शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
3
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
4
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
7
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
8
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
9
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
10
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
11
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
12
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
13
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
14
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
15
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
16
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
17
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
18
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
19
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
20
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत रेल्वे प्रकल्पाच्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा; सुरक्षेची कोणतीही खबरदारी न घेता सुरू आहे मनमर्जी कारभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 19:12 IST

Railway Project in Bhiwandi : भिवंडीतील वडघर गावात रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र याठिकाणी माती भराव करणाऱ्या प्रसाद रोड्स अँड इन्फ्रा प्रा ली. कंपनीच्या कंत्राटदाराने वडघर येथील स्मशान भूमीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला खोदकाम करून त्यात भरणी केली नाही.

नितिन पंडीत

भिवंडी - वसई रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मार्गावर मालवाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने पनवेल -भिवंडी - वसई या मार्गावर दोन नव्या रेल्वे मार्गाचे काम सध्या सुरू आहे. सध्या या मार्गात जमीन अधिग्रहण व माती भराव असे काम सुरू आहे. मात्र माती भराव करणाऱ्या ठेकेदारांनी नागरिकांच्या सुरक्षेची कोणतीही दखल घेतली नसल्याची बाब समोर आली आहे.            भिवंडीतील वडघर गावात रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र याठिकाणी माती भराव करणाऱ्या प्रसाद रोड्स अँड इन्फ्रा प्रा ली. कंपनीच्या कंत्राटदाराने वडघर येथील स्मशान भूमीच्या बाजूला रस्त्याच्या कडेला खोदकाम करून त्यात भरणी केली नाही. विशेष म्हणजे माती भराईसाठी खोदलेल्या या खड्ड्यात कंत्राटदाराने माती भराई केली नाही त्याच बरोबर कोणत्याही प्रकारची सुरक्षा देखील या खड्डयाभोवती केलेली नाही. त्यातच मागील आठवड्यात पडलेल्या पावसात हा खड्डा पाण्याने पूर्ण भरला असून या खड्ड्याला तलावाचे रूप आले आहे, विशेष म्हणजे या खोदकामाच्या बाजूला नागरिकांची घरे असून लहान मुले या खड्ड्यात दगड फेकायला जात आहेत. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

त्याचबरोबर या मार्गावर खारबाव तसेच भिवंडी रोड रेल्वे पुलाचे त्याच बरोबर छोट्या मोठ्या मोरीपूल तसेच वडघर येथील स्मशान भूमीजवळील पुलाचे काम देखील अपूर्ण आहे. मात्र ही कामे अपूर्ण असतांनाही या मार्गावर माती भराव करण्याचे काम घेणाऱ्या ठेकेदाराने वडघर येथे मोठ्या प्रमाणात माती भराव करण्यात सुरुवात केली आहे. हे माती भरावाचे काम करतांना संबंधित कामाचा ठेका घेणाऱ्या प्रसाद इन्फ्रा या कंपनीने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यात पाण्याच्या निचरा होण्याकडे पुरता दुर्लक्ष करून माती भराव केल्याने याठिकणी राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याचा धोका वाढला आहे. त्याकडे देखील ठेकेदारांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बेजबाबदारपणे माती भरावाचे काम करणाऱ्या प्रसाद रोड अँड इन्फ्रा या ठेकेदाराला महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना द्याव्यात नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे निर्देश करावे अशी मागणी वडघर ग्रामस्थांनी भिवंडीचे प्रांताधिकारी डॉ मोहन नळदकर यांच्यासह तहसीलदार अधिक पाटील यांच्याकडे केली आहे.  

टॅग्स :bhiwandiभिवंडी