शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

शेतकऱ्यांनी अडचणी सोडविण्यासाठी एकत्र येण्याची काळाची गरज - अंकुश माने 

By सुरेश लोखंडे | Updated: September 5, 2022 12:41 IST

कृषी विभागाने 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम सुरू केला असून 30 नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

ठाणे : अत्यल्प भूधारक शेतक-यांना सिंचनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बोअरवेल, विहिरीवर अवलंबून राहता येत नाही कारण विहीर किंवा बोअरवेल मारून तिथे पाणी लागेल, याची शाश्वती नाही. त्यासाठी अस्तरीकरणासह शेततळे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण, जागेच्या अभावामुळे शेततळे करता येत नसेल तर सामूहिकपणे एकत्र येऊन शेततळे उभारावे, यासाठी रोजगार हमी योजनेद्वारे मिळणाऱ्या शेततळे अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी कारंद तालुका अंबरनाथ येथे आयोजित 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमावेळी केले. 

कृषी विभागाने 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम सुरू केला असून 30 नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात अधिकारी वर्ग शेतकऱ्यांसोबत दिवसभर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत व त्यांच्याशी चर्चा करून यावर उपाय योजनेसाठी प्रयत्न करणार आहेत. यानिमित्ताने अंबरनाथमधील कारंद येथे भेट देऊन रत्नागिरी ८ या वाणांची चारसुत्री पद्धतीने केलेली भात लागवडची पाहणी केली. 

भात पिक परिस्थितीची पाहणी केली. किड रोग उपाय योजनाबाबत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. वाकड्याची वाडी येथे शेतकरी चर्चा सत्र झाले. यामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड, मोगरा लागवड, बाजारात मागणी असणाऱ्या पिकांची लागवड, शेततळे, मत्स्य शेती याबाबत माहिती माने यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. 

याचबरोबर, पीएमकिसान अंतर्गत केवायसी करणे, ई पिक पाहणी अंतर्गत आपल्या पिकांची नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. रत्नागिरी ८ वाणाचे बियाणे जतन करून इतर शेतकऱ्यांना देण्यासाठी आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीला आवश्यक विजेची सोय, पाण्याची कमतरता, अत्यल्प जमिनी, बाजारभाव याबाबत अडचणी मांडल्या. या कार्यक्रमाला उल्हासनगर तालुका कृषीअधिकारी विठ्ठल कांबळे, मंडळ कृषी अधिकारी सुवर्णा माळी, कृषी पर्यवेक्षक अविनाश वडते आदींसह कृषी सहायक सचिन तोरवे, अनिता नेहे, जयश्री साठे आदींनी उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी