शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

Maharashtra Politics: “संजय राऊतांनी मध्यावधी निवडणुकांबाबत कोणत्या आधारावर विधान केले”; अजित पवारांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 20:20 IST

Maharashtra News: राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्यासारखी परिस्थिती दिसत नाही, असे सांगत अजित पवारांनी संजय राऊतांचा दावा फेटाळला.

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी मीडियाशी बोलताना मध्यवधी निवडणुकांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला दावा अजित पवारांनी फेटाळून लावला. 

शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी संजय राऊत यांची भेट घेत आपण ठाकरे गटासोबत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे बोलतात, ते बरोबर आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असून, याची तयारी दिल्लीत सुरू झाल्याचा दावा केला. यासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

संजय राऊतांनी मध्यावधी निवडणुकांबाबत कोणत्या आधारावर विधान केले?

राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्यासारखी सध्या तरी परिस्थिती दिसत नाही. कारण या सरकारला १४५ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. राज्यात कुणाचेही सरकार असले तरी त्या सरकारच्या पाठिशी १४५ आमदारांचा पाठिंबा असेपर्यंत सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. संजय राऊतांना याबाबत नंतर जरुर विचारणार आहे. मध्यावधी निवडणुकीबाबत विधान करण्यात आले आहे. त्या पाठीमागचे नेमके कारण काय? असा प्रश्न आपण संजय राऊत यांना विचारु, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, अजित पवारांनी मध्यावधी निवडणुकांचा दावा फेटाळल्यानंतर महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे पुन्हा एकदा दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याबाबतचं ट्विट मागे घ्यावे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे नाराज होऊन राजीनामा दिला आहे. कुठेही विनयभंग झाल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगायला हवे होते, असे अजित पवार म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी