शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
7
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
8
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
9
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
10
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
11
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
12
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
13
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
14
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
16
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
17
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
18
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
19
विना नंबरप्लेटच्या भरधाव पोर्शे गाडीने तरुण तरुणीला उडवले; दोघांचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना
20
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती

नाल्यातच बेकायदा बांधकामे, पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 5:28 AM

पालिकेचे दुर्लक्ष : अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरील प्रकार, प्रवाहाचा मार्ग झाला अरुंद

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या मुख्य नाल्याचा प्रवाह बेकायदा बांधकामांनी अरुंद केला आहे. त्यातच, नव्याने अनेक बांधकामे नाल्यातच केली जात आहेत. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरच असलेल्या दुकानदारांनी मागच्या नाल्यातच बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन विलंब लावत आहे.

अंबरनाथ, कल्याण-बदलापूर रोडला अंबरनाथमध्ये समांतर असा नाला वाहत आहे. पूर्वी या नाल्याची रुंदी ही ६० फुटांपेक्षा अधिक होती. मात्र, या मुख्य नाल्याच्या किनाºयावरच मोठी बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांवर कारवाई न झाल्याने नाल्याचा प्रवाह ६० फुटांवरून अवघ्या १० ते २० फुटांवर आला आहे. अनेक बेकायदा बांधकामे थेट नाल्यात अतिक्रमण करून उभी राहत असल्याने मुख्य नाल्याच्या प्रवाहाला धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी नाल्याचा प्रवाह अरुंद पडत असल्याने अनेक सखल भागात पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. विम्कोनाका ते अंबरनाथ तहसीलदार कार्यालयापर्यंतच्या नाल्याचाच विचार केला, तर अनेक दुकाने आणि बांधकामे थेट नाल्याच्या प्रवाहात केल्याचे उघड होत आहे. एमआयडीसीमधील कंपन्यांनीही थेट नाल्याचा प्रवाह बदलून आपल्या कंपन्या उभ्या केल्या आहेत. नाल्याचा प्रवाह अरुंद होत असल्याची कल्पना पालिका प्रशासनाला असतानाही पालिकेचे अधिकारी या बांधकामांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे नाल्यातील अतिक्रमण वाढतच आहे. या वाढत्या अतिक्रमणांबाबत पालिकेने नाल्याच्या किनाºयावर असलेल्या सर्व बेकायदा बांधकामांना नोटीस बजावणे गरजेचे आहे. मात्र, नोटीस तर दूरच राहिली, उलट नव्याने होणारी बांधकामेही पालिका प्रशासन रोखत नाही. अंबरनाथ पोलीस ठाण्यासमोरील दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या मागच्या भागात असलेल्या नाल्यातच बांधकामे सुरू केली आहेत.एका दुकानदाराने तर नाल्यात थेट आरसीसी बांधकाम करून नाल्याच्या प्रवाहातच दुकानाचे वाढीव बांधकाम केले आहे. गेल्या महिनाभरापासून बांधकामे सुरू असतानाही पालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे. हीच परिस्थिती विम्कोनाक्याला लागून असलेल्या कंपन्यांचीही झाली आहे. या कंपन्यांनीही नाल्याची रुंदी कमी करून बांधकामे सुरू केली आहे.नाल्यात कोणतेही बांधकाम सुरू असेल, तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. नाल्याचा प्रवाह रोखण्याचा आणि त्यावर अतिक्रमण करण्याचा कुणाचाही अधिकार नाही.- देविदास पवार, मुख्याधिकारीकंपन्यांवर कारवाई नाहीच्नाल्याचा प्रवाह बदलल्यानंतर या संदर्भात अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. मात्र त्या तक्रारींची कोणतीच दखल पालिकेने घेतली नाही.कंपनी मालकाने थेट नाल्याचा प्रवाह बदलला.च्अंबरनाथमधील कल्याण-बदलापूर रस्त्याचे रूंदीकरण झाल्यावर दुकाने तुटलेल्या मालकांनी थेट मागच्या बाजूला नाल्यात अतिक्रमण करून आपली दुकाने थाटलेली आहेत.