शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रामजन्मभूमीचे कार्य पुढे नेण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:45 IST

विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व. अशोक सिंघल यांनी रामजन्मभूमी आंदोलनाची चळवळ उभी केली.

डोंबिवली : विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व. अशोक सिंघल यांनी रामजन्मभूमी आंदोलनाची चळवळ उभी केली. देशभरात हिंदू ऐक्याचे वातावरण निर्माण केले, त्यामुळे ती चळवळ पुढे नेणे, हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. यापुढेही रामजन्मभूमी हा विषय पूर्णत्वास जायलाच हवा, हा संकल्प आपण सगळ्यांनी करणे रामनवमीनिमित्त करायला हवे, असे आवाहन विहिंपचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी केले.‘श्रद्धेय अशोक सिंघल राष्ट्रीय प्रतिष्ठान’ या संस्थेच्या शनिवारी ठाण्यात झालेल्या शुभारंभ सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ठाण्यात शनिवारी टिपटॉप प्लाझा येथे हा सोहळा झाला. त्यावेळी परिषदेचे संघटन महामंत्री विनायक देशपांडे, कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंद जिंदल, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे संदीप लेले, प्रा. वरदराज बापट, अरविंद जोशी आदींसह मान्यवर उपस्थित होते.अलोक कुमार म्हणाले की, देशामध्ये खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे वातावरण आहे. रा.स्व. संघाचे प्रचारक म्हणून सिंघल यांनी मोठे योगदान दिले. स्वत:ला पूर्णपणे मातृभूमीसाठी झोकून देऊन एका विशिष्ट उद्देशाने सतत कार्यरत राहणे, हे सोपे नसते. सिंघल हे तसेच जगले. त्यामुळेच ते विचारांच्या रूपाने प्रत्येकाच्या मनामनांत आजही जिवंत आहेत.या प्रतिष्ठानतर्फे हिंदुत्वाचा प्रसार करणाºया व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांचे मनोधैर्य वाढवणे हे प्रतिष्ठानच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असल्याचे संस्थापक संजय ढवळीकर यांनी सांगितले.हिंदुत्वाचा प्रसार, प्रचार करणे, हा प्रतिष्ठान स्थापण्यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. प्रतिष्ठानतर्फे यंदा पहिला पुरस्कार व्याख्याते, लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना अलोक कुमार यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ठाण्यातील स्वामिनारायण मंदिराचे विश्वस्त स्वामी शास्त्री, स्वामी विवेक आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि २५ हजारांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.>‘स्वातंत्र्य मिळवले’ असे शिकवा - शेवडेडॉ. शेवडे यांनी ‘मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे’ अशी खिल्ली उडवणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. हिंदू हा संस्कार असून ती जगण्याची पद्धत आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. संस्कार हे महत्त्वाचे आहेत. आपली शिक्षणपद्धती ही चुकीची असून नकारात्मकता शिकवते. आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नसून ते आपण मिळवले आहे. मिळाले ही भीक असून मिळवले यात त्याग आहे, बलिदान आहे. संघर्ष आहे, अभिमान आहे. हे युवकांना शिकवणे आवश्यक आहे.