शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “संजय राऊतांनी मध्यावधी निवडणुकांबाबत कोणत्या आधारावर विधान केले”; अजित पवारांचा थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 20:20 IST

Maharashtra News: राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्यासारखी परिस्थिती दिसत नाही, असे सांगत अजित पवारांनी संजय राऊतांचा दावा फेटाळला.

Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यातील राजकारण अनेकविध मुद्द्यांवरून तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी मीडियाशी बोलताना मध्यवधी निवडणुकांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेला दावा अजित पवारांनी फेटाळून लावला. 

शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी संजय राऊत यांची भेट घेत आपण ठाकरे गटासोबत असल्याचे स्पष्ट केले. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे बोलतात, ते बरोबर आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असून, याची तयारी दिल्लीत सुरू झाल्याचा दावा केला. यासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

संजय राऊतांनी मध्यावधी निवडणुकांबाबत कोणत्या आधारावर विधान केले?

राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्यासारखी सध्या तरी परिस्थिती दिसत नाही. कारण या सरकारला १४५ पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. राज्यात कुणाचेही सरकार असले तरी त्या सरकारच्या पाठिशी १४५ आमदारांचा पाठिंबा असेपर्यंत सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. संजय राऊतांना याबाबत नंतर जरुर विचारणार आहे. मध्यावधी निवडणुकीबाबत विधान करण्यात आले आहे. त्या पाठीमागचे नेमके कारण काय? असा प्रश्न आपण संजय राऊत यांना विचारु, असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. 

दरम्यान, अजित पवारांनी मध्यावधी निवडणुकांचा दावा फेटाळल्यानंतर महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे पुन्हा एकदा दिसून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी राजीनाम्याबाबतचं ट्विट मागे घ्यावे. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे नाराज होऊन राजीनामा दिला आहे. कुठेही विनयभंग झाल्याचे दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सांगायला हवे होते, असे अजित पवार म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी