थितीच्या कालावधीत बहुतांशी शेतकºयांचे पीक वाहून गेले आहे. काही ठिकाणी शेतजमीन पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. याशिवाय कर्जमाफीच्या विषयामुळेही शेतकरी वर्षभरापासून चर्चेत आहेत.

अवेळी पाऊस आणि पडणारा रोग यापासून त्यांचे नुकसान होऊ नये, यावरील उपाययोजना म्हणून पीकविमा काढण्याची सक्ती शेतकºयांवर केली होती. त्यास अनुसरून जिल्ह्यातील १३ हजार ७९० शेतकºयांनी त्यांच्या आठ हजार ५८० हेक्टर क्षेत्रातील भातपिकाचा विमा काढलेला आहे. या भातपिकाचे विविध कारणांनी नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यास आता या पीकविम्यांच्या नऊ कोटी १२ लाख रुपयांपासून आर्थिक पाठबळ मिळाले आहे.

जिल्ह्यातील २०१९ या खरीप हंगामातील भातपिकाचा विमा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह अन्यही काही बँकांनी शेतकºयांकडून काढला होता. यंदाच्या या साडेआठ हजार हेक्टरवरील भातपिकाच्या विम्यासाठी कर्जदार शेतकºयांना सक्ती करून विमा काढला होता. तर अन्यही शेतकºयांना नुकसानीसंदर्भात मार्गदर्शन व जनजागृती करून भातपिकाचा विमा काढण्यासाठी प्रोत्साहित केले होते. आता त्यांच्या खात्यात पावसामुळे पडलेल्या भातपिकाच्या विम्याची रक्कम प्राप्त झाली आहे. संबंधित शेतकºयांच्या बँक खात्यात नऊ कोटी १२ लाख रुपये विम्यापोटी जमा झाल्याचे सूतोवाच माने यांनी केले.कर्जमाफीचाही झाला लाभया रकमेसह जिल्ह्यातील १६ हजार १३१ पात्र शेतकºयांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ होत आहे. याद्वारे ९६ कोटी ६० लाखांची कर्जमाफी मिळणार आहे. यासाठी सुमारे १२ हजार ९४१ शेतकºयांचे आधारप्रमाणीकरण झाले आहे. त्यातील सहा हजारपेक्षा जास्त शेतकºयांना कर्जमाफीची रक्कम बँक खात्यात जमा होत आहेत. उर्वरित सहा हजार ८४४ शेतकºयांची कर्जमाफीदेखील लवकरच जाहीर होणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा