शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ आली: जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 17:17 IST

सर्व मराठी माणसांनी एकत्न येऊन राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ आता आली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

ठाणे :  

सर्व मराठी माणसांनी एकत्न येऊन राजभवनात घुसून राज्यपालांना हाकलून देण्याची वेळ आता आली असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री  जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. सोमवारी त्यांच्या विरोधात जोडोमार आंदोलन करण्यात येणार असून तेच जोडे त्यांना पाठविले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर बोलण्यासंदर्भात आव्हाड यांनी शनिवारी पत्नकार परिषद आयोजित केली होती.

यापूर्वीही राज्यपाल कोश्यारी यांनी राज्याचा वारंवार अपमान केला आहे.जेव्हा राज्यपालांनी  महात्मा ज्योतिबा फुले यांचा अपमान केला तेव्हाच त्यांना  त्यांची जागा दाखवायला हवी होती. राज्यपालांना महामहीम म्हणून बोलले जाते. मात्र आता त्यांची ती देखील लायकी राहिलेली नाही.  त्यांनी  मराठी माणसाचा नाही तर त्यांच्या अस्मितेचा अपमान केला आहे. मराठी माणसाच्या अस्मितेचा अपमान कधीही सहन करणार नाही. मुंबई ही सहजा सहजी मिळाली नसून त्याकरिता रक्ताचे पाट वाहले आहेत. मुंबई हे  देशाचे व्यवसायिक रूप असलेले शहर आहे. यश हा मुंबईच्या मातीचा गुण असून राज्यपालांनी जे वक्तव्य केले आहे. त्याने सह्याद्रीचा मराठी मातीचा अपमान झाला आहे. परिणामी आता सर्वच मराठी माणसांनी एकत्न येऊन राजभवनात घुसून या राज्यपालांनाच हाकलून देण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचेही त्यांनी सांगितले.  तसेच राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात सोमवारी आंदोलन करणार आहे. त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून तेच जोडे त्यांना भेट म्हणून पाठविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेस