शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

Tauktae Cyclone : न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट चक्रीवादळात अडकली; ६ जणांचा जीव वाचवण्यासाठी धडपड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 20:46 IST

Tauktae Cyclone : भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक कोळीवाड्यातील मच्छीमार बोटी किनाऱ्यावर परतल्या. बोटी किनाऱ्यावर याव्यात यासाठी मत्स्य विभाग, महसूल व पोलिसांसह मच्छीमार नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

मीरारोड - भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट आज तौत्के चक्रीवादळाच्या चक्रात अडकली. बोटीवर एकूण ६ जण असून वादळ आणि खवळलेल्या समुद्रात बोट आणि स्वतःचा जीव राखण्यासाठी त्यांची सोमवार रात्रीपर्यंत धडपड सुरू होती. तौत्के चक्रीवादळाचा इशारा मच्छीमारांना आधीच दिला गेला होता. रविवारपर्यंत भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक कोळीवाड्यातील मच्छीमार बोटी किनाऱ्यावर परतल्या. बोटी किनाऱ्यावर याव्यात यासाठी मत्स्य विभाग, महसूल व पोलिसांसह मच्छीमार नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

डायमंड मिरांडा यांची मच्छीमार बोट मात्र किनाऱ्यावर वेळीच परतण्यास निघाली नाही. जेणे करून ती आता समुद्रात चक्रीवादळाच्या फेऱ्यात अडकली आहे. बोटीवर डायमंड यांचा मुलगा जस्टिन मिरांडा हा नाखवा असून अन्य ५ खलाशी आहेत. हे सर्व खलाशी झारखंडचे आहेत. रविवारी सदर बोट समुद्रातील ओएनजीसीच्या एका वापरात नसलेल्या इंधन विहिरीच्या रिंग वर गेली होती. त्यावेळी त्यांना तेथेच थांबा किंवा डहाणूचा समुद्र किनारा जवळ सुमारे ४ तासांवर असल्याने तेथे आश्रयाला जा असे निर्देश देण्यात आले होते. परंतु नाखवा व खलाशी यांनी भाईंदरचा पाली किनारा गाठण्यासाठी निघाले. 

समुद्रात चक्रीवादळाने गाठल्याने प्रचंड वादळीवारा, पाऊस व खवळलेला समुद्र अशा कात्रीत बोट आणि मच्छीमार सापडले. किनाऱ्या पासून सुमारे ११ नॉटिकल मैलावर खवळलेल्या समुद्रात एका खडकाला नांगर टाकून सर्वजण बोट टिकवून ठेवण्याची धडपड करत होते. त्यांचा वायरलेसवरून घरच्यांशी संपर्क सुरू होता. मंडळ अधिकारी प्रशांत कापडे सुद्धा बोटीवरील जस्टिन यांच्या शी वायर्सल्स वरून संपर्क करून माहिती देत होते. उसळलेल्या समुद्रात बोट चक्रीवादळाच्या दिशेने ओढली जात होती. टाकलेला नांगर तुटल्यानंतर नाखवाने बोट भाईंदर किनारी नेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. परंतु वादळाचा प्रचंड जोर असल्याने बोट भरकटत होती. 

अखेर काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा समुद्रात नांगर टाकून बोट व स्वतःचा जीव वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. नाखवा मिरांडा यांना वादळ शांत होत नाही तोपर्यंत नांगर टाकून थांबा किंवा डहाणूच्या किनारी आश्रयाला जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांचा घरच्यांशी वायरलेस वरून संपर्क सुरू आहे अशी माहिती प्रशांत कापडे यांनी दिली. दरम्यान बोटीसह नाखवा आणि खलाशी सुखरूप परत यावेत यासाठी मिरांडा कुटुंबीय आणि पालीगावात प्रार्थना केल्या जात आहेत . तर चक्रीवादळामुळे किनाऱ्यावरून मदत पाठवणे अवघड झाले आहे.  

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळMira Bhayanderमीरा-भाईंदर