शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

विखुरलेल्या नाभिक समाजाने एकत्र येण्याची गरज- महापौर मीनाक्षी शिंदे

By जितेंद्र कालेकर | Updated: January 13, 2019 22:45 IST

नोकरी करणा-या आणि निर्व्यसनी मुलांना उपवर मुलींनी तर घर सांभाळणाºया सुशिक्षित तरुणींना उपवर मुलांनी नाभिक समाजाच्या वधू वर मेळाव्या प्रसंगी आपली पसंती दर्शविली. ठाण्यात झालेल्या या मेळाव्याला राज्यभरातून ८५ मुलांनी तर १३२ मुलींनी नोंदणी केली.

ठळक मुद्देठाण्यातील वधू वर मेळाव्यात व्यक्त केले मतराज्यभरातील समाज बांधवांची उपस्थितीनोकरी करणाऱ्या मुलांना मुलींंकडून प्राधान्य

ठाणे: विखुरलेल्या नाभिक समाजाने वधु वर मेळाव्यांसारख्या कार्यक्रमांमधून एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले. ठाणे पूर्व भागातील कोपरी येथे श्री संत सेना पुरोगामी नाभिक संघाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी वधू वर पालक परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करतांना त्या बोलत बोलत होत्या.श्री संत सेना पुरागामी नाभिक संघाने कोपरीतील आनंद बँक्वेट हॉल येथे आयोजित केलेल्या वधु वर पालक परिचय कार्यक्रमाचे कौतुक करुन शिंदे यांनी संपूर्ण शहरात विखुरलेल्या नाभिक समाज बांधवांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. ब-याचदा अशा मेळाव्यांमध्ये केवळ पालकांची उपस्थिती असते. परंतू, तसे न होता उपवर मुला मुलींनीही आवर्जून येणे गरजेचे आहे. अशाच उपक्रमांमधून आपला समाज आणि बांधव एकत्र गुुंफला जात असतो. अशा प्रकारे विधायक उपक्रम संस्थेने राबविल्यास पालिकेतर्फे त्यांना आवश्यक ती मदत करण्यात येईल, असेही आश्वासन महापौर शिंदे यांनी यावेळी दिले.यावेळी राज्यभरातून ८५ मुलांनी तर १३२ मुलींनी या मेळाव्यामध्ये आपली नोंदणी केली. सरकारी नोकरी करणारा, वेल सेटल, उच्चशिक्षित, निर्व्यसनी आणि स्वत:चे घर अशा उपवर मुलाची अपेक्षा बहुतांश मुलींनी व्यक्त केली. तर मनमिळावू, घर सांभाळणारी आणि अनुरुप अशा मुलींची अपेक्षा मुलांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना शहर अध्यक्ष नरेश म्हस्के, ठाणे जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी पंकज चव्हाण, ठाणे महापालिकेच्या माजी नगरसेविका नम्रता भोसले, ‘लोकमत’चे प्रतिनिधी तथा संस्थेचे सल्लागार जितेंद्र कालेकर, हिंदू मुस्लीम एकता समितीचे शंकर राऊत, संस्थेचे माजी सचिव विठ्ठल दळवी, माजी अध्यक्ष अशोक राऊत, ज्ञानेश्वर शिंदे आणि सचिन शिंदे या प्रमुख पाहुण्यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता सांगळे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत, उपाध्यक्ष सचिन कुटे, सेक्रेटरी अरविंद माने यांच्यासह राज्यभरातून अनेक समाजबांधव यावेळी उपस्थित होते.जळगाव येथून आलेल्या जयविजय निकम दाम्पत्याने सात तासांमध्ये ६५१ महिलांचे हेअर कट करण्याच्या विश्व विक्रमाची नोंद बेस्ट इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये २० आॅक्टोबर २०१८ रोजी जळगाव येथे केली. त्याबद्दल जयविजय निकम यांचा तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी झटणारे शंकर राऊत यांचा संस्थेच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

 

टॅग्स :thaneठाणेSocialसामाजिक