शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

आयरे प्रभागातील ‘ते’ भोगताहेत नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 05:48 IST

गलिच्छ आणि मोडकी शौचालये : स्वच्छता अभियानाला केडीएमसीने फासला हरताळ

डोंबिवली : स्वच्छता अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पूर्वेकडील आयरेगाव प्रभागातील सहकार आणि समतानगरमध्ये काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेल्या शौचालयांची पुरती दयनीय अवस्था झाली आहे. मोडके दरवाजे, स्वच्छतेअभावी दुर्गंधी, किडेअळ्यांचे साम्राज्य याठिकाणी पाहावयास मिळत आहे. पायवाटांचीही दुरवस्था झाली असून पिण्याच्या पाण्याची बोंब असताना शौचालय स्वच्छतेकरिता कुठून पाणी मिळणार, अशी परिस्थिती असल्याने रहिवासी अक्षरश: नरकयातना भोगत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान, हगणदारीमुक्त शहरांचा नारा दिला. प्रत्यक्षात कल्याण-डोंबिवली शहरे हगणदारीमुक्त झाली का, असा सवाल रिपाइंचे शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. शहरांमध्ये स्वच्छता अभियानाचा देखावा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे वास्तव आयरेगाव प्रभागातील सहकारनगर आणि समतानगरमध्ये पाहावयास मिळत आहे. येथील लोकवस्ती हजारोंच्या आसपास असून २०००-२००५ मध्ये तत्कालीन नगरसेवक काळू भगत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, दुरुस्ती करण्यात आलेल्या शौचालयांचे ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत सहा महिन्यांपूर्वी पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत त्यांची पुरती दुरवस्था झाली असून यानिमित्ताने निकृष्ट बांधकामांचा नमुना पाहावयास मिळत आहे. शौचालयांची दैनंदिन स्वच्छता होत नसल्याने लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर साठणाऱ्या मैल्यामुळे किडे आणि अळ्यांचे साम्राज्य पसरले आहे. सफाई कामगार कित्येक दिवसांपासून फिरकले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. शौचालयांना आलेली अवकळा पाहता नैसर्गिक विधिकरिता बाजूकडील रेल्वे ट्रॅकचाच आधार घ्यावा लागत असल्याचे लोकांनी सांगितले. अशावेळी अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. यासंदर्भात मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता बबन बरफ तसेच स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.कमी दाबामुळे पाणीही मिळेनाच्केडीएमसीच्या क्षेत्रात पाणीकपात लागू झाल्याने मंगळवारी पाणीपुरवठा बंद असतो. परंतु, अन्य दिवशीही कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे स्थानिक महिला रहिवासी शाहीन पटेल यांनी सांगितले.च्स्वतंत्र जलवाहिनी असूनही पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब कायम असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, पायवाटा नादुरुस्त झाल्याने चालणेही जिकिरीचे बनल्याचे अन्य रहिवाशांकडून सांगण्यात आले. परिसरातील पथदिवेही बंद असल्याकडे लक्ष वेधण्यात आले....तर आंदोलनाशिवाय पर्याय नाहीस्वच्छता अभियानाच्या नावाखाली जी शौचालयांची कामे केली आहेत, ती एक प्रकारे धूळफेक असून राजा सुस्त आणि प्रजा त्रस्त, असे काहीसे चित्र या दोन्ही वस्त्यांची पाहता येते, असे मत आरपीआय आठवले गटाचे लालसाहब जमादार यांनी व्यक्त केले. वारंवार यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. यापुढे परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जमादार यांनी दिला. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे