शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

आयरे प्रभागातील ‘ते’ भोगताहेत नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 05:48 IST

गलिच्छ आणि मोडकी शौचालये : स्वच्छता अभियानाला केडीएमसीने फासला हरताळ

डोंबिवली : स्वच्छता अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पूर्वेकडील आयरेगाव प्रभागातील सहकार आणि समतानगरमध्ये काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेल्या शौचालयांची पुरती दयनीय अवस्था झाली आहे. मोडके दरवाजे, स्वच्छतेअभावी दुर्गंधी, किडेअळ्यांचे साम्राज्य याठिकाणी पाहावयास मिळत आहे. पायवाटांचीही दुरवस्था झाली असून पिण्याच्या पाण्याची बोंब असताना शौचालय स्वच्छतेकरिता कुठून पाणी मिळणार, अशी परिस्थिती असल्याने रहिवासी अक्षरश: नरकयातना भोगत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान, हगणदारीमुक्त शहरांचा नारा दिला. प्रत्यक्षात कल्याण-डोंबिवली शहरे हगणदारीमुक्त झाली का, असा सवाल रिपाइंचे शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. शहरांमध्ये स्वच्छता अभियानाचा देखावा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे वास्तव आयरेगाव प्रभागातील सहकारनगर आणि समतानगरमध्ये पाहावयास मिळत आहे. येथील लोकवस्ती हजारोंच्या आसपास असून २०००-२००५ मध्ये तत्कालीन नगरसेवक काळू भगत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, दुरुस्ती करण्यात आलेल्या शौचालयांचे ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत सहा महिन्यांपूर्वी पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत त्यांची पुरती दुरवस्था झाली असून यानिमित्ताने निकृष्ट बांधकामांचा नमुना पाहावयास मिळत आहे. शौचालयांची दैनंदिन स्वच्छता होत नसल्याने लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर साठणाऱ्या मैल्यामुळे किडे आणि अळ्यांचे साम्राज्य पसरले आहे. सफाई कामगार कित्येक दिवसांपासून फिरकले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. शौचालयांना आलेली अवकळा पाहता नैसर्गिक विधिकरिता बाजूकडील रेल्वे ट्रॅकचाच आधार घ्यावा लागत असल्याचे लोकांनी सांगितले. अशावेळी अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. यासंदर्भात मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता बबन बरफ तसेच स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.कमी दाबामुळे पाणीही मिळेनाच्केडीएमसीच्या क्षेत्रात पाणीकपात लागू झाल्याने मंगळवारी पाणीपुरवठा बंद असतो. परंतु, अन्य दिवशीही कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे स्थानिक महिला रहिवासी शाहीन पटेल यांनी सांगितले.च्स्वतंत्र जलवाहिनी असूनही पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब कायम असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, पायवाटा नादुरुस्त झाल्याने चालणेही जिकिरीचे बनल्याचे अन्य रहिवाशांकडून सांगण्यात आले. परिसरातील पथदिवेही बंद असल्याकडे लक्ष वेधण्यात आले....तर आंदोलनाशिवाय पर्याय नाहीस्वच्छता अभियानाच्या नावाखाली जी शौचालयांची कामे केली आहेत, ती एक प्रकारे धूळफेक असून राजा सुस्त आणि प्रजा त्रस्त, असे काहीसे चित्र या दोन्ही वस्त्यांची पाहता येते, असे मत आरपीआय आठवले गटाचे लालसाहब जमादार यांनी व्यक्त केले. वारंवार यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. यापुढे परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जमादार यांनी दिला. 

टॅग्स :dombivaliडोंबिवलीthaneठाणे