शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

रामजन्मभूमीचे कार्य पुढे नेण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:45 IST

विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व. अशोक सिंघल यांनी रामजन्मभूमी आंदोलनाची चळवळ उभी केली.

डोंबिवली : विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व. अशोक सिंघल यांनी रामजन्मभूमी आंदोलनाची चळवळ उभी केली. देशभरात हिंदू ऐक्याचे वातावरण निर्माण केले, त्यामुळे ती चळवळ पुढे नेणे, हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. यापुढेही रामजन्मभूमी हा विषय पूर्णत्वास जायलाच हवा, हा संकल्प आपण सगळ्यांनी करणे रामनवमीनिमित्त करायला हवे, असे आवाहन विहिंपचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी केले.‘श्रद्धेय अशोक सिंघल राष्ट्रीय प्रतिष्ठान’ या संस्थेच्या शनिवारी ठाण्यात झालेल्या शुभारंभ सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ठाण्यात शनिवारी टिपटॉप प्लाझा येथे हा सोहळा झाला. त्यावेळी परिषदेचे संघटन महामंत्री विनायक देशपांडे, कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंद जिंदल, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे संदीप लेले, प्रा. वरदराज बापट, अरविंद जोशी आदींसह मान्यवर उपस्थित होते.अलोक कुमार म्हणाले की, देशामध्ये खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे वातावरण आहे. रा.स्व. संघाचे प्रचारक म्हणून सिंघल यांनी मोठे योगदान दिले. स्वत:ला पूर्णपणे मातृभूमीसाठी झोकून देऊन एका विशिष्ट उद्देशाने सतत कार्यरत राहणे, हे सोपे नसते. सिंघल हे तसेच जगले. त्यामुळेच ते विचारांच्या रूपाने प्रत्येकाच्या मनामनांत आजही जिवंत आहेत.या प्रतिष्ठानतर्फे हिंदुत्वाचा प्रसार करणाºया व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांचे मनोधैर्य वाढवणे हे प्रतिष्ठानच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असल्याचे संस्थापक संजय ढवळीकर यांनी सांगितले.हिंदुत्वाचा प्रसार, प्रचार करणे, हा प्रतिष्ठान स्थापण्यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. प्रतिष्ठानतर्फे यंदा पहिला पुरस्कार व्याख्याते, लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना अलोक कुमार यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ठाण्यातील स्वामिनारायण मंदिराचे विश्वस्त स्वामी शास्त्री, स्वामी विवेक आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि २५ हजारांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.>‘स्वातंत्र्य मिळवले’ असे शिकवा - शेवडेडॉ. शेवडे यांनी ‘मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे’ अशी खिल्ली उडवणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. हिंदू हा संस्कार असून ती जगण्याची पद्धत आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. संस्कार हे महत्त्वाचे आहेत. आपली शिक्षणपद्धती ही चुकीची असून नकारात्मकता शिकवते. आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नसून ते आपण मिळवले आहे. मिळाले ही भीक असून मिळवले यात त्याग आहे, बलिदान आहे. संघर्ष आहे, अभिमान आहे. हे युवकांना शिकवणे आवश्यक आहे.