शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

अखेर मेहता नमले ! भाजपच्या जिल्हा कार्यालयात जाऊन जिल्हाध्यक्षाचा केला स्वीकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 13:12 IST

मीरा भाईंदर विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळून देखील नरेंद्र मेहतांना अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्या कडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती

मीरारोड - मीरा भाईंदर भाजपचे जिल्हा कार्यालय व पक्ष नेतृत्वाने नियुक्त केलेल्या जिल्हाध्यक्ष ऍड . रवी व्यास याना मानत नसल्याचे सांगणारे माजी आमदार नरेंद्र मेहता अखेर नमले . शनिवारी त्यांनी जिल्हा कार्यालयात जाऊन व्यास यांचा जिल्हाध्यक्ष म्हणून स्वीकार केला . या पुढे पालिका निवडणूक व पक्ष व्यास आणि मेहता यांच्या नेतृत्वाखाली झाली पाहिजे असे यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितले . त्यामुळे व्यास व मेहतां मध्ये दिलजमाई होऊन भाजपातील गटबाजी संपेल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात असून १६ मे रोजीच्या कार्यक्रमात भाजपातील दुफळी दिसू नये यासाठी हे तातडीचे प्रयत्न केले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे .  

मीरा भाईंदर विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळून देखील नरेंद्र मेहतांना अपक्ष उमेदवार गीता जैन यांच्या कडून पराभवाची धूळ चाखावी लागली होती . विविध कारणांनी वादात आणि आरोपांच्या फेऱ्यात सापडून मेहता हे चांगलेच वादग्रस्त ठरल्याने भाजपाचा पराभव झाल्याचे कारण प्रामुख्याने सांगितले जाते . त्यातच त्यांची अश्लील व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली व नंतर नगरसेविकेच्या तक्रारी वरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने ते चांगलेच वादात अडकले

मेहतांनी त्यांच्या शाळे जवळील  पक्ष कार्यालय पक्षाच्या नावे इतक्या वर्षात केले नसल्याने तसेच त्यांच्या कार्यपद्धतीने नाराज तत्कालीन भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी भाईंदर पश्चिम येथे जिल्ह्याचे पक्ष कार्यालय सुरु केले . पक्षाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन होऊन देखील मेहता आणि त्यांचे समर्थक  पक्षाचे कार्यालय मानत नव्हते . नंतर प्रदेश नेतृत्वाने जिल्हाध्यक्ष पदी ऍड . रवी व्यास यांची नियुक्ती केल्या नंतर मेहतांनी त्याला जोरदार विरोध चालवला तसेच मेहतांना जिल्हाध्यक्ष मानत नसल्याचे ठणकावले . जिल्हाध्यक्षांनी आयोजित केलेल्या पक्ष मेळाव्यास पक्षाचे वरिष्ठ नेते येऊन देखील मेहता व समर्थकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली.  

१६ मे रोजी पालिकेच्या विकासकामांच्या उदघाटन साठी  विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस येणार असल्याने त्याच्या कार्यक्रमाची तयारी म्हणून शनिवारी भाजप जिल्हा कार्यालयात व्यास यांनी बैठक आयोजित केली होती . तर दुसरीकडे मेहतांनी भाईंदर पश्चिमेला आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजपाच्या बैठकीचे आयोजन केले होते . मेहतांच्या कार्यक्रमाला जाण्या आधी चव्हाण हे जिल्हा कार्यालयात जाऊन व्यास आदींना भेटले . नंतर मेहतांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत नंतर चव्हाण हे मेहतांना घेऊन जिल्हा कार्यालयात पोहचले . दालनात चव्हाण, व्यास , मेहता सह महापौर ज्योत्सना हसनाळे, महामंत्री अनिल भोसले , माजी जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे , माजी नगरसेवक संजय पांगे , महिला अध्यक्ष रिना मेहता आदी उपस्थित होते . त्यांच्यात काही चर्चा देखील झडली .   तर भाजपचे अधिकृत  जिल्हा कार्यालय व जिल्हाध्यक्ष ना न मानणारे व त्यांना आव्हान देणारे नरेंद्र मेहता तेथे पोहचल्याने शहरात चांगलीच चर्चा सुरु झाली . झुकेगा नही सांगणाऱ्या मेहतांना अखेर पक्ष व व्यास यांच्या समोर झुकावे लागल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या .  

रवींद्र चव्हाण यांनी मात्र मीरा भाईंदर भाजपात गटबाजी नसल्याचे सांगत महाविकास आघाडी व अन्य पक्ष भाजपात गट असल्याची गोष्ट पसरवण्याचे काम करतात असा आरोप केला . येणारी पालिका निवडणुक जिल्हाध्यक्ष व्यास  व स्थानिक नेते मेहता यांच्या नेतृत्वाखाली झाली पाहिजे . ह्या दोन्ही नेत्यांनी या पुढे भाजपचे संघटन - निवडणुकीत एकत्र मिळून काम केले पाहिजे .महापालिकेत मेहता लक्ष देतात त्यांनी ते लक्ष दिले पाहिजे . येणाऱ्या पालिका निवडणुकीत पुन्हा भाजपचा महापौर बनेल हा संकल्प कार्यकर्त्यांनी केला आहे असे चव्हाण म्हणाले .  

 

आधीच्या गोष्टी बाजूला ठेऊन जिल्हाध्यक्ष म्हणून व्यास याना स्वीकारल्याचे सांगत या पुढे आम्ही दोघेही एकत्र दिसु असे मेहता म्हणाले .  निवडणूकित उमेदवारी आणि पक्षाचा सर्व निर्णय हा देवेंद्र फडणवीस व  प्रदेशाध्यक्ष घेतात . त्यांचा स्वतःचा सर्वे होऊन जे जिंकणारे उमेदवार होते त्यांना तिकीट दिले गेले असे सांगत तिकीट वाटप पक्ष नेतृत्वाच्या हाती असल्याचे मेहतांनी स्पष्ट केले . पक्षाचे काम जिल्हा कार्यालय व त्यांच्या पक्ष कार्यालयातून सुद्धा सुरूच राहील असे संकेत त्यांनी दिले . त्याच वेळी पक्षात जे गद्दार आहेत त्यांचा हिशोब बाकी असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी कोणाची नावे न घेता दिला .  

 

निवडणूक ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातात असे स्पष्ट करत जिल्हाध्यक्षाची जबाबदारी संघटना आणि निवडणुकीची आहे असे ऍड . रवी व्यास म्हणाले .  स्थानिक नेते मेहता व सर्व कार्यकर्ते मिळून निवडणूक लढवू  असे व्यास म्हणले .