शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

राष्ट्रवादीने घातले भाजप सरकारचे चौथे वर्षश्राध्द, कार्यकर्त्यांनी केले मुंडण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 14:44 IST

ठाणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने भाजप सरकारच्या विरोधात अनोख्या पध्दतीने आंदोलन केले. यावेळी सरकारचे श्राध्द घालत, कार्यकर्त्यांनी मुंडण केले.

ठळक मुद्दे२०१९ मध्ये सरकार बुडविण्याचा केला निर्धार१२ कोटी जनता धडा शिकवेल

ठाणे - भाजप सरकारच्या कारकीर्दीला चार वर्षे झाली आहेत. या चार वर्षात महागाई, शेतकरी आत्महत्या, घोटाळे, बेरोजगारी, महिलांवरी अत्याचार, सामाजिक तेढ, राज्याची खालावलेली आर्थिक स्थिती यामुळे महाराष्ट्र असुरिक्षत, अशांत, असह्य आणि अर्थशून्य झाला आहे. असा आरोप करीत ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली तसेच ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ठाण्यात भाजप सरकारचे चौथे वर्षश्राद्ध घालण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडण करुन फडणवीस सरकारचा निषेध केला.                 फडणवीस सरकारला सत्ता स्थापन करु न चार वर्षे झाली आहेत. आज महाराष्ट्राची अवस्था अत्यंत वाईट झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘ नही नरेंद्र.. नही देवेंद्र; ये सरकार है ठगेंद्र’, एवढी माणसे कशाला? सरकारच्या श्राद्धाला, भारत मे शोर हैइ चौकीदार चोर है... फ्रान्स मे शोर है भाजप सरकार चोर है, अशा घोषणा देत मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी विसर्जन घाटावर सरकारचे विधीवत श्राद्ध घातले. यावेळी पिंडदान देखील करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांनी मुंडण करुन २०१९ मध्ये सरकार बुडवण्याचा निर्धार केला.यावेळी शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी, भाजप सरकारच्या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्रामध्ये महिलांशी संबधीत गुन्हयांचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत. येथील माय भगिनींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. नागपूरमध्येच गुन्हेगारीने उच्चांक गाठला आहे. मुंबईसारख्या शहरात मंगळवारीच एकाचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रातील जनता असुरक्षित झाल्याचे त्यांनी सांगितले. दलित- सवर्ण, ओबीसी- मराठा अशी सामाजिक तेढ या सरकारने निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. शेतमालाला हमीभाव दिला जात नाही. परिणामी, शेतकरी पुन्हा आत्महत्या करीत आहेत. पदवीधर तरु णांना रोजगार मिळेनासा झाला आहे. राज्य दिवाळखोरीच्या वाटेवर असल्याचेही त्यांनी सांगितले. उद्योगांवर संकट घोंघावत आहे. या सर्व प्रकाराला फडणवीस सरकारच जबाबदार आहे, महाराष्ट्राची वाटचाल विकासाऐवजी विनाशाकडे होत आहे, असा आरोप करुन आगामी वर्षात या सरकारला महाराष्ट्रातील १२ कोटी जनता बुडवून टाकेल, असा आशावाद व्यक्त केला. 

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा