शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

गणेशपुरी ग्रामपंचायतीजवळील कातकरीपाड्यांमध्ये तीव्र टंचाई, बंधाऱ्यात मुबलक पाणी असूनही घशाला कोरड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 01:38 IST

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या उसगाव बंधारा, उसगाव कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या पाच आदिवासी कातकरीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अनगाव - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या उसगाव बंधारा, उसगाव कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या पाच आदिवासी कातकरीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उसगाव येथील बंधाºयात मुबलक पाणीसाठा आहे. येथील पाणी नालासोपारा, विरार तसेच उसगावला दिले जाते. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या कातकरीवाडीसह या टंचाईग्रस्त पाड्यांना पाणी मिळत नाही.गणेशपुरी ग्रामपंचायत क्षेत्रातील कवाडपाडा येथे बोअरवेल आहे. पाण्याची टाकीही बसवण्यात आली आहे. भिवंडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या पाड्यांमध्ये नागरी सुविधांची वानवा आहे. विशेष म्हणजे गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या ठिकाणी भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. अशा नित्यानंद महाराज यांच्या पावनभूमीत आजही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, ही धक्कादायक बाब आहे.गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली या तीर्थक्षेत्रांना सरकारने पर्यटनाचा दर्जा दिला आहे. मात्र, येथील नागरी समस्या सोडवल्या नाहीत. त्यामुळे पर्यटनक्षेत्र हे कागदोपत्री आहे. त्यामुळे येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीटंचाई कधीच माहीत नसते. पाणीटंचाईसंबंधी लेखी निवेदन श्रमजीवी संघटनेच्या वतीने दिलेले आहे. त्यामध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांची नावे समाविष्ट आहेत. सहा महिने उलटून गेल्यावरही त्यावर पाणीपुरवठा विभागाने का उपाययोजना केल्या नाहीत, असा प्रश्न संघटनेचे कार्यकर्ते जयेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.गणेशपुरी गावाजवळ असणाºया पाड्यांत टंचाई जाणवत असल्याने तालुका व जिल्हा प्रशासन काय करते आहे, की पाण्यासाठी एखादा जीव गमावल्यावर ते येथील टंचाई दूर करणार, असा सवाल संजय कामडी यांनी केला आहे.या पाड्यांवर बोअरवेल आहेत. त्यांना पाणी येत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. येथील पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कवाडपाडा येथे बोअरवेल आहे, मात्र पाणी नाही. पाण्याची टाकी आहे, ती कोरडी आहे. उसगाव येथील कातकरीवाडीत बोअरवेलला पाणी नाही, अशी परिस्थिती आहे.पाणीटंचाईबाबत ग्रामसेवकाकडून माहिती मागवली आहे. अशी माहिती विस्तार अधिकारी इंद्रजित काळे यांनी दिली. दरम्यान, मागीलवर्षीही भिवंडी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई होती. मात्र अधिकारी ते मान्य करत नव्हते. ‘लोकमत’ने जेव्हा हा प्रकार उघड केला तेव्हा अधिकाºयांची धावपळ झाली. लोकप्रतिनिधी यांनी दखल घेत अधिकाºयांना धारेवर धरले. ‘लोकमत’मधील वृत्तानंतर अनेक पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाले.समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरूया पाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. ती दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विभागाला माहिती दिलेली आहे. समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- विनोद पाटील, उपसरपंच, गणेशपुरी 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे