शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शेतकऱ्यांनी अडचणी सोडविण्यासाठी एकत्र येण्याची काळाची गरज - अंकुश माने 

By सुरेश लोखंडे | Updated: September 5, 2022 12:41 IST

कृषी विभागाने 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम सुरू केला असून 30 नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

ठाणे : अत्यल्प भूधारक शेतक-यांना सिंचनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बोअरवेल, विहिरीवर अवलंबून राहता येत नाही कारण विहीर किंवा बोअरवेल मारून तिथे पाणी लागेल, याची शाश्वती नाही. त्यासाठी अस्तरीकरणासह शेततळे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण, जागेच्या अभावामुळे शेततळे करता येत नसेल तर सामूहिकपणे एकत्र येऊन शेततळे उभारावे, यासाठी रोजगार हमी योजनेद्वारे मिळणाऱ्या शेततळे अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी कारंद तालुका अंबरनाथ येथे आयोजित 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमावेळी केले. 

कृषी विभागाने 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम सुरू केला असून 30 नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात अधिकारी वर्ग शेतकऱ्यांसोबत दिवसभर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत व त्यांच्याशी चर्चा करून यावर उपाय योजनेसाठी प्रयत्न करणार आहेत. यानिमित्ताने अंबरनाथमधील कारंद येथे भेट देऊन रत्नागिरी ८ या वाणांची चारसुत्री पद्धतीने केलेली भात लागवडची पाहणी केली. 

भात पिक परिस्थितीची पाहणी केली. किड रोग उपाय योजनाबाबत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. वाकड्याची वाडी येथे शेतकरी चर्चा सत्र झाले. यामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड, मोगरा लागवड, बाजारात मागणी असणाऱ्या पिकांची लागवड, शेततळे, मत्स्य शेती याबाबत माहिती माने यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. 

याचबरोबर, पीएमकिसान अंतर्गत केवायसी करणे, ई पिक पाहणी अंतर्गत आपल्या पिकांची नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. रत्नागिरी ८ वाणाचे बियाणे जतन करून इतर शेतकऱ्यांना देण्यासाठी आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीला आवश्यक विजेची सोय, पाण्याची कमतरता, अत्यल्प जमिनी, बाजारभाव याबाबत अडचणी मांडल्या. या कार्यक्रमाला उल्हासनगर तालुका कृषीअधिकारी विठ्ठल कांबळे, मंडळ कृषी अधिकारी सुवर्णा माळी, कृषी पर्यवेक्षक अविनाश वडते आदींसह कृषी सहायक सचिन तोरवे, अनिता नेहे, जयश्री साठे आदींनी उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी