शहरं
Join us  
Trending Stories
1
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
2
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
3
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
4
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
5
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
6
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
7
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
8
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
9
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
10
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
11
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
12
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
13
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
14
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
15
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
16
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
17
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
18
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
19
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
20
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?

रामजन्मभूमीचे कार्य पुढे नेण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:45 IST

विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व. अशोक सिंघल यांनी रामजन्मभूमी आंदोलनाची चळवळ उभी केली.

डोंबिवली : विश्व हिंदू परिषदेचे नेते स्व. अशोक सिंघल यांनी रामजन्मभूमी आंदोलनाची चळवळ उभी केली. देशभरात हिंदू ऐक्याचे वातावरण निर्माण केले, त्यामुळे ती चळवळ पुढे नेणे, हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य आहे. यापुढेही रामजन्मभूमी हा विषय पूर्णत्वास जायलाच हवा, हा संकल्प आपण सगळ्यांनी करणे रामनवमीनिमित्त करायला हवे, असे आवाहन विहिंपचे कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी केले.‘श्रद्धेय अशोक सिंघल राष्ट्रीय प्रतिष्ठान’ या संस्थेच्या शनिवारी ठाण्यात झालेल्या शुभारंभ सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ठाण्यात शनिवारी टिपटॉप प्लाझा येथे हा सोहळा झाला. त्यावेळी परिषदेचे संघटन महामंत्री विनायक देशपांडे, कोकण प्रांताध्यक्ष देवकीनंद जिंदल, आमदार निरंजन डावखरे, भाजपचे संदीप लेले, प्रा. वरदराज बापट, अरविंद जोशी आदींसह मान्यवर उपस्थित होते.अलोक कुमार म्हणाले की, देशामध्ये खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचे वातावरण आहे. रा.स्व. संघाचे प्रचारक म्हणून सिंघल यांनी मोठे योगदान दिले. स्वत:ला पूर्णपणे मातृभूमीसाठी झोकून देऊन एका विशिष्ट उद्देशाने सतत कार्यरत राहणे, हे सोपे नसते. सिंघल हे तसेच जगले. त्यामुळेच ते विचारांच्या रूपाने प्रत्येकाच्या मनामनांत आजही जिवंत आहेत.या प्रतिष्ठानतर्फे हिंदुत्वाचा प्रसार करणाºया व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करून त्यांचे मनोधैर्य वाढवणे हे प्रतिष्ठानच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असल्याचे संस्थापक संजय ढवळीकर यांनी सांगितले.हिंदुत्वाचा प्रसार, प्रचार करणे, हा प्रतिष्ठान स्थापण्यामागचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. प्रतिष्ठानतर्फे यंदा पहिला पुरस्कार व्याख्याते, लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना अलोक कुमार यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ठाण्यातील स्वामिनारायण मंदिराचे विश्वस्त स्वामी शास्त्री, स्वामी विवेक आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि २५ हजारांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोहळ्याचे सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले.>‘स्वातंत्र्य मिळवले’ असे शिकवा - शेवडेडॉ. शेवडे यांनी ‘मंदिर वही बनाएंगे तारीख नही बताएंगे’ अशी खिल्ली उडवणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. हिंदू हा संस्कार असून ती जगण्याची पद्धत आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. संस्कार हे महत्त्वाचे आहेत. आपली शिक्षणपद्धती ही चुकीची असून नकारात्मकता शिकवते. आपल्याला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले नसून ते आपण मिळवले आहे. मिळाले ही भीक असून मिळवले यात त्याग आहे, बलिदान आहे. संघर्ष आहे, अभिमान आहे. हे युवकांना शिकवणे आवश्यक आहे.