शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

राष्ट्रवादीत पेटला अंतर्गत कलह, दहा नगरसेवकांनी घेतली पवारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 02:53 IST

२०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली असताना ठाण्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार अंतर्गत कलह पेटला आहे.

ठाणे : २०१९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी कंबर कसली असताना ठाण्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार अंतर्गत कलह पेटला आहे. या पक्षाच्या ३५ पैकी १० नगरसेवकांनी एकजूट करून आ. जितेंद्र आव्हाड आणि पक्षाचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह महापालिकेतील विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. आव्हाडांच्या निकटवर्तीयांपैकी एक असलेल्या नेत्यानेच या गटाचे नेतृत्व करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तक्रारी केल्याने राष्ट्रवादीत खळबळ माजली आहे.ठाण्यात राष्टÑवादी काँग्रेसचे ३५ नगरसेवक आहेत. शिवसेनेनंतर दुसºया क्रमांकाचा पक्ष म्हणून राष्टÑवादी काँग्रेसकडे बघितले जाते. आंदोलने आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून ठाण्यात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम आजही सुरू आहे. अशा स्थितीत ३५ पैकी १० नगरसेवकांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या मुंबईतील निवासस्थानी गुरुवारी भेट घेतली. या भेटीमागचे कारण लोकांना दाखवण्यासाठी वेगळे असले, तरी प्रत्यक्षात या भेटीदरम्यान नगरसेवकांनी आव्हाड आणि परांजपे यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती समोर आली आहे. येत्या काळात निवडणुका असून पक्षाला सक्षम नेतृत्व नसल्याचा आरोप करून या गटाने आव्हाड आणि परांजपेंच्या नेतृत्वाला आव्हान दिले आहे. पक्ष वाढण्यासाठी विशेष प्रयत्न होत नसल्याचा आरोप करून शहराध्यक्ष बदलण्यासह इतर मागण्यासुद्धा त्यांनी केल्या.आश्चर्य म्हणजे या १० नगरसेवकांचे नेतृत्व हे आव्हाडांच्या अगदी जवळचे, त्यांचे खंदे समर्थक नजीब मुल्ला यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि इतर नगरसेवकांचाही समावेश होता. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नजीब मुल्ला यांच्यासाठी आव्हाड यांनी परिश्रम घेतले होते, हे विशेष. आनंद परांजपे आणि मिलिंद पाटील यांच्यामुळे पक्षाची वाताहत झाली आहे. या दोघांनी पक्ष विकायला काढला असल्याचा स्पष्ट आरोपही यावेळी करण्यात आला. नजीब मुल्ला यांनी या वृत्ताचे खंडण केले आहे. मी शरद पवार यांना प्रत्येक आठवड्यात भेटतो. मी केवळ ठाण्याचा नव्हे तर राज्याचा नेता आहे. पवार यांच्या भेटीमध्ये ठाण्याच्या कोणत्याही नेत्याबद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती, असा दावा मुल्ला यांनी केला.>राष्ट्रवादी उवाच...आम्ही नेहमीप्रमाणे पवारसाहेबांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. कुणाला पक्षातून काढण्याच्या मागणीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी त्यांची भेट घेतली नव्हती.- हणमंत जगदाळे, ज्येष्ठ नगरसेवकया बैठकीचे मला निमंत्रण नव्हते. त्यामुळे तिथे काय झाले, याची मला कल्पना नाही. पक्षप्रमुखाच्या आदेशानुसार मी पक्ष वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे.- आनंद परांजपे, शहराध्यक्षप्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते. परंतु, ही महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा, याचा विचार ज्याचा त्यानेच करावा.- जितेंद्र आव्हाड, आमदारज्यांच्या कृत्यामुळे पक्षाची वाताहत झाली, त्यांनीच अशा प्रकारे इतरांवर आरोप करणे चुकीचे आहे. दुसºयाकडे बोट दाखवताना तीन बोटे आपल्याकडे असतात, हे त्यांनी विसरू नये.- मिलिंद पाटील,विरोधी पक्षनेते, ठामपा>१० नाराज नगरसेवकांना त्यांचे गाºहाणे लेखी स्वरूपात देण्याची सूचना शरद पवार यांनी केली आहे. विशेष म्हणजे, नगरसेवकांना त्यांचे म्हणणे गणेश नाईक यांच्याकडे देण्यास पवार यांनी सांगितले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड