शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
2
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
3
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
4
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
5
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
6
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
7
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
8
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
9
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
10
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
11
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
12
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
13
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
14
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
15
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
16
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
17
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
18
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
19
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
20
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...

Tauktae Cyclone : न्यू हेल्प मेरी मच्छीमार बोट चक्रीवादळात अडकली; ६ जणांचा जीव वाचवण्यासाठी धडपड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 20:46 IST

Tauktae Cyclone : भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक कोळीवाड्यातील मच्छीमार बोटी किनाऱ्यावर परतल्या. बोटी किनाऱ्यावर याव्यात यासाठी मत्स्य विभाग, महसूल व पोलिसांसह मच्छीमार नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

मीरारोड - भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छीमार बोट आज तौत्के चक्रीवादळाच्या चक्रात अडकली. बोटीवर एकूण ६ जण असून वादळ आणि खवळलेल्या समुद्रात बोट आणि स्वतःचा जीव राखण्यासाठी त्यांची सोमवार रात्रीपर्यंत धडपड सुरू होती. तौत्के चक्रीवादळाचा इशारा मच्छीमारांना आधीच दिला गेला होता. रविवारपर्यंत भाईंदरच्या उत्तन, पाली व चौक कोळीवाड्यातील मच्छीमार बोटी किनाऱ्यावर परतल्या. बोटी किनाऱ्यावर याव्यात यासाठी मत्स्य विभाग, महसूल व पोलिसांसह मच्छीमार नेत्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

डायमंड मिरांडा यांची मच्छीमार बोट मात्र किनाऱ्यावर वेळीच परतण्यास निघाली नाही. जेणे करून ती आता समुद्रात चक्रीवादळाच्या फेऱ्यात अडकली आहे. बोटीवर डायमंड यांचा मुलगा जस्टिन मिरांडा हा नाखवा असून अन्य ५ खलाशी आहेत. हे सर्व खलाशी झारखंडचे आहेत. रविवारी सदर बोट समुद्रातील ओएनजीसीच्या एका वापरात नसलेल्या इंधन विहिरीच्या रिंग वर गेली होती. त्यावेळी त्यांना तेथेच थांबा किंवा डहाणूचा समुद्र किनारा जवळ सुमारे ४ तासांवर असल्याने तेथे आश्रयाला जा असे निर्देश देण्यात आले होते. परंतु नाखवा व खलाशी यांनी भाईंदरचा पाली किनारा गाठण्यासाठी निघाले. 

समुद्रात चक्रीवादळाने गाठल्याने प्रचंड वादळीवारा, पाऊस व खवळलेला समुद्र अशा कात्रीत बोट आणि मच्छीमार सापडले. किनाऱ्या पासून सुमारे ११ नॉटिकल मैलावर खवळलेल्या समुद्रात एका खडकाला नांगर टाकून सर्वजण बोट टिकवून ठेवण्याची धडपड करत होते. त्यांचा वायरलेसवरून घरच्यांशी संपर्क सुरू होता. मंडळ अधिकारी प्रशांत कापडे सुद्धा बोटीवरील जस्टिन यांच्या शी वायर्सल्स वरून संपर्क करून माहिती देत होते. उसळलेल्या समुद्रात बोट चक्रीवादळाच्या दिशेने ओढली जात होती. टाकलेला नांगर तुटल्यानंतर नाखवाने बोट भाईंदर किनारी नेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. परंतु वादळाचा प्रचंड जोर असल्याने बोट भरकटत होती. 

अखेर काही अंतर पुढे गेल्यावर पुन्हा समुद्रात नांगर टाकून बोट व स्वतःचा जीव वाचवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवले. नाखवा मिरांडा यांना वादळ शांत होत नाही तोपर्यंत नांगर टाकून थांबा किंवा डहाणूच्या किनारी आश्रयाला जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांचा घरच्यांशी वायरलेस वरून संपर्क सुरू आहे अशी माहिती प्रशांत कापडे यांनी दिली. दरम्यान बोटीसह नाखवा आणि खलाशी सुखरूप परत यावेत यासाठी मिरांडा कुटुंबीय आणि पालीगावात प्रार्थना केल्या जात आहेत . तर चक्रीवादळामुळे किनाऱ्यावरून मदत पाठवणे अवघड झाले आहे.  

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळMira Bhayanderमीरा-भाईंदर