शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने घातले नोटाबंदीचे श्राद्ध, भाजपच्या नीतीविरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 14:08 IST

ठाणे - मोदी सरकारने नोटाबंदी करुन १ वर्षाचा कालावधी सरला आहे. मात्र, या एका वर्षानंतरही भारतीय अर्थव्यवस्था कोमातून बाहेर आलेली नाही, असा आरोप करीत आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली रा ष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदीचे विधिवत श्राद्ध घातले. ...

ठळक मुद्देआंदोलनानंतर गरीब लहान मुलांना घातले जेवणभाजपा सरकारच्या विरोधात पिंडदानभाजपच्या नितिविरोधात आंदोलन तीव्र होणार

ठाणे - मोदी सरकारने नोटाबंदी करुन १ वर्षाचा कालावधी सरला आहे. मात्र, या एका वर्षानंतरही भारतीय अर्थव्यवस्था कोमातून बाहेर आलेली नाही, असा आरोप करीत आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नोटाबंदीचे विधिवत श्राद्ध घातले. दरम्यान, नोटाबंदीमुळे या देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाली असून त्याविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस आपला लढा अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी आनंद परांजपे यांनी दिला.मागील वर्षी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक १ हजार आणि ५०० रु पयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून या देशातील अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून ती एक वर्षानंतरही सावरलेली नाही. त्याच निषेधार्थ तसेच नोटाबंदीच्या या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी होळकर घाटावर नोटाबंदीचे वर्षश्राद्ध ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घालण्यात आले. या आंदोलनात नगरसेवक प्रकाश बर्डे, सुहास देसाई, राजन किणी, शानू पठाण, वहिदा खान, अनिता शिंदे, आरती गायकवाड, अपर्णा साळवी, मोरेश्वर किणी, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मंदार किणे, राष्ट्रवादीचे विद्यार्थी अध्यक्ष अभिजीत पवार, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा करिना दयालानी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत मुंडणही केले.यावेळी परांजपे म्हणाले की, मागील वर्षी मोदी सरकारने भारतीय जनतेवर नोटाबंदी लादली होती. तेव्हापासून या देशात आर्थिक अराजकता माजली आहे. या नोटा बदलण्याच्या रांगेत उभे राहणारे शंभरपेक्षा अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. नवीन रोजगार निर्मिती ठप्प झालेली असतानाच १५ लाख जणांच्या नोकºया गेल्या आहेत. देशाचा विकासदर ७.१ वरु न ५.७ घसरला आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला जबाबदार असणाºया मोदी यांच्या हुकूमशाही धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस प्रखर लढा उभारणार आहे.चौकटआंदोलनानंतर दिसली मानवतानोटाबंदीचे वर्षश्राद्ध घातल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अन्नदान केले. ब्राम्हणाच्या उपस्थितीत मंत्रोच्चारात पिंडदान करण्यात आले. त्यानंतर या परिसरात असणाऱ्या गरीब आणि लहान बालकांना अन्नदान करण्यात आले. सुमारे ५० जणांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जेवण दिले. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसtmcठाणे महापालिका