शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

गणेशपुरी ग्रामपंचायतीजवळील कातकरीपाड्यांमध्ये तीव्र टंचाई, बंधाऱ्यात मुबलक पाणी असूनही घशाला कोरड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 01:38 IST

भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या उसगाव बंधारा, उसगाव कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या पाच आदिवासी कातकरीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अनगाव - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या उसगाव बंधारा, उसगाव कातकरीवाडी, कवाडपाडा, खरपडेपाडा, गहलपाडा या पाच आदिवासी कातकरीपाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. उसगाव येथील बंधाºयात मुबलक पाणीसाठा आहे. येथील पाणी नालासोपारा, विरार तसेच उसगावला दिले जाते. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या कातकरीवाडीसह या टंचाईग्रस्त पाड्यांना पाणी मिळत नाही.गणेशपुरी ग्रामपंचायत क्षेत्रातील कवाडपाडा येथे बोअरवेल आहे. पाण्याची टाकीही बसवण्यात आली आहे. भिवंडी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या या पाड्यांमध्ये नागरी सुविधांची वानवा आहे. विशेष म्हणजे गणेशपुरी येथे स्वामी नित्यानंद महाराज यांचे समाधी मंदिर आहे. या ठिकाणी भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात. अशा नित्यानंद महाराज यांच्या पावनभूमीत आजही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, ही धक्कादायक बाब आहे.गणेशपुरी, वज्रेश्वरी, अकलोली या तीर्थक्षेत्रांना सरकारने पर्यटनाचा दर्जा दिला आहे. मात्र, येथील नागरी समस्या सोडवल्या नाहीत. त्यामुळे पर्यटनक्षेत्र हे कागदोपत्री आहे. त्यामुळे येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भिवंडी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना पाणीटंचाई कधीच माहीत नसते. पाणीटंचाईसंबंधी लेखी निवेदन श्रमजीवी संघटनेच्या वतीने दिलेले आहे. त्यामध्ये टंचाईग्रस्त गावपाड्यांची नावे समाविष्ट आहेत. सहा महिने उलटून गेल्यावरही त्यावर पाणीपुरवठा विभागाने का उपाययोजना केल्या नाहीत, असा प्रश्न संघटनेचे कार्यकर्ते जयेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.गणेशपुरी गावाजवळ असणाºया पाड्यांत टंचाई जाणवत असल्याने तालुका व जिल्हा प्रशासन काय करते आहे, की पाण्यासाठी एखादा जीव गमावल्यावर ते येथील टंचाई दूर करणार, असा सवाल संजय कामडी यांनी केला आहे.या पाड्यांवर बोअरवेल आहेत. त्यांना पाणी येत नसल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागते. येथील पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. कवाडपाडा येथे बोअरवेल आहे, मात्र पाणी नाही. पाण्याची टाकी आहे, ती कोरडी आहे. उसगाव येथील कातकरीवाडीत बोअरवेलला पाणी नाही, अशी परिस्थिती आहे.पाणीटंचाईबाबत ग्रामसेवकाकडून माहिती मागवली आहे. अशी माहिती विस्तार अधिकारी इंद्रजित काळे यांनी दिली. दरम्यान, मागीलवर्षीही भिवंडी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई होती. मात्र अधिकारी ते मान्य करत नव्हते. ‘लोकमत’ने जेव्हा हा प्रकार उघड केला तेव्हा अधिकाºयांची धावपळ झाली. लोकप्रतिनिधी यांनी दखल घेत अधिकाºयांना धारेवर धरले. ‘लोकमत’मधील वृत्तानंतर अनेक पाणी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाले.समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरूया पाड्यात पाणीटंचाई आहे, हे खरे आहे. ती दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा विभागाला माहिती दिलेली आहे. समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.- विनोद पाटील, उपसरपंच, गणेशपुरी 

टॅग्स :Waterपाणीthaneठाणे