शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विविध वस्त्यांमधील मुलांनी सादर केले नाट्याविष्याकर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: August 22, 2022 19:11 IST

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यातील गरीब होतकरू मुलांच्या कालगुणांना वाव मिळण्यासाठी श्रेष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला वंचितांचा रंगमंच हा उपक्रम गेली ८ वर्षे चालवला जातो

प्रज्ञा म्हात्रेठाणे : ठाण्यातील विविध वस्त्यांमधील मुलांनी त्यांना भिडणाऱ्या, त्यांना जाणवलेल्या अनुभवांवर आधारीत उत्स्फुर्त नाटिका सादर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात हुंड्याची समस्या, मुलींवरील अत्याचार, सार्वजनिक गणपती उत्सव, विराण हवेलीची सहल, बागेची सफर अशासारख्या विषयांवर त्यांनी नाट्यरुपाने प्रकाश टाकला. निमित्त होते वंचितांच्या रंगमंचाचे.

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यातील गरीब होतकरू मुलांच्या कालगुणांना वाव मिळण्यासाठी श्रेष्ठ साहित्यिक, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेला वंचितांचा रंगमंच हा उपक्रम गेली ८ वर्षे चालवला जातो. त्या अंतर्गत यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांसाठी नाट्य प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. विविध वस्तीतून आलेल्या शंभराहून अधिक मुलांना समजून घेऊन त्यांनी त्यांच्यासाठी नाट्यविषयक विविध खेळांचे आयोजन केले. मुलांनी स्वत: विचार करून ते नाट्य रूपाने कसे व्यक्त करायचे, नवरसांसहित अनेक भावना अभिनयातून कशा व्यक्त करायच्या हे त्यांनी वेगवेगळ्या खेळांतून शिकले. मुलांनी उत्स्फूर्त नाट्याविष्कार सादर केले. इतकेच नव्हे तर त्यांनी या आविष्काराचा आनंद अनुभवला. शिबिराच्या शेवटी मुलांनी व्यक्त केलेल्या अनुभवातून मुलांच्या मनात नाट्यकलेविषयी प्रेम आणि उत्सुकता निर्माण झाल्याचे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला. सुप्रसिद्ध कलाकार सुप्रिया मतकरी विनोद, नाट्यजल्लोषच्या संयोजिका हर्षदा बोरकर आणि त्यांचे सहकारी दीप्ती दांडेकर व आदित्य कदम यांनी प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी अतिशय आपुलकीने हाताळली. अशा प्रकारचे प्रशिक्षण शिबीर प्रत्येक महिन्यात घेण्याचा मानस संस्थेच्या कार्यकर्त्या मीनल उत्तुरकर यांनी जाहीर केला आणि डिसेंबर मध्ये होणार्‍या नाट्यजल्लोषमधे आता ही मुले दमदारपणे सादरीकरण करतील अशी खात्री व्यक्त केली. दरम्यान, या प्रसंगी संस्थेचा एकलव्य कार्यकर्ता पंकज गुरव आणि संस्थेचे सचिव अजय भोसले यांनी मिळून बनवलेल्या संस्थेच्या samatavichar.org या वेबसाइटचे उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.