शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रवादीने घातले भाजप सरकारचे चौथे वर्षश्राध्द, कार्यकर्त्यांनी केले मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 14:44 IST

ठाणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. यावेळी सरकारचे श्राध्द घालत, कार्यकर्त्यांनी मुंडण केले.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये सरकार बुडविण्याचा केला निर्धार१२ कोटी जनता धडा शिकवेल

ठाणे - भाजप सरकारच्या कारकीर्दीला चार वर्षे झाली आहेत. या चार वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे, बेरोजगारी, महिलांवरी अत्याचार, सामाजिक तेढ, राज्याची खालावलेली आर्थिक स्थिती यामुळे महाराष्ट्र असुरिक्षत, अशांत, असह्य आणि अर्थशून्य झाला आहे. असा आरोप करीत ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यात भाजप सरकारचे चौथे वर्षश्राद्ध घालण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करुन फडणवीस सरकारचा निषेध केला.                 फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करु न चार वर्षे झाली आहेत. आज महाराष्ट्राची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘ नही नरेंद्र.. नही देवेंद्र; ये सरकार है ठगेंद्र’, एवढी माणसे कशाला? सरकारच्या श्राद्धाला, भारत मे शोर हैइ चौकीदार चोर है... फ्रान्स मे शोर है भाजप सरकार चोर है, अशा घोषणा देत मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी विसर्जन घाटावर सरकारचे विधीवत श्राद्ध घातले. यावेळी पिंडदान देखील करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांनी मुंडण करुन २०१९ मध्ये सरकार बुडवण्याचा निर्धार केला.यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी, भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्रामध्ये महिलांशी संबधीत गुन्हयांचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत. येथील माय भगिनींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. नागपूरमध्येच गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. मुंबईसारख्या शहरात मंगळवारीच एकाचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील जनता असुरक्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. दलित- सवर्ण, ओबीसी- मराठा अशी सामाजिक तेढ या सरकारने निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतमालाला हमीभाव दिला जात नाही. परिणामी, शेतकरी पुन्हा आत्महत्या करीत आहेत. पदवीधर तरु णांना रोजगार मिळेनासा झाला आहे. राज्य दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्योगांवर संकट घोंघावत आहे. या सर्व प्रकाराला फडणवीस सरकारच जबाबदार आहे, महाराष्ट्राची वाटचाल विकासाऐवजी विनाशाकडे होत आहे, असा आरोप करुन आगामी वर्षात या सरकारला महाराष्ट्रातील १२ कोटी जनता बुडवून टाकेल, असा आशावाद व्यक्त केला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा