शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
3
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
4
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
5
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
6
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
7
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
8
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
9
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
10
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
11
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
12
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
13
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
14
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
15
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
16
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
18
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
19
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
20
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत आज होणार ‘सुसंवाद’, दिग्गज नेत्यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 05:45 IST

दिग्गज नेत्यांची उपस्थिती : गटबाजी, श्रेयवादामुळे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज

प्रशांत माने

कल्याण : गटबाजी आणि श्रेयवादाच्या वाळवीमुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसला घरघर लागली असून या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी १ वाजता पश्चिमेतील मराठा मंदिर हॉलमध्ये सुसंवाद विशेष सभा होणार आहे. स्थानिक नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बेबनाव असताना, या सभेमध्ये दिग्गज नेते पक्षाच्या स्थितीवर काय बोलतात, याकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

केडीएमसीत एकेकाळी सत्ता भोगलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या २०१५ च्या निवडणुकीत अवघ्या दोनवर आली. त्यानंतरही संघटनात्मक बांधणीसाठी स्थानिक पातळीवर पक्षाने कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी गटबाजी, श्रेयवाद व वर्चस्ववादात पदाधिकारी गुंतल्याने पक्षाची प्रतिमा ढासळत आहे. २००० मध्ये केडीएमसीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १० नगरसेवक निवडून आले होते. २००५ मध्ये शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावत महापालिकेची सत्ता मिळवण्यात या पक्षाने यश मिळवले. त्यावेळी पक्षाचे २३ नगरसेवक निवडून आले. त्यावेळी काँग्रेसबरोबर झालेली आघाडी आणि अपक्षांच्या साहाय्याने राष्ट्रवादीच्या पुंडलिक म्हात्रे यांना महापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. डान्स बारबंदीचा धाडसी निर्णय घेतलेल्या तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांची लोकप्रियता तेव्हा सत्ता येण्यास कारणीभूत ठरली होती. डोंबिवलीत झालेली आर.आर. यांची सभाही तेव्हा गाजली होती. परंतु, पुढे स्थानिक नेत्यांचा उद्दामपणा आणि अपक्षांनी युतीला साथ दिल्याने राष्ट्रवादीला सत्ता पूर्णपणे उपभोगता आली नव्हती. अडीच वर्षांमध्येच राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात येऊन युतीने महापालिका काबीज केली. त्यानंतरच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची घसरणच होत गेली.

२०१० च्या निवडणुकीत १४ आणि २०१५ मध्ये केवळ दोन नगरसेवक निवडून आले. २०१५ मध्ये अनेक नगरसेवकांनी भाजपाची वाट धरल्याने पक्षावर ही स्थिती ओढावली आहे. पक्षाची अशीच स्थिती जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समितीतही आहे. याचे चिंतन करण्याऐवजी सध्या पक्षात गटातटांचे राजकारण, श्रेयवाद आहे. हे चित्र अन्य पक्षांत असले, तरी राष्ट्रवादीत ही परिस्थिती टोकाला पोहोचली आहे. मंगळवारच्या मौनव्रत आंदोलनादरम्यान माजी पदाधिकाऱ्यांत घडलेल्या धक्काबुक्की प्रकरणातून याची प्रचीती आली. गटबाजी आणि श्रेयवाद सर्रासपणे सुरू असताना प्रोटोकॉलही पाळला जात नसल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. पक्षाला बळकटी देईल, अशा समर्थ नेतृत्वाचा अभाव असल्याने ही परिस्थिती ओढावल्याचे बोलले जात आहे. पक्षात सक्षम नेते मोजकेच असून ते त्यांचे वर्चस्व कसे अबाधित राहील, यातच मश्गुल आहेत. पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत काय योगदान दिले, असा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. कल्याण-डोंबिवलीत नागरी समस्यांवर पक्ष रस्त्यावर उतरताना दिसत नाही. केंद्र आणि राज्यपातळीवरील विषय घेऊन पक्षाच्या आदेशाप्रमाणेच आंदोलने केली जातात. आंदोलनात कार्यकर्ते व पदाधिकाºयांची नगण्य उपस्थितीही चर्चेचा विषय ठरत आहे.

शुक्रवारच्या सुसंवाद सभेला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित राहणार आहेत. पक्षबांधणी आणि वाढीसाठी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले असले, तरी पक्षाच्या स्थितीवर प्रदेश पातळीवरील नेते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.नियुक्त्यांवरून होणार वाद?शुक्रवारच्या सुसंवाद सभेच्या निमित्ताने नवीन नियुक्त्या घोषित केल्या जाणार आहेत. या नियुक्त्यांमध्ये नवख्यांना संधी दिली गेल्याने जुने कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे सुसंवाद सभेत त्याचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका