शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

आयरे प्रभागातील ‘ते’ भोगताहेत नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 5:47 AM

गलिच्छ आणि मोडकी शौचालये : स्वच्छता अभियानाला केडीएमसीने फासला हरताळ

डोंबिवली : स्वच्छता अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पूर्वेकडील आयरेगाव प्रभागातील सहकार आणि समतानगरमध्ये काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेल्या शौचालयांची पुरती दयनीय अवस्था झाली आहे. मोडके दरवाजे, स्वच्छतेअभावी दुर्गंधी, किडेअळ्यांचे साम्राज्य याठिकाणी पाहावयास मिळत आहे. पायवाटांचीही दुरवस्था झाली असून पिण्याच्या पाण्याची बोंब असताना शौचालय स्वच्छतेकरिता कुठून पाणी मिळणार, अशी परिस्थिती असल्याने रहिवासी अक्षरश: नरकयातना भोगत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान, हगणदारीमुक्त शहरांचा नारा दिला. प्रत्यक्षात कल्याण-डोंबिवली शहरे हगणदारीमुक्त झाली का, असा सवाल रिपाइंचे शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. शहरांमध्ये स्वच्छता अभियानाचा देखावा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे वास्तव आयरेगाव प्रभागातील सहकारनगर आणि समतानगरमध्ये पाहावयास मिळत आहे. येथील लोकवस्ती हजारोंच्या आसपास असून २०००-२००५ मध्ये तत्कालीन नगरसेवक काळू भगत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, दुरुस्ती करण्यात आलेल्या शौचालयांचे ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत सहा महिन्यांपूर्वी पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत त्यांची पुरती दुरवस्था झाली असून यानिमित्ताने निकृष्ट बांधकामांचा नमुना पाहावयास मिळत आहे. शौचालयांची दैनंदिन स्वच्छता होत नसल्याने लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर साठणाऱ्या मैल्यामुळे किडे आणि अळ्यांचे साम्राज्य पसरले आहे. सफाई कामगार कित्येक दिवसांपासून फिरकले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. शौचालयांना आलेली अवकळा पाहता नैसर्गिक विधिकरिता बाजूकडील रेल्वे ट्रॅकचाच आधार घ्यावा लागत असल्याचे लोकांनी सांगितले. अशावेळी अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. यासंदर्भात मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता बबन बरफ तसेच स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.कमी दाबामुळे पाणीही मिळेनाच्केडीएमसीच्या क्षेत्रात पाणीकपात लागू झाल्याने मंगळवारी पाणीपुरवठा बंद असतो. परंतु, अन्य दिवशीही कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे स्थानिक महिला रहिवासी शाहीन पटेल यांनी सांगितले.च्स्वतंत्र जलवाहिनी असूनही पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब कायम असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, पायवाटा नादुरुस्त झाल्याने चालणेही जिकिरीचे बनल्याचे अन्य रहिवाशांकडून सांगण्यात आले. परिसरातील पथदिवेही बंद असल्याकडे लक्ष वेधण्यात आले....तर आंदोलनाशिवाय पर्याय नाहीस्वच्छता अभियानाच्या नावाखाली जी शौचालयांची कामे केली आहेत, ती एक प्रकारे धूळफेक असून राजा सुस्त आणि प्रजा त्रस्त, असे काहीसे चित्र या दोन्ही वस्त्यांची पाहता येते, असे मत आरपीआय आठवले गटाचे लालसाहब जमादार यांनी व्यक्त केले. वारंवार यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. यापुढे परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जमादार यांनी दिला. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे