शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

शेतकऱ्यांनी अडचणी सोडविण्यासाठी एकत्र येण्याची काळाची गरज - अंकुश माने 

By सुरेश लोखंडे | Updated: September 5, 2022 12:41 IST

कृषी विभागाने 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम सुरू केला असून 30 नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

ठाणे : अत्यल्प भूधारक शेतक-यांना सिंचनासाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज भागवण्यासाठी बोअरवेल, विहिरीवर अवलंबून राहता येत नाही कारण विहीर किंवा बोअरवेल मारून तिथे पाणी लागेल, याची शाश्वती नाही. त्यासाठी अस्तरीकरणासह शेततळे हा सर्वोत्तम पर्याय आहे. पण, जागेच्या अभावामुळे शेततळे करता येत नसेल तर सामूहिकपणे एकत्र येऊन शेततळे उभारावे, यासाठी रोजगार हमी योजनेद्वारे मिळणाऱ्या शेततळे अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय कृषी सहसंचालक अंकुश माने यांनी कारंद तालुका अंबरनाथ येथे आयोजित 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या उपक्रमावेळी केले. 

कृषी विभागाने 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम सुरू केला असून 30 नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात अधिकारी वर्ग शेतकऱ्यांसोबत दिवसभर राहून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत व त्यांच्याशी चर्चा करून यावर उपाय योजनेसाठी प्रयत्न करणार आहेत. यानिमित्ताने अंबरनाथमधील कारंद येथे भेट देऊन रत्नागिरी ८ या वाणांची चारसुत्री पद्धतीने केलेली भात लागवडची पाहणी केली. 

भात पिक परिस्थितीची पाहणी केली. किड रोग उपाय योजनाबाबत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. वाकड्याची वाडी येथे शेतकरी चर्चा सत्र झाले. यामध्ये शेतकऱ्यांना फळबाग लागवड, मोगरा लागवड, बाजारात मागणी असणाऱ्या पिकांची लागवड, शेततळे, मत्स्य शेती याबाबत माहिती माने यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. 

याचबरोबर, पीएमकिसान अंतर्गत केवायसी करणे, ई पिक पाहणी अंतर्गत आपल्या पिकांची नोंदणी करण्याबाबत मार्गदर्शन येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. रत्नागिरी ८ वाणाचे बियाणे जतन करून इतर शेतकऱ्यांना देण्यासाठी आवाहन केले. यावेळी शेतकऱ्यांनी शेतीला आवश्यक विजेची सोय, पाण्याची कमतरता, अत्यल्प जमिनी, बाजारभाव याबाबत अडचणी मांडल्या. या कार्यक्रमाला उल्हासनगर तालुका कृषीअधिकारी विठ्ठल कांबळे, मंडळ कृषी अधिकारी सुवर्णा माळी, कृषी पर्यवेक्षक अविनाश वडते आदींसह कृषी सहायक सचिन तोरवे, अनिता नेहे, जयश्री साठे आदींनी उपस्थित शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी