शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'जनताच सरकारला महागलेल्या इंधनात जाळेल',ठाण्यात इंधन दरवाढीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 12:22 IST

आता या महागाईला विटलेली जनताच या सरकारला महागलेल्या इंधनामध्ये जाळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार आनंद परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. 

ठाणे - आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर घसरलेले असतानाही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल कंपन्यांना स्वायत्तता दिल्यामुळे इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. या सर्व महागाईला केंद्र सरकारच जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान, महागाई गगनाला भिडलेली असताना 'मन की बात' करणारे पंतप्रधान संसदेत उत्तर देण्याऐवजी प्रचारकी थाटात भाषणे करीत आहेत. त्यामुळे आता या महागाईला विटलेली जनताच या सरकारला महागलेल्या इंधनामध्ये जाळेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. 

गेल्या काही दिवसांपासून देशातील इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. पेट्रोल 82 रुपयांवर गेले आहे. तर, सीएनजी आणि पीएनजीचेही दरही गगनाला भिडले आहेत. या सर्व महागाईला राज्य आणि केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी हातगाडीवर दुचाकी ठेवून त्या ढकलण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे आदी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार आनंद परांजपे यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. एप्रिल 2018 मध्ये पेट्रोल -डिझेलच्या दराने आजवरचा उच्चांक गाठला आहे.  आज डिझेल 68.89 रुपये होते. तर पेट्रोल  81.69 रुपये झाले आहे. सीएनजीचे दर 44. 22 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तर पीएनजीचे म्हणजेच गॅसने पुरवठा केल्या जाणार्‍या गॅसचे दर 26. 87 प्रति स्टँडर्ड क्युबीक मीटर झालेले आहेत. सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षांचे भाडे आता वाढणार आहे. ठाण्यासारख्या शहरात टीएमटीच्या प्रवासाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे सामान्य लोक रिक्षाचा वापर करीत असतात. आता या रिक्षांचेही दर वाढणार असल्याने लोकांवर पुन्हा स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणेच चालत प्रवास करण्याची वेळ मोदी सरकारने आणली आहे.

तर, पीएनजीचे दर वाढल्याने गृहीणींचे बजेटही कोसळणार आहे. पगारदारांचा पैसा आधीच बड्या भांडवलदारांच्या खिशात घातला असताना आता स्वयंपाकघरातील सुबत्ताही हे सरकार हिरावून घेत आहे.  या देशात सध्या जनतेच्या हिताचा कोणताही निर्णय घेतलाच जात नाही. पंतप्रधान मन की बात करीत आहेत. मात्र, धन की बात करणार्‍यांना अभय दिले जात आहे. हे धन की बात करणारे चोक्सी, मल्लया आणि निरवसारखे लोक कोट्यवधी रुपये घेऊन पसार होत आहेत. या चोरांना पकडण्याऐवजी हे मोदी सरकार गोरगरीब जनतेच्या खिशात हात घालू ती भरपाई करण्याचा प्रयत्न करीत आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना आता शहरी माणसानेही महागाईच्या ओझ्याखाली आत्महत्या कराव्यात; असेच या सरकारला वाटत आहे. त्यामुळे हे सरकार आता गरिबांच्या घामाबरोबरच त्यांच्या जीवाचेही भुकेले आहे की काय, अशी शंका निर्माण होऊ लागली आहे. म्हणूनच आगामी 2019 मध्ये या सरकारलाच भारतीय जनता महागलेल्या इंधनात जाळेल, असा विश्वासही परांजपे यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलNCPराष्ट्रवादी काँग्रेस